शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

आजोबा नातवाच्या नात्यावर भाष्य करणारी "अज्जू" एकांकिका अभिनय कट्ट्यावर सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 11:54 IST

आजोबा नातवाच्या नात्यावर भाष्य करणारी "अज्जू" एकांकिका अभिनय कट्ट्यावर रविवारी सादर झाली. 

ठळक मुद्देअज्जू एकांकिकेने प्रेक्षकांची जिंकली मने आजोबा आणि नातू यांच्या नाते संबंधावर भाष्यकिरण नाकती यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभते - मयेकर

ठाणे : कलाकारांतील कलागुणांना मुक्तपणे वाव देणाऱ्या अभिनय कट्यावर वेगवेगळ्या विषयांवर नाटक सादर केले जाते. रविवारी कट्टा क्रं ३८२ मध्ये सादर झालेल्या अज्जू एकांकिकेने प्रेक्षकांची मने जिंकली. आजोबा आणि नातू यांच्या नाते संबंधावर या नाटकात भाष्य केले गेले. काही झाले तरी आपल्या आजोबांना वृद्धाश्रमात जाऊ देणार नाही हा नाटकातील नातवाचा हट्ट मनाला भावून जातो.हि एकांकिका पाहण्यासाठी मुले, पालक तसेच जेष्ठ नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       हल्लीच्या धावपळीच्या जगात प्रत्येकालाच पुढे जाण्याची घाई दिसते.पण मागे बघायला कोणालाच वेळ नाही.स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी स्टॅंडर्ड  ऑफ लिव्हिंग  बदलण्याचा प्रयत्न केला जातो.मात्र या सगळ्यात नाते संबंधांकडे दुर्लक्ष केले जाते.याची जाणीव देखील शहरी भागातील बऱ्याचशा  पती पत्नींना होत नाही ही आश्चर्याची बाब आहे.घरातील वृद्ध व्यक्तीची अडचण वाटू लागणे हि आजच्या काळातील सर्वात मोठी शोकांतिका आहे. याचा मुलांवर अप्रत्यक्षरित्या परिणाम होत असतो.मुलांचा एकटेपणा वाढण्यास सुरवात होते.आजोबा आणि नातू यांच्यात संभाषणाची दरी निर्माण होऊ शकते.या एकांकिकेचे लिखान राजन मयेकर आणि दिग्दर्शन किरण नाकती यांनी केले आहे. या एकांकिकेतील अज्जू या पात्राची घरात अडचण होऊ लागल्याने आणि त्यांचे वागणे पोरखेळ वाटू लागल्याने,आपल्या लहान मुलावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून घरातील सदस्य त्यांना घरातून निघून जाण्याचा सल्ला देतात.तुम्ही एक तर गावी जा किंवा वृद्धाश्रमात जा असे त्यांना सांगण्यात येते.कठीण काळात अज्जू ने आपल्या पत्नी सोबत खूप मेहनतीने घर बांधलेले असते.पण आता उतार वयात त्यांनाच घरातून बाहेर जाण्यास भाग पाडले जाते.मी माझ्या मुलाला शिकवलं,मोठं केलं,त्याला काहीच कमी पडू दिलं नाही.आता तो जेव्हा मोठा झाला तेव्हा त्याला मी नको स्वतःची "स्पेस" हवी आहे. असे अज्जू या पात्राचे म्हणने आहे.प्रत्येकाला एक अज्जू हवा असतो,जुन्या गोष्टी नव्याने ऐकण्यासाठी.मैत्रीसाठी,खेळ खेळण्यासाठी,कधी रागावन्यासाठी तर कधी भांडन्यासाठी,मैत्रीला कोणतं वय नसतं असं अज्जू एकांकिकेतील नातवाचं म्हणन आहे. एकत्र कुटुंब पद्धतीचा झालेला ह्रास आणि विभक्त कुटुंब पद्धतीची उडालेली बोंब आपल्याला या नाटकातून प्रकर्षाने जाणवते.वाढती महागाई,स्पर्धा या सगळ्या गोष्टीत गणिती आयुष्य जगले जात आहे.या जगण्यात माणूस म्हणून दोन शब्द बोलायला कोणालाच वेळ मिळत नाही. नुकतेच आजारपणातुन सावरलेले अभिनय कट्ट्याचे कलाकार आणि या नाटकाचे लेखक राजन मयेकर यांनी आयुष्याला पुन्हा नव्याने सुरवात केली आहे.आपलं आजारपण विसरून त्यांनी पुन्हा रंगमंचावर रमायचे ठरवले आहे.इंटर कॉलेज स्पर्धा,इंटर बँक स्पर्धा,राज्यनाट्य स्पर्धा पासून मालिका क्षेत्र गाजवणारे मयेकर नाटक करताना खूप समाधान मिळते असं म्हणतात.अभिनय कट्ट्यावर काम करताना कलाकार म्हणून खूप ऊर्जा मिळते. आयोजक किरण नाकती यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभते असे मयेकर यांनी सांगितले. या एकांकिकेतील नातवाप्रमाणे आपण व आपल्या घरातील सदस्यांनी आपल्या "अज्जू"ला कधीच वृद्धाश्रमात पाठवू नका असे आव्हान अभिनय कट्ट्याचे आयोजक किरण नाकती यांनी केले. तसेच या प्रसंगी सहदेव कोळमकर,सई भगत, शिल्पा लाडवंते आणि सहदेव साळकर यांनी एकपात्री सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. कट्ट्याचे निवेदन आरती ताथवडकर हिने केले.या एकांकिकेत राजन मयेकर,अद्व्यत मापगावकार,कुंदन भोसले,शिवानी देशमुख यांनी काम केले.प्रकाशयोजना परेश दळवी,संगीत सहदेव साळकर,रंगभूषा दीपक लाडेकर तसेच,नेपथ्य व रंगमंचव्यवस्था वैभव चौधरी-प्रतीक हिवरकर यांनी पार पाडली

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई