शहरं
Join us  
Trending Stories
1
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
2
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
3
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
4
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
5
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
6
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
7
आयकर विभागाचा मोठा छापा; हवाला व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांकडून २५ कोटींची रोकड, हिरे, सोनं जप्त
8
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
9
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
10
'मी केदारनाथला गेल्यावर..'; सुशांतच्या बहिणीची भावूक पोस्ट, फोटो शेअर करत सांगितलं खास कनेक्शन
11
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
12
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
13
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
14
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
15
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
17
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
18
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
19
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
20
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली

कल्याणमध्ये इमारतीची संरक्षक भिंत कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 4:27 AM

कल्याण : शहरात बुधवारी पडलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. विविध ठिकाणी घरांत पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. ...

कल्याण : शहरात बुधवारी पडलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. विविध ठिकाणी घरांत पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. या पावसामुळे कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरातील पांडे बंगल्यासमोर एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळली. मात्र, या घटनेत जीवितहानी झालेली नाही.

पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाणी साचल्याने वाहनचालकांसह नागरिकांना वाहत्या पाण्यातून वाट काढावी लागली. चक्कीनाका परिसरानजीक असलेल्या दामोदर नगरातील नागरिकांच्या घरांत पाणी शिरले. त्यामुळे त्यांना सकाळपासून दुपारपर्यंत घरातील पाणी उपसावे लागले. चिकणघर परिसरातील नागरिकांच्याही घरात पाणी शिरले. कल्याण रेल्वेस्टेशन परिसरातील तहसीलदार कार्यालय आणि कल्याण न्यायालयाच्या नजीक पाणी साचले होते. नाल्याच्या जुन्या इमारतीची तौक्ते वादळामुळे पडझड झाली होती. आज न्यायालयास साचलेल्या पाण्याचा सामना करावा लागला.

पूर्वेतील ऑस्टीन नगरातील घरांतही पाणी शिरल्याने तेथे माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी धाव घेतली. यासंदर्भात प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही नालेसफाई केली नसल्याने पहिल्या पावसात नागरिकांच्या घरांत पाणी शिरले. त्याला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.

नालेसफाईचा दावा फोल

केडीएमसीने मोठ्या ९४ नाल्यांच्या सफाईच्या कामावर सव्वातीन कोटी रुपये खर्च केले आहेत. त्याचबरोबर लहान नाल्यांची सफाई केल्याचा दावा केला होता. तरीही सखल भागांत पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नालेसफाईचा दावा पहिल्या पावसात फोल ठरल्याचे उघड झाले.

--------------------