शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

मतदान केंद्रांवर समस्यांची भरमार, शिक्षकांनी वाचला पाढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 02:14 IST

: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी विविध मतदान केंद्रांवर ड्युटी बजावलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना निवडणूक यंत्रणेच्या नियोजनशून्य कारभारामुळे असुविधांचा सामना करावा लागला.

ठाणे : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी विविध मतदान केंद्रांवर ड्युटी बजावलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना निवडणूक यंत्रणेच्या नियोजनशून्य कारभारामुळे असुविधांचा सामना करावा लागला. मुख्यत्वे महिला कर्मचाऱ्यांची यावेळी मोठी गैरसोय झाली. त्यामुळे निवडणूक यंत्रणेवर टीका करत, शिक्षकांनी त्यांना भेडसावलेल्या समस्यांचा पाढा सोमवारी पत्रकार परिषदेत वाचला.महाराष्ट्र शिक्षक सेनेचे ठाणे महानगर अध्यक्ष गोकुळ पाटील यांनी महाराष्टÑ राज्य मुख्याध्यापक संघाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक कर्तव्यावरील शिक्षकांच्या समस्या मांडल्या. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी अनेक केंद्रांवर महिला कर्मचाºयांची मोठ्या प्रमाणात गौरसोय झाली. शिक्षक कर्मचाºयांना मतदानाच्या दिवशी नियुक्त्या देताना कोणतेही नियोजन करण्यात आले नव्हते. किमान महिला शिक्षकांची सोय यंत्रणेने विचारात घेणे अपेक्षित होते; परंतु त्यांनाही घरापासून लांबच्या मतदान केंद्रांवर ड्युटी देण्यात आली होती. मतदान प्रक्रि या पूर्ण झाल्यानंतर उर्वरित सर्व कामे आटोपून कर्मचाºयांना घरी जाण्यासाठी रात्री उशिर होत असतो. यावेळीही तसाच प्रकार झाल्याचे पाटील यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. आजचे युग हे डिजिटल युग आहे. असे असतानाही निवडणूक आयोगाकडून मोठ्या प्रमाणात कागदांचा वापर होत असतो. कागदांवर होणारा हा खर्च टाळावा, अशी मागणी यावेळी पाटील यांनी केली.मतदानाच्या दिवशी काम करणाºया कर्मचाºयांचे मानधन कमी आहे. त्यात वाढ करावी करण्याची मागणी लावून धरण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. सरकारी कामात हलगर्जी झाल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाºयावर थेट बडतर्फीची कारवाई करण्यात येते; मात्र निवडणूक आयोगाच्या गलथान कारभाराकडे कोणी लक्ष देत नाही. त्यात कामाचा वाढत्या ताणामुळे अनेक कर्मचाºयांचे जीव जात असतात. याला सर्वस्वी निवडणूक आयोग जबाबदार असल्याचा आरोपही पाटील यांनी यावेळी केला. निवडणुकीचे काम करण्यासाठी शिक्षक सदैव तयार आहोत; पण मतदान केंद्रांवर होणाºया गौरसोयींची निवडणूक आयोगाने योग्य ती दखल घेऊन तेथे सोयी सुविधा पुरवण्यासाठीही पुढाकार घेण्याची गरज आहे. असेच प्रकार भविष्यात सुरू राहिल्यास सर्व संघटना एकत्र येवून निवडणुकीचे काम न करण्याचा निर्णय घेतील, असा इशारा पाटील यांनी यावेळी दिला.बोटं निघाली सोलूनमतदारांच्या बोटावर शाई लावताना ती कर्मचाºयांच्या बोटालाही लागल्याने, त्यांच्या बोटांची सालपटं निघाल्याच्या तक्रारी महिला शिक्षकांनी काही वृत्तवाहिन्यांनी बोलताना केल्या. मतदान केंद्रांवर मतदारांच्या बोटावर शाई लावण्याचे काम दिवसभर सुरू असते. बरेचदा गडबडीत कर्मचाºयांच्या बोटांनाही शाई लागते. ही शाई रसायनयुक्त असल्याने कर्मचाºयांची बोट अक्षरश: सोलून निघाली आहेत.अनेकांच्या बोटांची जळजळ होत आहे. पुढील निवडणुकीत आयोगाने चांगल्या प्रतीची शाई मागवावी, अशी मागणीही या शिक्षिकांनी केली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदान