शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

अपघात रोखण्यासाठी पोलिसांकडे इंटसेप्टर वाहन, ३०० मीटरपर्यंतचा वेग मोजला जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 00:12 IST

मुंबई-नाशिक महामार्गावर होणारे अपघात ही मोठी समस्या असून हा महामार्ग दरवर्षी किती बळी घेणार, असा प्रश्न निर्माण झाला होता.

भातसानगर : मुंबई-नाशिक महामार्गावर होणारे अपघात ही मोठी समस्या असून हा महामार्ग दरवर्षी किती बळी घेणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. ११ महिन्यांत ५३ जणांचे बळी गेले आहेत. हे अपघात कमी करण्यासाठी चेरपोली चौकी महामार्ग पोलिसांना आता अत्याधुनिक वाहन मिळाल्याने अपघात कमी होणार आहेत. इंटसेप्टर वाहन पोलिसांच्या ताफ्यात दाखल झाले आहे.महामार्ग पोलीस दलाच्या आधुनिकीकरणांतर्गत मुंबई-नाशिक महामार्गावर असलेल्या चेरपोली चौकीच्या पोलिसांना हे वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे मद्यपी, बेशिस्त वाहनचालक, अतिवेगाने वाहन चालविणारे, नियम मोडणारे वाहनचालक यांच्यावर महामार्ग पोलिसांकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे.स्पीडगन लेझर तंत्रज्ञानावर आधारित असल्याने समोरून जाणाऱ्या कोणत्याही वाहनाचा ३०० मीटर अंतरापर्यंतचा वेग यामध्ये मोजला जातो.तसेच अतिवेगाने वाहन चालविणाऱ्यांबाबत पुरावेही पोलिसांना उपलब्ध होणार आहेत. स्पीडगन, ई-चलन, मद्यपींवर लक्ष ठेवण्यासाठी ब्रेथ अ‍ॅनालायझर यंत्रणा आहे. या ७१ किलोमीटर अंतरावर कोणतीही अत्याधुनिक यंत्रणा नसल्याने हजारो कुटुंबे अपघातांमुळे आज उघड्यावर पडली आहेत. आज जरी आकडा ५३ असला तरी तो केवळ जागेवरील आहे. त्यामुळे तो खूप मोठा आहे. दरदिवशी या रस्त्यांवर अपघात होतात. मात्र, अपघातात जखमी झालेल्यांची कोणतीच काळजी घेतली जात नाही.हे अपघात होऊ नये म्हणून कोणतीही काळजी घेतली जात नसून जखमींवर उपचारासाठी कोणतीच अत्याधुनिक यंत्रणाही नाही. या महामार्गावर पोलीस हवालदार दगडू वाकडे, पुंडलिक भोईर, धनंजय देशमुख, चिंतामण शिंदे, संतोष चव्हाण हे या यंत्रणेद्वारे लक्ष ठेवणार आहेत. याचा निश्चितच उपयोग होईल असा विश्वास पोलिसांच्यावतीने व्यक्त करण्यात आले आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीPoliceपोलिस