शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

सायकलच्या माध्यमातून पर्यावरणाचा प्रचार करणे ही काळाची गरज -राज्यमंत्री रवींद्र चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2018 12:27 IST

सायकलने आरोग्याची गुरुकिल्ली दिली आहे . याच सायकल च्या माध्यमातून पर्यावरणाचा प्रचार आणि प्रसार करणे ही काळची गरज आहे असे  प्रतिपादन बंदरे व विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत पार पडलेल्या पहिल्या वहिल्या सायकल मित्र संमेलनात केले .

डोंबिवली: सायकलने आरोग्याची गुरुकिल्ली दिली आहे . याच सायकल च्या माध्यमातून पर्यावरणाचा प्रचार आणि प्रसार करणे ही काळची गरज आहे असे  प्रतिपादन बंदरे व विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत पार पडलेल्या पहिल्या वहिल्या सायकल मित्र संमेलनात केले . येथील सावित्रीबाई फ़ुले कलामंदिरात या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. चार सत्रात पार पडणाऱ्या या संमेलनाचे उदघाटन चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले . या वेळेस क्रीडा भारती संस्थेचे राज चौधरी, संमेलनाचे  आयोजक कमलाकर क्षीरसागर , पदभनाभ गोखले, ऋषीकेश यादव ,डॉ सुनील पुणतांबेकर उपस्थित होते . क्रीडाभारती ,नॅशनल युथ ऑर्गनायझेशन ,आणि डोंबिवली सायकल क्लब यांनी या संमेलनाचे आयोजन केले आहे. चव्हाण पुढे म्हणाले सायकलीमधून वीज निर्मिती होते आणि त्यातून रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते हे निश्चितच चांगली गोष्ट आहे . स्मार्ट सिटी अंतर्गत सायकल स्वारांसाठी विशेष प्लॅन आखला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले . लहानपणापासूनच सायकलशी नाते जडले. आमच्या वेळी भाड्याने सायकल घेण्याची पद्धत होती ,सायकल शिकताना एक वेगळाच आनंद मिळायचा . परंतु आजच्या घडीला सायकल चालवताना मुले सहसा दिसून येत नाही .डोंबिवली शहराने दर वेळेला नवीन उपक्रमाचा पायंडा घातला आहे .पहिले सायकल मित्र संमेलन हा त्याचाच एक भाग आहे असे चव्हाण म्हणाले. आनंदासाठी खेळा हे ब्रीद वाक्य क्रीडा भारती चे असून अशी संमेलन जिल्हा स्तरावर झाली पाहिजेत .सायकल हा आनंद देणारा व्यायाम आहे . कॉपीपेस्ट च्या जमान्यात अशा प्रकारची संमेलन आयोजित करून नवनिर्मिती चे प्रयोग केले पाहिजेत .सायकल ही  पर्यावरणाची गरज असून हीचा मोठ्या प्रमाणावर वापर व्हावा असे आवाहन क्रीडा भारती चे महामंत्री राज चौधरी यांनी यावेळी केले . मुंबईत ज्या प्रमाणे दरवर्षी दुर्ग मित्र संमेलन आयोजित केले जाते . त्याच प्रमाणे डोंबिवलीत प्रतिवर्षी सायकल मित्र संमेलन होईल असे आयोजक कमलाकर क्षीरसागर यांनी सांगितले .  चार सत्रात हे संमेलन पार पडणार असून राज्यातील विविध सायकल क्लब चे प्रतिनिधी आणि विक्रमवीर सायकलपटूंनी उपस्थित लावली आहे .