शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

फेरीवाल्यांना बेकायदेशीर वीज पुरवठा करणाऱ्या माफियांना वीज कंपन्यासह पालिका अन् पोलिसांकडून संरक्षण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2021 16:28 IST

वीज पुरवठ्यासाठी एका बल्बचे दररोजचे ५० रुपयांपासून अधिकचे भाडे वसुली केली जात असून फेरीवाल्यांच्या आड विज पुरवण्याचा आणखी एक धंदा समोर आला आहे. 

मीरारोड - मीरा भाईंदर शहरातील मुख्य रस्ते नाके वर्दळीच्या ठिकाणी अतिक्रमण करून बसलेल्या फेरीवाल्यांना एकीकडे संरक्षण दिले जात असतानाच सदर फेरीवाल्यांना बेकायदेशीरपणे वीज पुरवठा करणाऱ्या पुरवठादार माफियांना व वीज कंपन्याना महापालिकेसह राजकारणी, पोलिसांचे संरक्षण मिळत आले आहे. वीज पुरवठ्यासाठी एका बल्बचे दररोजचे ५० रुपयांपासून अधिकचे भाडे वसुली केली जात असून फेरीवाल्यांच्या आड विज पुरवण्याचा आणखी एक धंदा समोर आला आहे. 

रेल्वे स्थानकापासून च्या १५० मीटर परिसरात तसेच रुग्णालय,शैक्षणिक संकुल, धार्मिक स्थळांच्या १०० मीटर परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास मनाई आहे. शिवाय महापालिकेने पूर्वीच शहरातील मुख्य रस्ते व नाके हे ना फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित केलेले आहेत. तसे असले तरी प्रत्यक्षात मात्र ह्या सर्व नियम - निर्देशांचे उल्लंघन करून शहरातील वर्दळीच्या ठिकाणी फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेले आहे. रस्ते व पदपथ फेरीवाल्यांच्या  विळख्यात गेले असताना महापालिका प्रशासनासह नगरसेवक व राजकारणी मात्र जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहेत. या मुळे शहरात रहदारी व वाहतुक समस्या गंभीर बनली आहे. नागरिकांना हक्काचे असलेले रस्ते - पदपथ हे त्यांच्यासाठी राहिलेले नाही.

बाजार वसुली करणारे ठेकेदार फेरीवाले जेवढे वाढतील तेवढी वसुली वाढते.  हातगाडी भाड्याने देणाऱ्यां पासून जागेचे भाडे घेणारे, हप्ते घेणारे आदींचे उखळ पांढरे होत असताना शहराची कोंडी होऊन नागरिक मेटाकुटीला आले आहेत. त्यातच आता फेरीवाल्यांना मोठ्या प्रमाणात केल्या जाणाऱ्या बेकायदेशीर वीज पुरवठ्या प्रकरणी वीज कंपन्या, महापालिका, पोलीस व राजकारणी यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे. 

फेरीवाल्यांना बेकायदेशीर पणे वीज पुरवठा केला जात आहे. शहरातील फेरीवाल्यां कडे बल्ब आदी लावण्यासाठी वीज पुरवठा होत आहे. एका बल्ब साठी रोजचे किमान ५० रुपये वा अधिक रक्कम बेकायदा वीज पुरवणाऱ्यां माफियां कडून वसूल केली जात आहे. एका वेळेस अनेक फेरीवाल्यांना वीज पुरवठा करून वर्षाला लाखो रुपये हे वीज माफिया कमवत आहेत.  

या फेरीवाल्यांना त्या भागातील दुकानदार, बेकायदा धार्मिक स्थळ वाले, काही रहिवाशी आदी चोरीने वीज पुरवठा करत आहेत. या बेकायदा वीज पुरवठ्यातून काही कोटींची उलाढाल होत असून उघडपणे बेकायदा वीज पुरवठा होत असताना देखील वीज कंपन्या सुद्धा डोळेझाक करत असल्याने त्यांचे खिसे सुद्धा भरत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या बेकायदेशीर वीज पुरवठ्या मुळे दुर्घटना घडल्यास जबाबदारी कोणाची असा प्रश्न केला जात आहे. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक