शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

बोगस भूसंपादनातून धनदांडग्यांची ‘समृद्धी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 00:05 IST

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनींची खरेदी बनावट कागदपत्रांनी करून शेतक-यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचा आरोप करून भिवंडीसह शहापूर आणि कल्याण येथील शेतकरी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

ठाणे : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनींची खरेदी बनावट कागदपत्रांनी करून शेतक-यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचा आरोप करून भिवंडीसह शहापूर आणि कल्याण येथील शेतकरी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची लाचलुचपत विभागाकडून चौकशी केली, तर धनदांडग्यांनी बनावट कागदपत्रांद्वारे आपली कोट्यवधींची समृद्धी कशी केली, याचा घोटाळा उघडकीस येईल, असा दावा उपोषणकर्त्यांनी केला.शासकीय विश्रामगृहासमोर या शेतकºयांनी उपोषण सुरू केले आहे. समृद्धी महामार्गातील भ्रष्टाचाराविरोधात, शेतकºयांच्या झालेल्या बेकायदेशीर खरेदीखत, संबंधित अधिकाºयांकडून होणारी मुजोरी व फसवणूक बाधित शेतकºयांवर बेकायदेशीर दाखल झालेल्या गुन्ह्यांविरोधात जिल्ह्यातील समृद्धीत बाधित शेतकºयांच्या न्याय्य हक्कासाठी हे बेमुदत उपोषण सुरू केल्याचे या शेतकºयांनी सांगितले. या उपोषणाची त्वरित दखल घेऊन संबंधित अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावेळी या उपोषणकर्त्यांना आमदार किसन कथोरे यांनीदेखील भेट दिली. या व्यासपीठावर धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांच्यासह फसवणूक झालेले शेतकरी व समाज कार्यकर्त्यांनीदेखील या उपोषणात सहभाग घेतला.शेतकºयांची फसवणूक झाल्याची अधिकाºयांकडे तक्रार करूनही न्याय मिळालेला नाही. मात्र, अधिकाºयांच्या दलालांकडून छळवणूक सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे शेतकºयांच्या जीवितास धोका निर्माण झालेला असतानाही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचे या भिवंडी येथील कैलास ढमणे यांनी सांगितले. आमच्या ढमणे परिवारासह जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी, कल्याण येथील फसवणूक झालेले शेतकरीदेखील या बेमुदत उपोषणात सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हाधिकाºयांनी याप्रकरणी चौकशी करुन कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर सोमवारी उशिरा उपोषण स्थगित करण्यात आले.>भूसंपादन अधिकाºयासह तहसीलदारांची चौकशी हवीसमृद्धी मार्गात बाधित झालेल्या घरांचा मोबदला त्वरित देण्यात यावा, चिराडपाड्यात काही बेकायदेशीर केलेले जमिनीचे खरेदीखत रद्द करावे, विशेष भूसंपादन अधिकारी, कम्युनिकेटर प्रकाश गायकर, निलेश भोईर व इतर यांचे व त्यांच्या नातेवाइकांच्या सर्व आर्थिक व्यवहारांची स्वायत्त यंत्रणेमार्फत चौकशी करावी. भिवंडी आणि शहापूर तहसीलदारांची खोट्या व बोगस खरेदीखतप्रकरणी लाचलुचपत विभागाकडून चौकशी करण्याची मागणीदेखील या उपोषणाच्या माध्यमातून या शेतकºयांनी केली आहे

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग