शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

"... त्या निर्णयानंतर पंतप्रधान आणि मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही" विनायक राऊतांचा घणाघात

By धीरज परब | Updated: March 4, 2023 16:02 IST

Vinayak Raut: मुख्य निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांची नियुक्ती बेकायदा असल्याच्या आरोपांवर सर्वोच्च न्यायायच्या निर्णयाने शिक्कामोर्तब झाले असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गोयल यांना त्यांच्या पदावर राण्याचा नैतिक अधिकार नाही .

- धीरज परबमीरारोड - मुख्य निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांची नियुक्ती बेकायदा असल्याच्या आरोपांवर सर्वोच्च न्यायायच्या निर्णयाने शिक्कामोर्तब झाले असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गोयल यांना त्यांच्या पदावर राण्याचा नैतिक अधिकार नाही . मात्र ते खुर्चीला चिटकून राहतील अशी टीका ठाकरे गटाचे नेते व शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी मीरारोड येथील शिवगर्जना मेळाव्यात  केली.

मीरा भाईंदर मधील ठाकरे समर्थक शिवसैनिकांचा मेळावा मीरारोड येथे शुक्रवारी रात्री आयोजित करण्यात आला होता . त्यावेळी विनायक राऊत यांनी भाजपा , मुख्यमंत्री शिंदे आदींवर टीका केली . दोन वर्ष महाविकास आघाडी सरकार मध्ये सत्ता भोगून मालमत्ता जमवली तेव्हा बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला तिलांजली दिली असे वाटले नाही . कोल्ह्या - लांडग्यांच्या गुहेत खासदार राजन विचारे बाळासाहेबांचा भगवा घेऊन ठाम उभे आहेत . ठाणे लोकसभा मतदार संघात स्वतःच्या मुलाला कशाला पाठवताय . हिम्मत असेल तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः निवडणूक लढवावी . तुमचे डिपोझीट जनता जप्त केल्याशिवाय राहणार नाही . शिंदे गेल्या मुळे ठाण्यात शिवसेनेचे मोठ्या संख्येने पदाधिकारी वाढले आहेत.

धनुष्यबाणाचे पावित्र्य भ्रष्ट करण्याचे प्रयत्न भाजपाच्या माध्यमातून हे गद्दार करत असतील तर तो बाण तुमच्यावर उलटा चालल्याशिवाय राहणार नाही . खोके आणि बोक्यांच्या जीवावर उद्धव ठाकरे यांना एकटे पाडून शिवसेना संपवण्याचे कारस्थान केल्याने देशभरातून संताप व्यक्त होत आहे .  सत्तेचा दुरुपयोग करून देशातल्या ८ राज्यातील सरकारे भाजपाने पाडली. पण हा छत्रपतींचा महाराष्ट्र स्वाभिमानी आहे तो तुम्हाला झुकणार नाही व नमणार नाही हे लक्षात ठेवावे असे राऊत म्हणाले.

खासदार राजन विचारे म्हणाले कि , ठाण्यात कट्टर शिवसैनिकांवर  अगदी चेन स्नॅचिंग पासूनचे खोटे  गुन्हे दाखल केले जात आहेत , त्यांना विविध मार्गाने त्रास देण्याचे प्रकार सुरु आहेत . पण कट्टर निष्ठावंत शिवसैनिक डगमडलेला नाही . छत्रपती  शिवाजी महाराजांनी सर्वजाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य उभारले. आज देखील सर्व जाती धर्माची लोकं आपल्या बरोबर आहेत . लोकांना कळतंय कि अन्याय झालाय व ते निवडणुकीची वाट पहात असून जनता गद्दारांना त्यांची जागा दाखवेल . गेल्या ५७ वर्षात शिवसैनिकांनी जीवाचे रान करून शिवसेना उभारली ती शिवसेना संपवण्याचे पाप गद्दारांनी केले आहे . सत्तेची दडपशाही आणि धनशक्ती चा कितीही वापर केला तरी जनता सहन करत नाही हे कसबा पोटनिवडणुकीत दाखवून दिले आहे.

माजी गटनेत्या नीलम ढवण यांनी आरोप केला कि , मीरा भाईंदर मधील बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकांना आमिष दाखवले जात आहे , काहींना धमकावले जात आहेत तर काहींवर प्रशासनाला हाताशी धरून बळजबरी कारवाई करायला लावली जात आहे . यावेळी माजी नगरसेवक दिनेश नलावडे , अर्चना कदम , स्नेहा पांडे , जयंतीलाल पाटील , तारा घरत , शर्मिला बगाजी , लक्ष्मण जंगम , प्रियांका करंबळे,  जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे , महिला संघटक स्नेहल सावंत , उपजिल्हा प्रमुख धनेश पाटील , मच्छिमार नेते बर्नड डिमेलो,  प्रवक्ते शैलेश पांडे , जयराम मेसे आदी सह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते . 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगShiv SenaशिवसेनाVinayak Rautविनायक राऊत