शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
4
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
7
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
8
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
9
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
10
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
11
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
12
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
13
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
14
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
15
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
16
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
17
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
18
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
19
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
20
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी

मतदान केंद्रांवर समस्यांची भरमार, शिक्षकांनी वाचला पाढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 02:14 IST

: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी विविध मतदान केंद्रांवर ड्युटी बजावलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना निवडणूक यंत्रणेच्या नियोजनशून्य कारभारामुळे असुविधांचा सामना करावा लागला.

ठाणे : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी विविध मतदान केंद्रांवर ड्युटी बजावलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना निवडणूक यंत्रणेच्या नियोजनशून्य कारभारामुळे असुविधांचा सामना करावा लागला. मुख्यत्वे महिला कर्मचाऱ्यांची यावेळी मोठी गैरसोय झाली. त्यामुळे निवडणूक यंत्रणेवर टीका करत, शिक्षकांनी त्यांना भेडसावलेल्या समस्यांचा पाढा सोमवारी पत्रकार परिषदेत वाचला.महाराष्ट्र शिक्षक सेनेचे ठाणे महानगर अध्यक्ष गोकुळ पाटील यांनी महाराष्टÑ राज्य मुख्याध्यापक संघाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक कर्तव्यावरील शिक्षकांच्या समस्या मांडल्या. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी अनेक केंद्रांवर महिला कर्मचाºयांची मोठ्या प्रमाणात गौरसोय झाली. शिक्षक कर्मचाºयांना मतदानाच्या दिवशी नियुक्त्या देताना कोणतेही नियोजन करण्यात आले नव्हते. किमान महिला शिक्षकांची सोय यंत्रणेने विचारात घेणे अपेक्षित होते; परंतु त्यांनाही घरापासून लांबच्या मतदान केंद्रांवर ड्युटी देण्यात आली होती. मतदान प्रक्रि या पूर्ण झाल्यानंतर उर्वरित सर्व कामे आटोपून कर्मचाºयांना घरी जाण्यासाठी रात्री उशिर होत असतो. यावेळीही तसाच प्रकार झाल्याचे पाटील यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. आजचे युग हे डिजिटल युग आहे. असे असतानाही निवडणूक आयोगाकडून मोठ्या प्रमाणात कागदांचा वापर होत असतो. कागदांवर होणारा हा खर्च टाळावा, अशी मागणी यावेळी पाटील यांनी केली.मतदानाच्या दिवशी काम करणाºया कर्मचाºयांचे मानधन कमी आहे. त्यात वाढ करावी करण्याची मागणी लावून धरण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. सरकारी कामात हलगर्जी झाल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाºयावर थेट बडतर्फीची कारवाई करण्यात येते; मात्र निवडणूक आयोगाच्या गलथान कारभाराकडे कोणी लक्ष देत नाही. त्यात कामाचा वाढत्या ताणामुळे अनेक कर्मचाºयांचे जीव जात असतात. याला सर्वस्वी निवडणूक आयोग जबाबदार असल्याचा आरोपही पाटील यांनी यावेळी केला. निवडणुकीचे काम करण्यासाठी शिक्षक सदैव तयार आहोत; पण मतदान केंद्रांवर होणाºया गौरसोयींची निवडणूक आयोगाने योग्य ती दखल घेऊन तेथे सोयी सुविधा पुरवण्यासाठीही पुढाकार घेण्याची गरज आहे. असेच प्रकार भविष्यात सुरू राहिल्यास सर्व संघटना एकत्र येवून निवडणुकीचे काम न करण्याचा निर्णय घेतील, असा इशारा पाटील यांनी यावेळी दिला.बोटं निघाली सोलूनमतदारांच्या बोटावर शाई लावताना ती कर्मचाºयांच्या बोटालाही लागल्याने, त्यांच्या बोटांची सालपटं निघाल्याच्या तक्रारी महिला शिक्षकांनी काही वृत्तवाहिन्यांनी बोलताना केल्या. मतदान केंद्रांवर मतदारांच्या बोटावर शाई लावण्याचे काम दिवसभर सुरू असते. बरेचदा गडबडीत कर्मचाºयांच्या बोटांनाही शाई लागते. ही शाई रसायनयुक्त असल्याने कर्मचाºयांची बोट अक्षरश: सोलून निघाली आहेत.अनेकांच्या बोटांची जळजळ होत आहे. पुढील निवडणुकीत आयोगाने चांगल्या प्रतीची शाई मागवावी, अशी मागणीही या शिक्षिकांनी केली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदान