शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ठाणे जिल्ह्यात २२ महिलांनी संवाद साधत व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे केला ई -गृहप्रवेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 17:17 IST

पंतप्रधान शुक्रवारी शिर्डी दौ-यावर असताना त्यांनी राज्यातील २९ जिल्ह्यांमधील पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांचा ई गृहप्रवेश करणारा कार्यक्रम शिर्डी येथून पार पाडला. यावेळी राज्यातील सुमारे दोन लाख ४४ हजार ४४४ घरकुलांमध्ये ‘ई गृहप्रवेश’ पार पाडत असतान पंतप्रधानांनी महिलांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. राज्यातील अन्य जिल्ह्यातील तुलनेत पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलांमध्ये ठाणे जिल्हा अव्वल आहे. यामुळे ठाणे जिल्ह्याचे कौतूक करीत पंतप्रधानांनी या २२ महिलां लाभार्थ्यांशी सर्वाधिक वेळ संवाद साधला.

ठळक मुद्दे राज्यातील सुमारे दोन लाख ४४ हजार ४४४ घरकुलांमध्ये ‘ई गृहप्रवेश’राज्यातील अन्य जिल्ह्यातील तुलनेत पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलांमध्ये ठाणे जिल्हा अव्वल ठाणे जिल्ह्याचे कौतूक करीत पंतप्रधानांनी या २२ महिलां लाभार्थ्यांशी सर्वाधिक वेळ संवाद साधलाघरकुलांवर जगप्रसिध्द ‘वारली’ चित्रांची रंगरंगोटी पाहून पंतप्रधानांनी भावूक होत ठाणे जिल्ह्यातील महिलांशी संवाद साधण्यासाठी भरपूर

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी दौऱ्यावर असताना त्यांनी ठाणे जिल्ह्यातील २२ महिलांशी व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे संवाद साधला. यावेळी या महिलांनी पंतप्रधानांशी संवाद साधत पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलांमध्ये ‘ई गृहप्रवेश’ केला. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व्हीसीडीसी सभागृहात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम पंतप्रधानांच्या साक्षिने पार पडला.पंतप्रधान शुक्रवारी शिर्डी दौ-यावर असताना त्यांनी राज्यातील २९ जिल्ह्यांमधील पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांचा ई गृहप्रवेश करणारा कार्यक्रम शिर्डी येथून पार पाडला. यावेळी राज्यातील सुमारे दोन लाख ४४ हजार ४४४ घरकुलांमध्ये ‘ई गृहप्रवेश’ पार पाडत असतान पंतप्रधानांनी महिलांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. राज्यातील अन्य जिल्ह्यातील तुलनेत पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलांमध्ये ठाणे जिल्हा अव्वल आहे. यामुळे ठाणे जिल्ह्याचे कौतूक करीत पंतप्रधानांनी या २२ महिलां लाभार्थ्यांशी सर्वाधिक वेळ संवाद साधला. ‘रहने के लिए न था मकान पक्का, न था खुद कि पहचान का शिक्का, फिर मोदीजीने दिया कृपाप्रसाद, प्रधानमंत्री ग्राम योजनासे मिला आवास ! अशा आशयाची कविता सादर करत ठाणे जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी महिलांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सुसवांद साधत ई-गृहप्रवेश केला.पारंपरिक वेशभूषेत आलेल्या या महिलांना पंतप्रधानांनी एखादी कविता किंवा गाणे सादर करा असे मराठीतून सांगितले, त्यावेळी उपस्थित महिलांपैकी हिरा गुरु नाथ वाघ यांनी डोंगरी शेत माझं बेनु ग कसी... आलय वरीस राबवून मराव किती .... हे कवी नारायण सुर्वे यांचे गीत सादर करत वाहवा मिळवली.सुरेखा सुनिल भगत या महिल कविता गायली. महिलांनी गृहप्रवेशासाठी केलेली घटस्थापना, तुळशी वृंदावन आदींना फुलांनी सजवून मांडलेली गृहप्रवेश् पुजा पाहावून पंतप्रधान फार खूष झाले. तर यावेळी सुनिता प्रदीप बराफ या महिलेने पंतप्रधानांशी थेट संवाद साधून पंतप्रधानांशी घरकुलांचा लाभ मिळाल्याचे समाधान व्यक्त केले. ‘आवास योजनेमुळे घरातील वातावरण सुखी समाधानी झाले असून पक्या घरात राहायला मिळालं, मोदीजी तुम्हाला धन्यवाद ! अशा शब्दात पंतप्रधानांचे सुनिता यांनी आभार व्यक्त केले. मोदीजीनी देखिल टेक्नोलॉजीमुळे तुमच्या घरी मी प्रवेश केल्याचे सांगत गरिबीशी मुकाबला करण्यासाठी मुलांना शिक्षण द्या असे आवर्जून सागितले सांगितले.यावेळी जिल्ह्यातील ग्रामीण आदिवासीभागात बांधण्यात आलेल्या घरकूलांचा व्हीडीओ देखील पंतप्रधानानी आत्मीयतेने पाहिला. या घरकुलांवर जगप्रसिध्द ‘वारली’ चित्रांची रंगरंगोटी पाहून पंतप्रधानांनी भावूक होत ठाणे जिल्ह्यातील महिलांशी संवाद साधण्यासाठी भरपूर वेळ देत समाधान व्यक्त केले. या ‘वारली’ कलेचा वापर केल्याने घराला आधुनिक रूप आल्याचे सांगत वारली कलेचे पंतप्रधानांनी यावेळी कौतुक केल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी रूपाली सातपुते यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या या ई गृहप्रवेश कार्यक्रम, ठाणे जिल्ह्यासाठी ठाणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेव्दारे पार पडला. यावेळी ठाणे जिल्हाधिकारी राजेंद्र नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार आदी अधिका-यांसह २२ घरकूल लाभार्थी सर्व महिलां हिरव्या रंगाचा शालू परिधान करून या ई गृहप्रवेश कार्यक्रमात समावेश होता. यावेळी महिलांना गृह प्रवेशासाठी मंगलकलश भेट देण्यात आला. यावेळी संबंधीत विस्तार अधिकारी व ग्राम सेवक आदीं यावेळी सभागृहात उपस्थित होते. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत जिल्ह्यच्या ग्रामीण भागात तीन हजार ७४० घरकुल बांधण्यात आली. तसेच शबरी, रमाई, आदिम हा राज्य पुरस्कृत योजनेच्या अंतर्गत सुद्धा पक्की घर बांधण्यात आली आहेत. यंदाचे असणारे ४६२ लक्षांक देखिल पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.** ई गृहप्रवेशसाठी सहभागी महिला - यामध्ये अंबरनाथ तालुक्यातील चामटोली येथील बारकी हरिश्चंद्र हंबीर, मांगल दिलीप केवारी, काशीबाई जेठ्या हंबीर. तर भिवंडी तालुक्यातील अकलोली येथील वैशाली विलास घाटाळ, सीता माणिक मोरे, द्रौपदी शांताराम भड, सुनिता प्रदिप बरफ, आणि रेखा बाळाराम गडग . या महिला होत्या. याशिवाय कल्याणमधील घोटसई येथील अलका गणेश भगत, रेणुका कैलास भगत, सुरेखा सुनिल भगत यांचा समावेश होता. याप्रमाणेच मुरबाड तालुक्यातील कळंभाड येथील मनिषा अनंता वाघ, नंदिनी अशोक शिंद, महिनषा तानाजी पादीर, उषा उत्तम पादीर, हिरा गुरूनाथ वाघ या महिलांचा समावेश. तर शहापूर तालुक्यातील लेनाडच्या तुळशीबाई भास्कर मेंगाळ, लक्ष्मीबाई लक्ष्मण धिडे तर शेलवलीच्या जानकी भगवान दिवा, वेहळोलीच्या दिपीका गुरूनाथ ठोंबरे आणि नंदा हरी धापटे आदी महिलांचा या ‘ठाणे जिल्हा ई गृहप्रवेश’ ’कार्यक्रमात समावेश होता.-

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी