शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

अपघात रोखण्यासाठी पोलिसांकडे इंटसेप्टर वाहन, ३०० मीटरपर्यंतचा वेग मोजला जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 00:12 IST

मुंबई-नाशिक महामार्गावर होणारे अपघात ही मोठी समस्या असून हा महामार्ग दरवर्षी किती बळी घेणार, असा प्रश्न निर्माण झाला होता.

भातसानगर : मुंबई-नाशिक महामार्गावर होणारे अपघात ही मोठी समस्या असून हा महामार्ग दरवर्षी किती बळी घेणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. ११ महिन्यांत ५३ जणांचे बळी गेले आहेत. हे अपघात कमी करण्यासाठी चेरपोली चौकी महामार्ग पोलिसांना आता अत्याधुनिक वाहन मिळाल्याने अपघात कमी होणार आहेत. इंटसेप्टर वाहन पोलिसांच्या ताफ्यात दाखल झाले आहे.महामार्ग पोलीस दलाच्या आधुनिकीकरणांतर्गत मुंबई-नाशिक महामार्गावर असलेल्या चेरपोली चौकीच्या पोलिसांना हे वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे मद्यपी, बेशिस्त वाहनचालक, अतिवेगाने वाहन चालविणारे, नियम मोडणारे वाहनचालक यांच्यावर महामार्ग पोलिसांकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे.स्पीडगन लेझर तंत्रज्ञानावर आधारित असल्याने समोरून जाणाऱ्या कोणत्याही वाहनाचा ३०० मीटर अंतरापर्यंतचा वेग यामध्ये मोजला जातो.तसेच अतिवेगाने वाहन चालविणाऱ्यांबाबत पुरावेही पोलिसांना उपलब्ध होणार आहेत. स्पीडगन, ई-चलन, मद्यपींवर लक्ष ठेवण्यासाठी ब्रेथ अ‍ॅनालायझर यंत्रणा आहे. या ७१ किलोमीटर अंतरावर कोणतीही अत्याधुनिक यंत्रणा नसल्याने हजारो कुटुंबे अपघातांमुळे आज उघड्यावर पडली आहेत. आज जरी आकडा ५३ असला तरी तो केवळ जागेवरील आहे. त्यामुळे तो खूप मोठा आहे. दरदिवशी या रस्त्यांवर अपघात होतात. मात्र, अपघातात जखमी झालेल्यांची कोणतीच काळजी घेतली जात नाही.हे अपघात होऊ नये म्हणून कोणतीही काळजी घेतली जात नसून जखमींवर उपचारासाठी कोणतीच अत्याधुनिक यंत्रणाही नाही. या महामार्गावर पोलीस हवालदार दगडू वाकडे, पुंडलिक भोईर, धनंजय देशमुख, चिंतामण शिंदे, संतोष चव्हाण हे या यंत्रणेद्वारे लक्ष ठेवणार आहेत. याचा निश्चितच उपयोग होईल असा विश्वास पोलिसांच्यावतीने व्यक्त करण्यात आले आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीPoliceपोलिस