शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

उल्हासनगर स्मशानभूमीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हटविण्यासाठी आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 17:42 IST

पुतळा न हटविल्यास जण आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने, पुतळ्याचा वाद उफाळण्याची शक्यता निर्माण झाली. 

उल्हासनगर : शहरातील शांतीनगर स्मशानभूमीत विनापरवाना उभारलेला डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा हटविण्याची मागणी नेते श्याम गायकवाड यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस उपायुक्त यांच्याकडे केली. पुतळा न हटविल्यास जण आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने, पुतळ्याचा वाद उफाळण्याची शक्यता निर्माण झाली. 

उल्हासनगर कॅम्प नं-३, शांतीनगर स्मशानभूमीत विनापरवाना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारल्याचा प्रकार उघड झाला. स्मशानभूमी सारख्या निर्जनस्थळी उभारलेल्या पुतळ्या खाली रात्रीचे खेळ रंगत असून ही डॉ आंबेडकर याची घोर विटंबना असल्याचे मत रिपाई व कामगार नेते श्याम गायकवाड यांनी व्यक्त केले. महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, शासकीय कार्यालय, चौक, मैदान, अभ्यासिका आदी ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणे गरजेचे आहे. उल्हासनगरात चक्क समाधानभूमीत पुतळा उभारल्याची घटना देशात पहिली असून याबाबत गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली. उल्हासनगर शहर हे आंबेडकर चळवळीचे केंद्र असून अश्या शहरांत डॉ आंबेडकर यांची होत असलेली विटंबना कशी काय खपवून घेतकी जाते. याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

महापालिका पुतळ्याबाबत अनभिज्ञ?

महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्याकडे संपर्क केला असता झाला नाही. तर जनसंपर्क अधिकारी अजय साबळे यांनी याबाबत माहिती घेऊन सांगतो. असे उत्तर दिले. आरोग्य वैधकीय अधिकारी डॉ मोहिनी धर्मा यांनी याबाबत सांगण्यास नकार दिला. एकूणच महापालिका आयुक्त व अधिकारी पुतळ्याबाबत अनभिंज्ञ असल्याचे दिसून आले.

पोलीस उपायुक्त घेतात माहिती 

शांतीनगर स्मशानभूमीत उभारण्यात आलेल्या पुतळा हटविण्याबाबत पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनाही श्याम गायकवाड यांनी निवेदन दिले. गोरे यांनी पुतळा बाबत महापालिका व इतर स्रोत मार्फत माहिती घेत असल्याचे सांगितले.

स्थानिक नागरिकांनी उभारला पुतळा...राजेंद्र चौधरी 

शिवसेना शिंदेगटाचे महानगरप्रमुख व स्थानिक माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी स्मशानभूमीत स्थानिक नागरिकांनी पुतळा बसवीला. अशी शक्यता व्यक्त केली. पुतळ्याच्या खाली खासदार श्रीकांत शिंदे व राजेंद्र चौधरी यांच्या सौजन्याने असे लिहले आहे. 

आंबेडकरी नेते गप्प? 

शांतीनगर स्मशानभूमी सारख्या निर्जनस्थळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विनापरवाना पुतळा उभारला आहे. भविष्यात याठिकाणी अनुचित घटना घडल्यास, जबाबदार कोण? असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र शहरातील आंबेडकरी नेते गप्प असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर