शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
4
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
5
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
6
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
7
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
8
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
9
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
10
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
11
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
12
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
13
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
14
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
15
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
16
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
17
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
18
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
19
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
20
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...

विकास योजनेतील रस्त्यांवरील अतिक्रमणे रोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:44 IST

कल्याण : विकास योजनांमधील समाविष्ट असलेल्या रस्त्यांवर यापुढे अतिक्रमणे होणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असे आदेश कल्याण-डोंबिवली मनपाचे ...

कल्याण : विकास योजनांमधील समाविष्ट असलेल्या रस्त्यांवर यापुढे अतिक्रमणे होणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असे आदेश कल्याण-डोंबिवली मनपाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

राज्य रस्ते विकास महामंडळ व मनपा अधिकाऱ्यांसोबत शुक्रवारी आयुक्तांची एक बैठक झाली. या वेळी त्यांनी वरील आदेश दिले. दुर्गाडी ते सहजानंद चौक, दुर्गाडी ते पत्रीपूल या रस्त्यावरील बहुतांश दुभाजक तुटले असून, ते प्राधान्याने दुरुस्त करावेत, अशा सूचना त्यांनी महामंडळाला दिल्या.

दरवर्षी पावसाळ्यात शिवाजी चौकात पाणी तुंबते. त्यावर तोडगा काढण्यासाठी जल, मल, मोबाइल कंपन्यांच्या सेवा वाहिन्या शिफ्ट केल्या पाहिजेत. महापालिकेने त्याचा अभ्यास करावा. रस्ता रुंदीकरणाची निविदा प्रक्रिया राबवावी. रस्ता रुंदीकरण करताना तेथे क्रॉस ड्रेन तयार करून पाण्याचा कायमस्वरूपी निचरा होण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी माहिती महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या वेळी दिली. भटाळे तलावातील प्रस्तावित विकास योजना रस्ता तसेच इतर आरक्षणाखाली अतिक्रमणे काढण्याचे निर्देश मनपा उपायुक्त आणि साहाय्यक आयुक्तांना मनपा आयुक्तांनी दिले आहेत. बाधित अतिक्रमणांमध्ये पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव संबंधित प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी पुनवर्सन समितीपुढे तातडीने सादर करावा, असेही आयुक्तांनी या बैठकीत आदेशित केले आहे.

-------------------------