शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
3
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
4
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
5
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
6
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
7
शेअर बाजाराची मजबूत सुरुवात: सेन्सेक्स १३६ अंकांनी वधारला, निफ्टी २४,७०० च्या जवळ; हे स्टॉक्स तेजीत
8
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
9
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
10
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
11
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
12
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
13
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
14
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
15
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
16
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
17
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
18
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
19
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
20
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान

घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’

By अजित मांडके | Updated: September 29, 2025 09:12 IST

वंडी-नाशिक महामार्ग किंवा घोडबंदर मार्ग या दोन्ही मार्गांवर रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी वळण देण्यात आले आहे. येथील रस्त्याच्या बिकट अवस्थेमुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

अजित मांडकेप्रतिनिधी

वंडी-नाशिक महामार्ग किंवा घोडबंदर मार्ग या दोन्ही मार्गांवर रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी वळण देण्यात आले आहे. येथील रस्त्याच्या बिकट अवस्थेमुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नाशिकवरून भिवंडीपर्यंत अवघ्या दोन तासांत प्रवास होतो. मात्र, भिवंडी ते ठाणे या १५ ते २० मिनिटांच्या प्रवासासाठी अडीच ते तीन तासांचा कालावधी लागतो. तिकडे घोडबंदर मार्गावर अशीच परिस्थिती आहे.  मुंबईवरून नाशिककडे जाण्यासाठी आणि नाशिकवरून मुंबईकडे येण्यासाठी भिवंडी हाच महामार्ग महत्त्वाचा आहे. दरवर्षी येथील रस्त्याला खड्डे पडतात. मागील काही वर्षांपासून येथील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. ते पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते अरुंद असल्याने रस्त्यांना वळण देण्यात आले. रस्त्यांची अपूर्ण कामे आणि रस्त्यांना पडलेले भलेमोठे खड्डे यामुळे वाहनचालकांना दरवर्षी पावसाळ्यात तारेवरची कसरत करावी लागते. नाशिकहून लवकर मुंबई गाठण्यास प्रवासी आसनगावला आल्यावर पुलाच्या कामामुळे आणि रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे रखडतो. तेथून कसाबसा बाहेर पडल्यानंतर पुढे भिवंडीत एन्ट्री केल्यावर माणकोलीपासून ते माजिवडापर्यंत येण्यासाठी वाहनचालकांना दीड ते दोन तासांचा कालावधी लागतो.

अशीच काहीशी स्थिती घोडबंदर मार्गाची आहे. मागील काही वर्षांपासून मेट्रोचे काम सुरू आहे. आता सेवारस्ता मुख्य रस्त्यात विलीनीकरणाचे काम सुरू आहे. विलीनीकराच्या कामाला  रहिवाशांचा तीव्र विरोध आहे. हा निर्णय म्हणजे येथील रहिवाशांच्या जीवाशी खेळ असल्याचेही खासगीत पोलिस अधिकारीही सांगतात; परंतु राजकीय नेत्यांच्या अट्टहासापुढे यंत्रणा हतबल आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची वाताहत झाली आहे. गायमुख घाटाचे काम तीन ते चार वेळा केले. तरीही हा रस्ता खड्ड्यात गेला आहे. त्यामुळे गुजरात, वसईवरून येणाऱ्या वाहनांना गायमुख घाटापासून वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो.

घोडबंदर व नाशिक मार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी अवजड वाहतूक ठराविक कालावधीत बंद करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला घेतला. सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत अवजड वाहतूक बंद करण्यात आली; परंतु अवघ्या दोन दिवसांत हा निर्णय बदलण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली. ठाण्यात अवजड वाहतूक बंद केली तरी तिकडे भिवंडीत अवजड वाहने आणि इकडे फाउंटनपासून पुढे वसई मार्गावर अवजड वाहने रस्त्यावर उभी राहू लागली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूककोंडीत भर पडली. तसेच गुजरातवरून येणाऱ्या व्यापारी वाहतुकीला फटका बसला. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांत अवजड वाहतुकीच्या वेळेत पुन्हा बदल झाला. सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अवजड वाहतूक सुरू झाली. त्याचा परिणाम ठाण्यात पुन्हा कोंडी वाढली. दुसरीकडे गुजरात, वापीमध्ये डिझेल स्वस्त असल्याने अवजड वाहनचालक आपल्या वाहनात डिझेल कमी ठेवतात. त्याचा परिणाम असा होतो की, घोडबंदर येथील चढण चढताना डिझेल इंजिनपर्यंत पोहोचत नसल्याने वाहने बंद पडतात. परिणामी घोडबंदर भागातील कोंडी सुटता सुटत नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Commute: Thane Traffic Jams Punish Travelers, Roadwork Blamed

Web Summary : Ongoing roadwork on Bhiwandi-Nashik & Ghodbunder routes causes severe traffic. Travel times drastically increase, especially near Thane. Heavy vehicle restrictions, intended to help, initially failed, worsening congestion. Diesel shortages add to Ghodbunder's woes.
टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीthaneठाणे