शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
5
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
6
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
7
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
8
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
9
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
10
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
11
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
12
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
13
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
15
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
16
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
17
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
18
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
19
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
20
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!

मीरा भाईंदर मधील ५०० फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफी ठरले एप्रिल फुल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 21:54 IST

मुंबई महापालिकेने ५०० फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ केला आहे. तसाच करमाफीचा निर्णय ठाणे व नवी मुंबई महापालिकेने घेतला आहे.

धीरज परब / मीरारोड - मीरा भाईंदर मधील नागरिकांच्या ५०० चौ . फुटां पर्यंतच्या घरांना मालमता कर माफी म्हणजे निव्वळ एप्रिल फुल ठरणार आहे . कारण नागरिकांना कर माफी देण्यास प्रशासनाने नकार दिला असतानाच दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी शासना कडून अनुदान मिळाले तरच कर माफ करण्याचे ३० मार्चच्या महासभेत स्पष्ट केले आहे . त्यामुळे मुंबई प्रमाणे मीरा भाईंदर मधील घरांना करमाफी मिळणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. 

मुंबई महापालिकेने ५०० फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ केला आहे . तसाच करमाफीचा निर्णय ठाणे व नवी मुंबई महापालिकेने घेतला आहे. आमदार प्रताप सरनाईक व गीता जैन सह विरोधी पक्ष नेते धनेश पाटील आदींनी करमाफीची मागणी  केल्या नंतर  महापौर ज्योत्सना हसनाळे  यांनी महासभेत विषय घेतला होता . परंतु सत्ताधारी भाजपने ५०० फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा ठराव महासभेत बहुमताने मंजूर करताना शासन कडून अनुदान मागितले होते . 

वास्तविक मुंबई, ठाणे , नवी मुंबई ह्या महापालिकांनी कर माफीसाठी शासना कडून अनुदान मागितलेले नसताना मीरा भाईंदर पालिकेला शासन अनुदान देईल ह्याची शक्यता नाही याची कल्पना सत्ताधारी व विरोधकांसह प्रशासनाला सुद्धा असावी. भाजपा कडून, सेनेच्या आमदारांनी शासना कडून करमाफीसाठी अनुदान आणावे अशी भूमिका घेत सेने आणि शासनावर करमाफीचा चेंडू टोलवला . तर महापालिकेत सत्ता भाजपाची असून करोडोंची उधळपट्टी आणि बड्या थकबाकीदार , ठेकेदार आदीं कडील थकबाकी वसूल न करणाऱ्या भाजपाने नागरिकांना कर माफी देण्याची पालिकेची जबाबदारी झटकल्याची टीका शिवसेनेने केली होती . मुंबई , ठाणे , नवी मुंबई पालिकांनी शासना कडे अनुदान मागितले नाही कारण ती पालिकेची जबाबदारी असल्याचे सेनेने म्हटले होते . 

 

दरम्यान पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी पालिकेचे १०९ कोटींचे नुकसान होणार असल्याने खर्च भागवणे अवघड होईल व करमाफी देणे उचित नाही असे स्पष्ट करत करमाफीला खीळ लावली .  त्यातच भाजपाने पालिकेच्या अर्थसंकल्पात देखील मालमत्ता करमाफीसाठी शासना कडून ११० कोटींचे अनुदान मिळेल असे नमूद केले आहे . त्यामुळे मीरा भाईंदर मध्ये ५०० फुटां पर्यंतच्या घरांना करमाफी मिळणे निव्वळ एप्रिल फुल ठरणार आहे. या आधी कोरोना काळात प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नागरिकांना ५० टक्के करमाफी सुद्धा पालिकेने दिली नाही . परंतु दुसरीकडे बड्या थकबाकीदारांना मात्र तब्बल ७५ टक्के व्याज माफी देण्यात आली . 

राकेश शाह ( सभापती स्थायी समिती ) - महासभेतील  ठराव नुसार अर्थसंकल्पात शासन कडून ११० कोटींचे अनुदान मिळेल असे नमूद केले आहे . शहरातील शिवसेनेच्या दोन आमदारांनी शासना कडून अनुदान आणल्या नंतर नागरिकांना मालमत्ता कर माफी दिली जाईल. धनेश पाटील ( विरोधीपक्ष नेते ) - मीरा भाईंदरच्या नागरिकांना करमाफी देण्याची भाजपाची नियत व दानत नाही . २२५० कोटींचा अर्थसंकल्प बनवणाऱ्या भाजपाला नागरिकांसाठी १०० कोटींची करमाफी द्यायची नाही. कारण त्यांना मनमानी ठेके देणे व उधळपट्टी करण्यात स्वारस्य आहे . या आधी कोरोना काळात सुद्धा नागरिकांना ५० टक्के करमाफी भाजपाने दिली नाही . 

 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर