शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

आजोबा नातवाच्या नात्यावर भाष्य करणारी "अज्जू" एकांकिका अभिनय कट्ट्यावर सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 11:54 IST

आजोबा नातवाच्या नात्यावर भाष्य करणारी "अज्जू" एकांकिका अभिनय कट्ट्यावर रविवारी सादर झाली. 

ठळक मुद्देअज्जू एकांकिकेने प्रेक्षकांची जिंकली मने आजोबा आणि नातू यांच्या नाते संबंधावर भाष्यकिरण नाकती यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभते - मयेकर

ठाणे : कलाकारांतील कलागुणांना मुक्तपणे वाव देणाऱ्या अभिनय कट्यावर वेगवेगळ्या विषयांवर नाटक सादर केले जाते. रविवारी कट्टा क्रं ३८२ मध्ये सादर झालेल्या अज्जू एकांकिकेने प्रेक्षकांची मने जिंकली. आजोबा आणि नातू यांच्या नाते संबंधावर या नाटकात भाष्य केले गेले. काही झाले तरी आपल्या आजोबांना वृद्धाश्रमात जाऊ देणार नाही हा नाटकातील नातवाचा हट्ट मनाला भावून जातो.हि एकांकिका पाहण्यासाठी मुले, पालक तसेच जेष्ठ नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       हल्लीच्या धावपळीच्या जगात प्रत्येकालाच पुढे जाण्याची घाई दिसते.पण मागे बघायला कोणालाच वेळ नाही.स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी स्टॅंडर्ड  ऑफ लिव्हिंग  बदलण्याचा प्रयत्न केला जातो.मात्र या सगळ्यात नाते संबंधांकडे दुर्लक्ष केले जाते.याची जाणीव देखील शहरी भागातील बऱ्याचशा  पती पत्नींना होत नाही ही आश्चर्याची बाब आहे.घरातील वृद्ध व्यक्तीची अडचण वाटू लागणे हि आजच्या काळातील सर्वात मोठी शोकांतिका आहे. याचा मुलांवर अप्रत्यक्षरित्या परिणाम होत असतो.मुलांचा एकटेपणा वाढण्यास सुरवात होते.आजोबा आणि नातू यांच्यात संभाषणाची दरी निर्माण होऊ शकते.या एकांकिकेचे लिखान राजन मयेकर आणि दिग्दर्शन किरण नाकती यांनी केले आहे. या एकांकिकेतील अज्जू या पात्राची घरात अडचण होऊ लागल्याने आणि त्यांचे वागणे पोरखेळ वाटू लागल्याने,आपल्या लहान मुलावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून घरातील सदस्य त्यांना घरातून निघून जाण्याचा सल्ला देतात.तुम्ही एक तर गावी जा किंवा वृद्धाश्रमात जा असे त्यांना सांगण्यात येते.कठीण काळात अज्जू ने आपल्या पत्नी सोबत खूप मेहनतीने घर बांधलेले असते.पण आता उतार वयात त्यांनाच घरातून बाहेर जाण्यास भाग पाडले जाते.मी माझ्या मुलाला शिकवलं,मोठं केलं,त्याला काहीच कमी पडू दिलं नाही.आता तो जेव्हा मोठा झाला तेव्हा त्याला मी नको स्वतःची "स्पेस" हवी आहे. असे अज्जू या पात्राचे म्हणने आहे.प्रत्येकाला एक अज्जू हवा असतो,जुन्या गोष्टी नव्याने ऐकण्यासाठी.मैत्रीसाठी,खेळ खेळण्यासाठी,कधी रागावन्यासाठी तर कधी भांडन्यासाठी,मैत्रीला कोणतं वय नसतं असं अज्जू एकांकिकेतील नातवाचं म्हणन आहे. एकत्र कुटुंब पद्धतीचा झालेला ह्रास आणि विभक्त कुटुंब पद्धतीची उडालेली बोंब आपल्याला या नाटकातून प्रकर्षाने जाणवते.वाढती महागाई,स्पर्धा या सगळ्या गोष्टीत गणिती आयुष्य जगले जात आहे.या जगण्यात माणूस म्हणून दोन शब्द बोलायला कोणालाच वेळ मिळत नाही. नुकतेच आजारपणातुन सावरलेले अभिनय कट्ट्याचे कलाकार आणि या नाटकाचे लेखक राजन मयेकर यांनी आयुष्याला पुन्हा नव्याने सुरवात केली आहे.आपलं आजारपण विसरून त्यांनी पुन्हा रंगमंचावर रमायचे ठरवले आहे.इंटर कॉलेज स्पर्धा,इंटर बँक स्पर्धा,राज्यनाट्य स्पर्धा पासून मालिका क्षेत्र गाजवणारे मयेकर नाटक करताना खूप समाधान मिळते असं म्हणतात.अभिनय कट्ट्यावर काम करताना कलाकार म्हणून खूप ऊर्जा मिळते. आयोजक किरण नाकती यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभते असे मयेकर यांनी सांगितले. या एकांकिकेतील नातवाप्रमाणे आपण व आपल्या घरातील सदस्यांनी आपल्या "अज्जू"ला कधीच वृद्धाश्रमात पाठवू नका असे आव्हान अभिनय कट्ट्याचे आयोजक किरण नाकती यांनी केले. तसेच या प्रसंगी सहदेव कोळमकर,सई भगत, शिल्पा लाडवंते आणि सहदेव साळकर यांनी एकपात्री सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. कट्ट्याचे निवेदन आरती ताथवडकर हिने केले.या एकांकिकेत राजन मयेकर,अद्व्यत मापगावकार,कुंदन भोसले,शिवानी देशमुख यांनी काम केले.प्रकाशयोजना परेश दळवी,संगीत सहदेव साळकर,रंगभूषा दीपक लाडेकर तसेच,नेपथ्य व रंगमंचव्यवस्था वैभव चौधरी-प्रतीक हिवरकर यांनी पार पाडली

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई