शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची पद्धत जीवघेणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 00:53 IST

केडीएमसीचा निष्काळजीपणा : रोगापेक्षा इलाज भयंकर असल्याची नागरिकांची प्रतिक्रिया

डोंबिवली : ठाकुर्लीतील ९० फूट रोडवरील खड्डेमय रस्ता सुस्थितीत आणण्यासाठी अद्याप केडीएमसीला मुहूर्तच सापडलेला नसताना जेथे काही कामानिमित्त खोदकाम चालू आहे, तेथील काम झाल्यावर खड्डे योग्य रीतीने भरले जात नसल्याचे चित्र येथील कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्यावर पाहायला मिळत आहे. यात एखाद्या वाहनाला अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

ठाकुर्लीतील ९० फूट रोडची स्थिती सध्या अत्यंत दयनीय आहे. खंबाळपाडा येथून म्हसोबा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असताना त्याची डागडुजी पावसाने उघडीप देऊनही केलेली नाही. त्यामुळे येथे खड्ड्यांच्या त्रासासह धुळीचा प्रचंड त्रास वाहनचालक आणि पादचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. दरम्यान, कल्याणकडे जाणारा कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्ताही आता वाहनांसाठी धोकादायक झाला आहे. येथे कचोरेकडे जाणाºया रस्त्यावर चढणीचा रस्ता जेथे संपतो, त्याच्या अगदी तोंडावर काही कामासाठी खोदकाम करण्यात आले होते. काम झाल्यावर खोदलेला रस्ता मातीचा भराव टाकून बुजवण्यात आला. दरम्यान, टाकलेला मातीचा ढीग वरच राहिला असून त्यावर वाहन आदळू नये म्हणून एका झाडाची छोटी फांदी त्यात रोवण्यात आली आहे. रेल्वे समांतर रस्ता काही अंशी सुस्थितीत आहे. त्यामुळे येथून भरधाव वेगात काही चालक वाहने चालवत असतात. चढणीच्या रस्त्यावर वाहनाचा वेग जास्त असल्यास अपघात होण्याची शक्यता आहे. अन्यत्र ठिकाणी पावसाळ्यात पडलेल्या खड्ड्यांचा त्रास कायम असताना कामांसाठी खोदकाम केलेले रस्तेही योग्यरीत्या बुजवले जात नाहीत, हे वास्तव येथे पाहायला मिळत आहे.खड्डे कधी बुजणार?ठाकुर्लीतील म्हसोबा चौक ते पंचायत बावडी या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. पण, या मार्गावरील हनुमान मंदिराजवळ पडलेले खड्डे डांबराने भरण्यात आलेले नाहीत. आधीच हा रस्ता चिंचोळा असून त्यात खड्डेही भरले जात नसल्याने येथे सकाळ, संध्याकाळ सातत्याने वाहतूककोंडीचे चित्र दिसून येते.

कामांचा दर्जा निकृष्टपंचायत बावडीपासून ते महिला समिती विद्यालयापर्यंत पडलेले खड्डे महापालिकेकडून बुजवण्यात आले खरे, पण कामांच्या काही ठिकाणी डांबर निघायला सुरुवात झाल्याने कामांचा दर्जा निकृष्ट असल्याचे समोर आले आहे.