शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक सुरक्षा सप्ताहाचा समारोप न करता वर्षभर कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती सुरूच ठेवणार : डॉ विनयकुमार राठोड

By नितीन पंडित | Updated: January 12, 2023 18:23 IST

वाहतूक सुरक्षा ही सर्वसामान्य नागरिकांसाठी,वाहन चालकांसाठी आहे, त्यामुळे वाहतूक सुरक्षा सप्ताहचा शुभारंभ जरीकेला असला तरी त्याचा समारोप न करता संपूर्ण वर्षभर या माध्यमातून निरंतर कार्यक्रम सुरूच ठेवणार आहे .

भिवंडी - वाहतूक सुरक्षा ही सर्वसामान्य नागरिकांसाठी,वाहन चालकांसाठी आहे, त्यामुळे वाहतूक सुरक्षा सप्ताहचा शुभारंभ जरीकेला असला तरी त्याचा समारोप न करता संपूर्ण वर्षभर या माध्यमातून निरंतर कार्यक्रम सुरूच ठेवणार आहे, असे प्रतिपादन ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ विनयकुमार राठोड यांनी केले आहे. गुरुवारी ते नारपोली वाहतूक शाखेच्या वतीने आयोजित ३३ व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.या प्रसंगी नारपोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत सोंडे,कल्याण नाका भिवंडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष पाटील,रांजनोली वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास भिंगारदिवे यांसह मोठ्या संख्येने रिक्षा चालक परिसरातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रस्ता हा कधी कोणामध्ये दुजाभाव करीत नाही.गरीब श्रीमंत,राजा किंवा रंक असा भेदभाव करीत नाही त्यामुळे रस्त्यावरील अपघात हे कोणाच्या तरी चुकीमुळे घडत असतात.त्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करीत आपण छोट्या छोट्या चुका सुधारल्या तर अपघात टळू शकतात.त्यामुळे आपल्याला वाहतूक सुरक्षा सप्ताह साजरा करण्याची वेळच येणार नाही असे सांगत, वाहतूक संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न या सप्ताहाच्या माध्यमातून केला जात असल्याने सप्ताहचा समारोप न करता दर महिना दोन महिन्यांनी विविध विद्यालय, महाविद्यालय, सामाजिक संस्था गृहनिर्माण सोसायटी या ठिकाणी वाहतूक विभागाच्या माध्यमातून जनजागृती करून वाहतूक नियमांचे पालन करणे बाबत नागरिकां मध्ये आव्हान करणार असल्याचे शेवटी डॉ विनायकुमार राठोड यांनी स्पष्ट केले.

 कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत सोंडे यांनी नारपोली वाहतूक शाखे कडून वर्षभरात एक चौक एक समस्या हा उपक्रम हाती घेणार असून त्यातून वर्षभरात अंजुरफाटा ते कशेळी या रस्त्यावरील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत वर्षभरात तब्बल २२ हजार जणांवर कारवाई करून तब्बल ३ कोटी ५० लाख रुपयांचा दंड जमा केला असल्याची माहिती दिली.कार्यक्रमा दरम्यान वाहतूक विभागाला सहकार्य करणाऱ्या सरपंच राजेंद्र मढवी,राजेंद्र भोईर, प्रताप पाटील,पी के म्हात्रे,पप्पू खंडागळे, संतोष साळवी यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कर्णवर पाटील यांनी केले.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस