शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
3
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
4
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
5
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
6
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
9
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
10
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
11
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
12
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
13
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
14
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
15
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
16
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम

नियोजनशून्य मनपा प्रशासनामुळे रखडले प्रकल्प, रवींद्र चव्हाण यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 02:37 IST

Dombivali News : डाेंबिवली : शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी कोपर, ठाकुर्ली व माणकोली उड्डाणपूल आणि रिंगरोड प्रकल्प लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. या प्रकल्पांसाठी युती सरकारने भरघोस निधी व सर्व मंजुऱ्या दिल्या आहेत. मात्र, तरीही प्रकल्प रखडले आहेत.

डाेंबिवली : शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी कोपर, ठाकुर्ली व माणकोली उड्डाणपूल आणि रिंगरोड प्रकल्प लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. या प्रकल्पांसाठी युती सरकारने भरघोस निधी व सर्व मंजुऱ्या दिल्या आहेत. मात्र, तरीही प्रकल्प रखडले आहेत. त्याला केडीएमसी प्रशासनातील अधिकाऱ्यांचा ढिसाळ कारभार व अधिकाऱ्यांच्या कामाचा लेखाजोखा ठेवणारे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी तितकेच जबाबदार आहेत, अशी टीका भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी केली.डोंबिवली पूर्वेतील सूतिकागृह, पाटकर प्लाझामधील पार्किंग, प्रभाग कार्यालयाचे नूतनीकरण व तेथील वाहनतळ, कोपर उड्डाणपूल, आयरे येथील ड्रेनेजचे पम्पिंग स्टेशन, ठाकुर्ली उड्डाणपूल, पश्चिमेतील बावनचाळ येथे पथदिव्यांची गरज, मच्छी मार्केट, महात्मा फुले रस्त्याचे काँक्रिटीकरण व मोठागाव-माणकोली उड्डाणपूल या सर्व अर्धवट विकासकामांची चव्हाण यांनी बुधवारी पाहणी केली.त्यानंतर चव्हाण म्हणाले, केडीएमसीचा कारभार सध्या प्रशासक म्हणून आयुक्तांच्या हाती आहे. आता त्यांनी स्वतःचे कौशल्य पणाला लावावे. आता तर कोणताही राजकीय दबाव असण्याचा प्रश्न येत नाही? युतीच्या काळात मी रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री असताना सूर्यवंशी तेथे जिल्हाधिकारी होते. आम्ही दोघांनी तेथे विकासकामे केली.  केडीएमसीतही तशी कामे होतील, अशी अपेक्षा होती. परंतु, त्या पद्धतीने काम होत नाही. आयुक्त हे खूप सकारात्मक आहेत, पण त्यांच्या हाताखालचे अधिकारी हे अकार्यक्षम असल्याची टीका त्यांनी केली.