शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

मीरा भाईंदर मधील ५०० फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफी ठरले एप्रिल फुल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 21:54 IST

मुंबई महापालिकेने ५०० फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ केला आहे. तसाच करमाफीचा निर्णय ठाणे व नवी मुंबई महापालिकेने घेतला आहे.

धीरज परब / मीरारोड - मीरा भाईंदर मधील नागरिकांच्या ५०० चौ . फुटां पर्यंतच्या घरांना मालमता कर माफी म्हणजे निव्वळ एप्रिल फुल ठरणार आहे . कारण नागरिकांना कर माफी देण्यास प्रशासनाने नकार दिला असतानाच दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी शासना कडून अनुदान मिळाले तरच कर माफ करण्याचे ३० मार्चच्या महासभेत स्पष्ट केले आहे . त्यामुळे मुंबई प्रमाणे मीरा भाईंदर मधील घरांना करमाफी मिळणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. 

मुंबई महापालिकेने ५०० फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ केला आहे . तसाच करमाफीचा निर्णय ठाणे व नवी मुंबई महापालिकेने घेतला आहे. आमदार प्रताप सरनाईक व गीता जैन सह विरोधी पक्ष नेते धनेश पाटील आदींनी करमाफीची मागणी  केल्या नंतर  महापौर ज्योत्सना हसनाळे  यांनी महासभेत विषय घेतला होता . परंतु सत्ताधारी भाजपने ५०० फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा ठराव महासभेत बहुमताने मंजूर करताना शासन कडून अनुदान मागितले होते . 

वास्तविक मुंबई, ठाणे , नवी मुंबई ह्या महापालिकांनी कर माफीसाठी शासना कडून अनुदान मागितलेले नसताना मीरा भाईंदर पालिकेला शासन अनुदान देईल ह्याची शक्यता नाही याची कल्पना सत्ताधारी व विरोधकांसह प्रशासनाला सुद्धा असावी. भाजपा कडून, सेनेच्या आमदारांनी शासना कडून करमाफीसाठी अनुदान आणावे अशी भूमिका घेत सेने आणि शासनावर करमाफीचा चेंडू टोलवला . तर महापालिकेत सत्ता भाजपाची असून करोडोंची उधळपट्टी आणि बड्या थकबाकीदार , ठेकेदार आदीं कडील थकबाकी वसूल न करणाऱ्या भाजपाने नागरिकांना कर माफी देण्याची पालिकेची जबाबदारी झटकल्याची टीका शिवसेनेने केली होती . मुंबई , ठाणे , नवी मुंबई पालिकांनी शासना कडे अनुदान मागितले नाही कारण ती पालिकेची जबाबदारी असल्याचे सेनेने म्हटले होते . 

 

दरम्यान पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी पालिकेचे १०९ कोटींचे नुकसान होणार असल्याने खर्च भागवणे अवघड होईल व करमाफी देणे उचित नाही असे स्पष्ट करत करमाफीला खीळ लावली .  त्यातच भाजपाने पालिकेच्या अर्थसंकल्पात देखील मालमत्ता करमाफीसाठी शासना कडून ११० कोटींचे अनुदान मिळेल असे नमूद केले आहे . त्यामुळे मीरा भाईंदर मध्ये ५०० फुटां पर्यंतच्या घरांना करमाफी मिळणे निव्वळ एप्रिल फुल ठरणार आहे. या आधी कोरोना काळात प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नागरिकांना ५० टक्के करमाफी सुद्धा पालिकेने दिली नाही . परंतु दुसरीकडे बड्या थकबाकीदारांना मात्र तब्बल ७५ टक्के व्याज माफी देण्यात आली . 

राकेश शाह ( सभापती स्थायी समिती ) - महासभेतील  ठराव नुसार अर्थसंकल्पात शासन कडून ११० कोटींचे अनुदान मिळेल असे नमूद केले आहे . शहरातील शिवसेनेच्या दोन आमदारांनी शासना कडून अनुदान आणल्या नंतर नागरिकांना मालमत्ता कर माफी दिली जाईल. धनेश पाटील ( विरोधीपक्ष नेते ) - मीरा भाईंदरच्या नागरिकांना करमाफी देण्याची भाजपाची नियत व दानत नाही . २२५० कोटींचा अर्थसंकल्प बनवणाऱ्या भाजपाला नागरिकांसाठी १०० कोटींची करमाफी द्यायची नाही. कारण त्यांना मनमानी ठेके देणे व उधळपट्टी करण्यात स्वारस्य आहे . या आधी कोरोना काळात सुद्धा नागरिकांना ५० टक्के करमाफी भाजपाने दिली नाही . 

 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर