शहरं
Join us  
Trending Stories
1
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
2
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
3
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
4
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
5
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
6
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
7
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
8
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
9
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
10
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
11
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
12
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
13
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
14
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!
15
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
16
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
17
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीला पुन्हा होणार होते 'ट्विन्स', पण एकाचा झाला मृत्यू; भावुक पोस्ट
18
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
19
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
20
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!

बोगस भूसंपादनातून धनदांडग्यांची ‘समृद्धी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 00:05 IST

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनींची खरेदी बनावट कागदपत्रांनी करून शेतक-यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचा आरोप करून भिवंडीसह शहापूर आणि कल्याण येथील शेतकरी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

ठाणे : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनींची खरेदी बनावट कागदपत्रांनी करून शेतक-यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचा आरोप करून भिवंडीसह शहापूर आणि कल्याण येथील शेतकरी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची लाचलुचपत विभागाकडून चौकशी केली, तर धनदांडग्यांनी बनावट कागदपत्रांद्वारे आपली कोट्यवधींची समृद्धी कशी केली, याचा घोटाळा उघडकीस येईल, असा दावा उपोषणकर्त्यांनी केला.शासकीय विश्रामगृहासमोर या शेतकºयांनी उपोषण सुरू केले आहे. समृद्धी महामार्गातील भ्रष्टाचाराविरोधात, शेतकºयांच्या झालेल्या बेकायदेशीर खरेदीखत, संबंधित अधिकाºयांकडून होणारी मुजोरी व फसवणूक बाधित शेतकºयांवर बेकायदेशीर दाखल झालेल्या गुन्ह्यांविरोधात जिल्ह्यातील समृद्धीत बाधित शेतकºयांच्या न्याय्य हक्कासाठी हे बेमुदत उपोषण सुरू केल्याचे या शेतकºयांनी सांगितले. या उपोषणाची त्वरित दखल घेऊन संबंधित अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावेळी या उपोषणकर्त्यांना आमदार किसन कथोरे यांनीदेखील भेट दिली. या व्यासपीठावर धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांच्यासह फसवणूक झालेले शेतकरी व समाज कार्यकर्त्यांनीदेखील या उपोषणात सहभाग घेतला.शेतकºयांची फसवणूक झाल्याची अधिकाºयांकडे तक्रार करूनही न्याय मिळालेला नाही. मात्र, अधिकाºयांच्या दलालांकडून छळवणूक सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे शेतकºयांच्या जीवितास धोका निर्माण झालेला असतानाही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचे या भिवंडी येथील कैलास ढमणे यांनी सांगितले. आमच्या ढमणे परिवारासह जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी, कल्याण येथील फसवणूक झालेले शेतकरीदेखील या बेमुदत उपोषणात सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हाधिकाºयांनी याप्रकरणी चौकशी करुन कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर सोमवारी उशिरा उपोषण स्थगित करण्यात आले.>भूसंपादन अधिकाºयासह तहसीलदारांची चौकशी हवीसमृद्धी मार्गात बाधित झालेल्या घरांचा मोबदला त्वरित देण्यात यावा, चिराडपाड्यात काही बेकायदेशीर केलेले जमिनीचे खरेदीखत रद्द करावे, विशेष भूसंपादन अधिकारी, कम्युनिकेटर प्रकाश गायकर, निलेश भोईर व इतर यांचे व त्यांच्या नातेवाइकांच्या सर्व आर्थिक व्यवहारांची स्वायत्त यंत्रणेमार्फत चौकशी करावी. भिवंडी आणि शहापूर तहसीलदारांची खोट्या व बोगस खरेदीखतप्रकरणी लाचलुचपत विभागाकडून चौकशी करण्याची मागणीदेखील या उपोषणाच्या माध्यमातून या शेतकºयांनी केली आहे

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग