शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
3
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
4
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
5
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
6
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
7
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
8
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
9
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
10
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
11
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
12
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
13
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
14
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
15
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
16
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
17
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
18
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
19
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
20
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका

ठाण्यात विकासाऐवजी व्यक्तींवर आधारित प्रचार

By admin | Published: February 20, 2017 4:31 AM

आयारामांमुळेच चर्चेत आलेल्या ठाणे आणि उल्हासनगरच्या प्रचाराची रविवारी सांगता झाली ती घरोघरच्या प्रचाराच्या मोहिमा सांभाळत आणि रविवारनिमित्त

अजित मांडके, सदानंद नाईक / ठाणे, उल्हासनगरआयारामांमुळेच चर्चेत आलेल्या ठाणे आणि उल्हासनगरच्या प्रचाराची रविवारी सांगता झाली ती घरोघरच्या प्रचाराच्या मोहिमा सांभाळत आणि रविवारनिमित्त मतदारांना गाठण्यावर भर देत. ठाण्याच्या प्रचारात आयुक्त संजीव जयस्वाल हे केंद्रस्थानी राहिले, तर उल्हासनगरच्या प्रचारात वेगवेगळ्या अर्थाने चर्चा घडवली ती वादग्रस्त पप्पू कलानी यांचा मुलगा ओमी यांनी. सर्वच पक्षांनी ठाण्यावर लक्ष केंद्रित केल्याने उल्हासनगरचा प्रचार काहीसा झाकोळला. प्रमुख नेत्यांनीही ठाण्यातच प्रचाराला सर्वाधिक पसंती दिली. ठाण्यात १२ दिवस सुरू असलेल्या प्रचारात शिवसेना विरुद्ध भाजपा आणि शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असाच संघर्ष दिसून आला. परंतु, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याभोवती शेवटच्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा धडाडल्या. मतदानासाठी पालिकेची तयारी पूर्ण झाली असून, मतदानाचा टक्का वाढवण्यावर दोन्ही पालिकांचे प्रयत्न सुरू आहेत.युती तुटल्याने प्रचारसभांमध्येही भाजपाने शिवसेनेला लक्ष्य केले, तर शिवसेनेने भाजपावर आगपाखड केल्याचे चित्र होते. राष्ट्रवादीनेदेखील ‘२५ वर्षे सत्तेची, २५ वर्षे नाकर्तेपणाची’ म्हणत शिवसेनेवर हल्लाबोल केला. मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या चार सभा ठाण्यात होणार होत्या. परंतु, केवळ एकच सभा झाली, तीही दिव्यात. तर, काँग्रेसतर्फे फक्त नारायण राणे आणि सचिन सावंत यांचीच सभा झाली. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवा आणि ठाण्यात सभा घेतली. दिवा दत्तक घेण्याची घोषणा करताना त्यांनी आयुक्तांच्या खांद्यावर बंदूकठेवत त्यांना आम्हीच आणले आणि शहराचा विकास केला, असे सांगितले. त्यामुळे यानंतरचा प्रचार हा आयुक्तांच्या अवतीभोवती फिरताना दिसला. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री-काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी आयुक्तांवर निशाणा साधला.९७ केंद्रे संवेदनशीलठाण्यात यंदा ३३ प्रभागांतील १३१ जागांसाठी निवडणूक पार पडेल. यातील ३२ प्रभागांत ४ आणि प्रभाग क्रमांक २९मध्ये प्रत्येकी ३ उमेदवार रिंगणात आहेत. १३१ जागांसाठी २५ पक्षांमधून ८०५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. महापालिका हद्दीत १,७०४ मतदान केंद्रे असून, त्यात ९७ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. परंतु, अतिसंवेदनशील केंद्र एकही नाही. ठाण्यात १२ लाख २९ हजार २६६ मतदार असून, त्यात ६ लाख ६७ हजार ८६८ पुरुष, ५ लाख ६१ हजार ३८५ महिला मतदार आणि १५ इतर मतदार आहेत.उल्हासनगरात ओमी कलानी रिंगणाबाहेर ज्या ओमी कलानी यांच्या पक्षबदलामुळे दीर्घ काळ उल्हासनगरचे राजकारण ढवळून निघाले, ते ओमी मात्र निवडणूक लढवू शकलेले नाहीत. तीन अपत्यांच्या मुद्द्यावरून त्यांचा अर्ज बाद झाला आहे. मात्र, त्यांचे बहुतांश समर्थक भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. उल्हासनगरला ७८ जागांसाठी ४७९ उमेदवार रिंगणात आहेत. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी काढलेल्या रॅली, मतदारांच्या गाठीभेटींनीच प्रचाराचा शेवटचा दिवस गाजवला. प्रचारसमाप्तीनंतर लगोलग गुप्त बैठकांना सुरुवात झाली. अनेक प्रभागांतील वेगवेगळ्या पक्षांच्या रॅलीमध्ये आलटूनपालटून त्याच त्या महिला, पुरुष, मुले दिसत होती, ते त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य.प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उल्हासनगरात सर्व पक्षांनी घरोघर, गल्लीबोळांतील प्रचारावर भर दिला. सारे शहर कर्कश आवाज, घोषणांनी दुमदुमले. कडक उन्हातही प्रचाराचा जोर ओसरलेला नव्हता. वृद्ध तसेच महिला लहान मुलांना घेऊन प्रचार रॅलीत दिसत होत्या. गुप्त बैठकांना जोर : प्रचारसमाप्तीनंतर सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी सोसायट्या, झोपडपट्टीतील कार्यकर्ते, व्यापारी संघटना, महिला मंडळ, सामाजिक संस्था, मंदिरांचे विश्वस्त आदींच्या भेटीगाठी व गुप्त बैठका सुरू केल्या आहे. मुख्यमंत्र्यांना उत्तर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत या दोघांनीच भ्रष्टाचार केल्याचा दावा करत प्रचारात रंगत आणली.