शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

वाहतूक सुरक्षा सप्ताहाचा समारोप न करता वर्षभर कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती सुरूच ठेवणार : डॉ विनयकुमार राठोड

By नितीन पंडित | Updated: January 12, 2023 18:23 IST

वाहतूक सुरक्षा ही सर्वसामान्य नागरिकांसाठी,वाहन चालकांसाठी आहे, त्यामुळे वाहतूक सुरक्षा सप्ताहचा शुभारंभ जरीकेला असला तरी त्याचा समारोप न करता संपूर्ण वर्षभर या माध्यमातून निरंतर कार्यक्रम सुरूच ठेवणार आहे .

भिवंडी - वाहतूक सुरक्षा ही सर्वसामान्य नागरिकांसाठी,वाहन चालकांसाठी आहे, त्यामुळे वाहतूक सुरक्षा सप्ताहचा शुभारंभ जरीकेला असला तरी त्याचा समारोप न करता संपूर्ण वर्षभर या माध्यमातून निरंतर कार्यक्रम सुरूच ठेवणार आहे, असे प्रतिपादन ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ विनयकुमार राठोड यांनी केले आहे. गुरुवारी ते नारपोली वाहतूक शाखेच्या वतीने आयोजित ३३ व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.या प्रसंगी नारपोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत सोंडे,कल्याण नाका भिवंडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष पाटील,रांजनोली वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास भिंगारदिवे यांसह मोठ्या संख्येने रिक्षा चालक परिसरातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रस्ता हा कधी कोणामध्ये दुजाभाव करीत नाही.गरीब श्रीमंत,राजा किंवा रंक असा भेदभाव करीत नाही त्यामुळे रस्त्यावरील अपघात हे कोणाच्या तरी चुकीमुळे घडत असतात.त्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करीत आपण छोट्या छोट्या चुका सुधारल्या तर अपघात टळू शकतात.त्यामुळे आपल्याला वाहतूक सुरक्षा सप्ताह साजरा करण्याची वेळच येणार नाही असे सांगत, वाहतूक संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न या सप्ताहाच्या माध्यमातून केला जात असल्याने सप्ताहचा समारोप न करता दर महिना दोन महिन्यांनी विविध विद्यालय, महाविद्यालय, सामाजिक संस्था गृहनिर्माण सोसायटी या ठिकाणी वाहतूक विभागाच्या माध्यमातून जनजागृती करून वाहतूक नियमांचे पालन करणे बाबत नागरिकां मध्ये आव्हान करणार असल्याचे शेवटी डॉ विनायकुमार राठोड यांनी स्पष्ट केले.

 कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत सोंडे यांनी नारपोली वाहतूक शाखे कडून वर्षभरात एक चौक एक समस्या हा उपक्रम हाती घेणार असून त्यातून वर्षभरात अंजुरफाटा ते कशेळी या रस्त्यावरील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत वर्षभरात तब्बल २२ हजार जणांवर कारवाई करून तब्बल ३ कोटी ५० लाख रुपयांचा दंड जमा केला असल्याची माहिती दिली.कार्यक्रमा दरम्यान वाहतूक विभागाला सहकार्य करणाऱ्या सरपंच राजेंद्र मढवी,राजेंद्र भोईर, प्रताप पाटील,पी के म्हात्रे,पप्पू खंडागळे, संतोष साळवी यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कर्णवर पाटील यांनी केले.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस