शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
5
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
6
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
7
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
8
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
9
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
10
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
11
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
12
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
13
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
15
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
16
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
17
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
18
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
19
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
20
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र

उल्हासनगर स्मशानभूमीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हटविण्यासाठी आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 17:42 IST

पुतळा न हटविल्यास जण आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने, पुतळ्याचा वाद उफाळण्याची शक्यता निर्माण झाली. 

उल्हासनगर : शहरातील शांतीनगर स्मशानभूमीत विनापरवाना उभारलेला डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा हटविण्याची मागणी नेते श्याम गायकवाड यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस उपायुक्त यांच्याकडे केली. पुतळा न हटविल्यास जण आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने, पुतळ्याचा वाद उफाळण्याची शक्यता निर्माण झाली. 

उल्हासनगर कॅम्प नं-३, शांतीनगर स्मशानभूमीत विनापरवाना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारल्याचा प्रकार उघड झाला. स्मशानभूमी सारख्या निर्जनस्थळी उभारलेल्या पुतळ्या खाली रात्रीचे खेळ रंगत असून ही डॉ आंबेडकर याची घोर विटंबना असल्याचे मत रिपाई व कामगार नेते श्याम गायकवाड यांनी व्यक्त केले. महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, शासकीय कार्यालय, चौक, मैदान, अभ्यासिका आदी ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणे गरजेचे आहे. उल्हासनगरात चक्क समाधानभूमीत पुतळा उभारल्याची घटना देशात पहिली असून याबाबत गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली. उल्हासनगर शहर हे आंबेडकर चळवळीचे केंद्र असून अश्या शहरांत डॉ आंबेडकर यांची होत असलेली विटंबना कशी काय खपवून घेतकी जाते. याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

महापालिका पुतळ्याबाबत अनभिज्ञ?

महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्याकडे संपर्क केला असता झाला नाही. तर जनसंपर्क अधिकारी अजय साबळे यांनी याबाबत माहिती घेऊन सांगतो. असे उत्तर दिले. आरोग्य वैधकीय अधिकारी डॉ मोहिनी धर्मा यांनी याबाबत सांगण्यास नकार दिला. एकूणच महापालिका आयुक्त व अधिकारी पुतळ्याबाबत अनभिंज्ञ असल्याचे दिसून आले.

पोलीस उपायुक्त घेतात माहिती 

शांतीनगर स्मशानभूमीत उभारण्यात आलेल्या पुतळा हटविण्याबाबत पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनाही श्याम गायकवाड यांनी निवेदन दिले. गोरे यांनी पुतळा बाबत महापालिका व इतर स्रोत मार्फत माहिती घेत असल्याचे सांगितले.

स्थानिक नागरिकांनी उभारला पुतळा...राजेंद्र चौधरी 

शिवसेना शिंदेगटाचे महानगरप्रमुख व स्थानिक माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी स्मशानभूमीत स्थानिक नागरिकांनी पुतळा बसवीला. अशी शक्यता व्यक्त केली. पुतळ्याच्या खाली खासदार श्रीकांत शिंदे व राजेंद्र चौधरी यांच्या सौजन्याने असे लिहले आहे. 

आंबेडकरी नेते गप्प? 

शांतीनगर स्मशानभूमी सारख्या निर्जनस्थळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विनापरवाना पुतळा उभारला आहे. भविष्यात याठिकाणी अनुचित घटना घडल्यास, जबाबदार कोण? असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र शहरातील आंबेडकरी नेते गप्प असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर