शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
2
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
3
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
4
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
5
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
6
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
7
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
8
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
9
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
10
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
11
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
12
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
13
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
14
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
15
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
16
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
17
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
18
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
19
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
20
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल

"... त्या निर्णयानंतर पंतप्रधान आणि मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही" विनायक राऊतांचा घणाघात

By धीरज परब | Updated: March 4, 2023 16:02 IST

Vinayak Raut: मुख्य निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांची नियुक्ती बेकायदा असल्याच्या आरोपांवर सर्वोच्च न्यायायच्या निर्णयाने शिक्कामोर्तब झाले असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गोयल यांना त्यांच्या पदावर राण्याचा नैतिक अधिकार नाही .

- धीरज परबमीरारोड - मुख्य निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांची नियुक्ती बेकायदा असल्याच्या आरोपांवर सर्वोच्च न्यायायच्या निर्णयाने शिक्कामोर्तब झाले असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गोयल यांना त्यांच्या पदावर राण्याचा नैतिक अधिकार नाही . मात्र ते खुर्चीला चिटकून राहतील अशी टीका ठाकरे गटाचे नेते व शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी मीरारोड येथील शिवगर्जना मेळाव्यात  केली.

मीरा भाईंदर मधील ठाकरे समर्थक शिवसैनिकांचा मेळावा मीरारोड येथे शुक्रवारी रात्री आयोजित करण्यात आला होता . त्यावेळी विनायक राऊत यांनी भाजपा , मुख्यमंत्री शिंदे आदींवर टीका केली . दोन वर्ष महाविकास आघाडी सरकार मध्ये सत्ता भोगून मालमत्ता जमवली तेव्हा बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला तिलांजली दिली असे वाटले नाही . कोल्ह्या - लांडग्यांच्या गुहेत खासदार राजन विचारे बाळासाहेबांचा भगवा घेऊन ठाम उभे आहेत . ठाणे लोकसभा मतदार संघात स्वतःच्या मुलाला कशाला पाठवताय . हिम्मत असेल तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः निवडणूक लढवावी . तुमचे डिपोझीट जनता जप्त केल्याशिवाय राहणार नाही . शिंदे गेल्या मुळे ठाण्यात शिवसेनेचे मोठ्या संख्येने पदाधिकारी वाढले आहेत.

धनुष्यबाणाचे पावित्र्य भ्रष्ट करण्याचे प्रयत्न भाजपाच्या माध्यमातून हे गद्दार करत असतील तर तो बाण तुमच्यावर उलटा चालल्याशिवाय राहणार नाही . खोके आणि बोक्यांच्या जीवावर उद्धव ठाकरे यांना एकटे पाडून शिवसेना संपवण्याचे कारस्थान केल्याने देशभरातून संताप व्यक्त होत आहे .  सत्तेचा दुरुपयोग करून देशातल्या ८ राज्यातील सरकारे भाजपाने पाडली. पण हा छत्रपतींचा महाराष्ट्र स्वाभिमानी आहे तो तुम्हाला झुकणार नाही व नमणार नाही हे लक्षात ठेवावे असे राऊत म्हणाले.

खासदार राजन विचारे म्हणाले कि , ठाण्यात कट्टर शिवसैनिकांवर  अगदी चेन स्नॅचिंग पासूनचे खोटे  गुन्हे दाखल केले जात आहेत , त्यांना विविध मार्गाने त्रास देण्याचे प्रकार सुरु आहेत . पण कट्टर निष्ठावंत शिवसैनिक डगमडलेला नाही . छत्रपती  शिवाजी महाराजांनी सर्वजाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य उभारले. आज देखील सर्व जाती धर्माची लोकं आपल्या बरोबर आहेत . लोकांना कळतंय कि अन्याय झालाय व ते निवडणुकीची वाट पहात असून जनता गद्दारांना त्यांची जागा दाखवेल . गेल्या ५७ वर्षात शिवसैनिकांनी जीवाचे रान करून शिवसेना उभारली ती शिवसेना संपवण्याचे पाप गद्दारांनी केले आहे . सत्तेची दडपशाही आणि धनशक्ती चा कितीही वापर केला तरी जनता सहन करत नाही हे कसबा पोटनिवडणुकीत दाखवून दिले आहे.

माजी गटनेत्या नीलम ढवण यांनी आरोप केला कि , मीरा भाईंदर मधील बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकांना आमिष दाखवले जात आहे , काहींना धमकावले जात आहेत तर काहींवर प्रशासनाला हाताशी धरून बळजबरी कारवाई करायला लावली जात आहे . यावेळी माजी नगरसेवक दिनेश नलावडे , अर्चना कदम , स्नेहा पांडे , जयंतीलाल पाटील , तारा घरत , शर्मिला बगाजी , लक्ष्मण जंगम , प्रियांका करंबळे,  जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे , महिला संघटक स्नेहल सावंत , उपजिल्हा प्रमुख धनेश पाटील , मच्छिमार नेते बर्नड डिमेलो,  प्रवक्ते शैलेश पांडे , जयराम मेसे आदी सह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते . 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगShiv SenaशिवसेनाVinayak Rautविनायक राऊत