शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
2
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
3
"देशात भाजपा एकटीच 370 पेक्षा जास्त जागा जिंकेल..."; शिवराज सिंह चौहान यांचा मोठा दावा
4
हरियाणामध्ये राजकीय हालचालींना वेग, 'बहुमत चाचणी घ्या', माजी उपमुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मागणी
5
“पराभवाच्या भितीने भांबावल्यानेच नरेंद्र मोदींकडून दररोज असत्य विधाने”; काँग्रेसची टीका
6
राम मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम वेगाने सुरु; ‘असा’ असेल राम दरबार, कधी होणार पूर्ण?
7
नफ़रत नहीं, नौकरी चुनो! 'इंडिया'चे सरकार बनतंय; ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणार : राहुल गांधी
8
"आमचे अणुबॉम्ब कायम सज्ज असतात"; रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची अमेरिकेला खुली धमकी
9
‘पैसे मिळाले नाहीत का तुला? मिळाले नसतील तर...’, भरसभेत अजित पवार यांनी विचारलं आणि...
10
“उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले, मानसोपचार तज्ज्ञांची गरज”: देवेंद्र फडणवीस
11
Lok Sabha Elections 2024 : भावासाठी भाऊ मैदानात! युसूफ पठाणच्या विजयासाठी इरफानने कसली कंबर!
12
शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 1000 तर निफ्टी 350 अंकांनी घसरले, 7 लाख कोटी बुडाले
13
भाजपा नेते सूरज पाल अम्मू यांचा राजीनामा, पत्राद्वारे सांगितलं कारण....
14
दिवसभर केलं शूट, इंटिमेट सीननंतर झाल्या वेदना; 'हीरामंडी' फेम अभिनेत्रीने व्यक्त केलं दु:ख
15
'प्रत्येक गोष्टीला कारण असतं', हास्यजत्रा सोडल्यानंतर गौरव मोरेने चाहत्यांच्या प्रश्नांना दिलं उत्तर
16
"डबल इंजिन सरकारने शेतकरी, मजुरांना डबल झटका दिला; भाजपा संविधानाशी खेळतेय"
17
“बोरिवलीपासून कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूकसेवा लवकरच सुरु करणार”: पीयूष गोयल 
18
जलेबी बाबाचा तुरूंगात मृत्यू! मादक पदार्थ देऊन महिलांवर करायचा बलात्कार, अनेकांना फसवले
19
"हो, कपिल शर्मा शोची कॉपी केली", 'चला हवा येऊ द्या'बाबत निलेश साबळेचं स्पष्ट वक्तव्य
20
Success Story: Google चे सीईओ सुंदर पिचाईंची क्लासमेट, IIT च्या 'त्या' बॅचची एकमेव महिला; आता बनली 'या' कंपन्यांची बॉस

जांभूळ गावात मिळणार 60 भिकाऱ्यांना रोजगार, शासनाकडून दीड कोटींचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 12:17 AM

Thane News : अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये असलेल्या जांभूळ गावातील  ६५ एकर पडीक जमीन आता वर्षभरात भातशेती, फळबागा, फुलबागा, मस्त्यशेतीने बहरणार आहे.

- अजित मांडकेठाणे : अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये असलेल्या जांभूळ गावातील  ६५ एकर पडीक जमीन आता वर्षभरात भातशेती, फळबागा, फुलबागा, मस्त्यशेतीने बहरणार आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा महिला बालविकास विभागाने हे पाऊल उचलले आहे. ११ नोव्हेंबरला या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. जमिनीची मशागत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. त्यानुसार, या ठिकाणी ६० भिकाऱ्यांना रोजगाराची संधी दिली जाणार आहे. त्यासोबतच येथे शेतीची अत्याधुनिक यंत्रेही  दिली गेली आहेत. ज्याचा येथील स्थानिक शेतकऱ्यांना लाभ होणार असून, त्यांना बाजारपेठही उपलब्ध केली जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने हा  उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी शासनाने दीड कोटींचा निधी दिल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.काय काय असेल ६५ एकर जमिनीत ६५ एकरच्या जागेत दोन शेततळी आहेत. या ठिकाणी एका तळ्याचे पाणी हे भातशेती, फळबाग, फुलबागांसाठी वापरले जाणार आहे. दुसऱ्या तळ्यात मत्स्यव्यवसाय केला जाणार आहे, तर ४० एकर जागेत भातलागवड केली जाणार आहे. तीन ते चार प्रकारचा भात येथे घेतला जाणार आहे. २० बाय २० च्या जमिनीत हॉटेलमध्ये जो काही भाजीपाला लागतो, तो येथे पिकवला जाणार आहे. यामध्ये लाल शिमला, मशरूम आदींसह इतर भाजीपाल्याची लागवड केली जाणार आहे. याशिवाय केरळमधील पोलाची जातीचे ५०० नारळ येथे लावले जाणार आहेत. सध्या या जमिनीत आंब्याची झाडे लावली आहेत.स्थानिकांना मिळणार रोजगार आणि शेतीची यंत्रेस्थानिकांना या ठिकाणी रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, शिवाय त्यांना शेतीसाठी जी काही भातकापणी यंत्रे, मळणी यंत्रे, ट्रॅक्टर त्यांच्या शेतात मोफत वापरण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

या ठिकाणी पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी एक समिती नेमली असून, त्याद्वारे काम सुरू झाले आहे आणि लवकरच हे पर्यटन स्थळ म्हणूनही विकसित केले जाणार आहे.- राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे ६५ एकरच्या जागेत विविध प्रकारची भातशेती, फळबागा, फुलबागा, भाजीपाल्याची लागवड केली जाणार आहे. यासाठी एका संस्थेची निवड केली आहे.    - महेंद्र गायकवाड, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी

टॅग्स :agricultureशेतीthaneठाणे