शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

तूरडाळ कडाडल्याने हॉटेल्समधील मेन्यू महागले

By admin | Updated: November 10, 2015 00:09 IST

महाग झालेल्या तूरडाळीवरून बरेच राजकारण झाले. तरीही त्याचे भाव काही उतरले नाहीत. त्यातच आता डाळ कडाडल्याने हॉटेलमधील डिशेसच्या दरातही दहा टक्के दरवाढ झाली आहे

जान्हवी मोर्ये,  ठाणेठाणे : महाग झालेल्या तूरडाळीवरून बरेच राजकारण झाले. तरीही त्याचे भाव काही उतरले नाहीत. त्यातच आता डाळ कडाडल्याने हॉटेलमधील डिशेसच्या दरातही दहा टक्के दरवाढ झाली आहे. त्यामुळे घराबाहेर रिफ्रेंशमेंट घेणाऱ्यांच्या खिशाला फटका बसणार आहे.मुंबई परिसरात ७ हजार हॉटेल्स आहेत. या हॉटेल्स संघटनेचे जनरलसेक्रेटरी सुकेश शेट्टी यांच्याकडे दरवाढीविषयी विचारणा केली असतात्यांनी आठ ते दहा टक्के दरवाढ झाल्याचे मान्य केले. त्यासाठी त्यांनी तूरडाळीच्या भाववाढ कारणीभूत झाल्याचे सांगितले. डाळीचे भाव कमी झाल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात डाळ २०० रूपयांना बाजारात विकली जात आहे. तूरडाळच महाग झाली नसून इतर डाळींचे भावही वाढले आहे. मेंदूवडा, बटाटा वडा, सांबारमध्ये डाळ टाकली जाते. दालफ्राय आणि साधे वरण राईससोबत दिले जाते. यासाठीच नाईलास्तव दरवाढ करावी लागली आहे. तूरडाळीपूर्वी कांद्याच्या दरवाढीने रडविले होते. त्यावेळी दरवाढ केलेली नव्हती. मात्र, आता हा दरवाढीचा निर्णय घेतला आहे. ठाणे शहरात जवळपास हजार हॉटेल्स आहेत. हॉटेल्स संघटनेचे अध्यक्ष साई प्रसाद शेट्टी यांनी सांगितले की, एका ठराविक दराच्या खाली आम्ही कोणताही पदार्थ विकत नाही. तसेच दरवाढही कमी जास्त असू शकते. कुठे आठ टक्के तर कुठे दहा टक्के आहे. हॉटेलचा पसारा किती कमी अथवा जास्त आहे, तेथे येणाऱ्या ग्राहकाचा दर्जा पाहून दर ठरविले जातात. एखादे हॉटेल गार्डन रेस्टॉरंट असते. एखाद्या ठिकाणी २०० ग्राहक एकाचवेळी बसून जेवण नाश्ता करु शकतात. काही हॉटेल्समध्ये शाकाहारी तर काही ठिकाणी मांसाहारी असा बेत असतो. तर काही छोटे हॉटेल्स लोअर मिडल क्लासचा ग्राहक विचारात घेऊन आपले दर ठरवितात. ग्राहकांना आपल्याशी बांधून ठेवता यावे यासाठी काहीजण कमी दर आकारतात.