शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्तावित मुंबई-हैद्राबाद अतिजलद रेल्वेसंदर्भात नागरिकांसमोर सादरीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 18:34 IST

Mumbai-Hyderabad high speed railway : नॅशनल हायस्पीड रेल्वे कार्पोरेशनच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या प्रस्तावित मुंबई हैद्राबाद हायस्पिड रेल्वे प्रकल्पामुळे होणारे सामाजिक व पर्यावरणीय जजागृती करण्यासंदर्भात ठाणे जिल्ह्यातील ग्रामस्थ, पर्यावरण विषयातील कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली. 

ठाणे : प्रस्तावित मुंबई -हैद्राबाद अतिजलद रेल्वेसंदर्भात (हायस्पीड) आज ठाणे जिल्ह्यातील नागरिकांसमोर सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. नॅशनल हायस्पीड रेल्वे कार्पोरेशनच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या प्रस्तावित मुंबई हैद्राबाद हायस्पिड रेल्वे प्रकल्पामुळे होणारे सामाजिक व पर्यावरणीय जजागृती करण्यासंदर्भात ठाणे जिल्ह्यातील ग्रामस्थ, पर्यावरण विषयातील कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली. 

उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) प्रशांत सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत या प्रकल्पासंदर्भात सादरीकरण करण्यात आले. यावेळी नॅशनल हायस्पिड रेल्वे कार्पोरेशनचे उपमहाव्यवस्थापक एस.के. पाटील, एजिस इंडिया प्रा. लिमिटेडचे प्रकल्प संचालक सत्यव्रत पांडे, शाम चौगुले उपस्थित होते. प्रकल्पाच्या सल्लागार डॉ. अपर्णा कांबळे व प्राजक्ता कुलकर्णी यांनी प्रकल्पापूर्वी करण्यात येणाऱ्या सामाजिक व पर्यावरणीय सर्वेक्षण वअभ्यासासंबंधी सादरीकरण केले.

प्रशांत सुर्यवंशी म्हणाले की, प्रस्तावित मुंबई-हैद्राबाद अतिजलद रेल्वे प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. ज्या मार्गावरून ही रेल्वे जाणार आहे, तेथील ग्रामस्थांना या प्रकल्पासंदर्भात माहिती व्हावी, यासाठी ही बैठक झाली. यावेळी उपस्थितांनी केलेल्या सूचनांची दखल हा प्रकल्प राबविणाऱ्या महामंडळ घेणार आहे. तसेच ज्या भागातून ही रेल्वे जाणार आहे, तेथील ग्रामस्थांना गावोगावी जाऊन या प्रकल्पाची माहिती महामंडळामार्फत दिली जाईल.

डॉ. कांबळे यांनी सामाजिक अभ्यास कशा प्रकारे केला जाईल याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सध्या या प्रकल्पाचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर या प्रकल्पामुळे होणाऱ्या परिणामाविषयीचाही अभ्यास करण्यात येत आहे. त्याचबरोबर पर्यावरण, वाहतुकीवरील परिणाम, बाधित कुटुंबांवर व संबंधित गावावर होणारे परिणाम आदींचा अभ्यास व सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचे ड्रोनद्वारेही सर्वेक्षण करण्यात येत आहे. गावागावात जाऊन ग्रामस्थांकडून माहिती घेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

 असा आहे प्रकल्प·       मुंबई ते हैद्राबाद हायस्पिड रेल्वे ही एकूण 649.76 किमी धावणार·       हा मार्ग संपूर्ण ग्रीन कॉरिडॉर असणार·       सध्या सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू·       दहा डब्ब्यामध्ये 750 प्रवासी वाहतूक क्षमता·       प्रवासाचा कालावधी 14 तासावरून 3 तासांवर येणार·       ठाणे, नवी मुंबई, लोणावळा, पुणे, बारामती, पंढरपूर, सोलापूर, गुलबर्गा, विकाराबाद व हैद्राबाद अशा दहा स्थानकांचा समावेश·       महाराष्ट्रातील ठाणे, रायगड, पुणे, सोलापूर या चार जिल्ह्यातून धावणार रेल्वे·       ठाणे जिल्ह्यातील एकूण 9 किमीचा समावेश·       प्रकल्पासाठी जिल्ह्यातील सुमारे 1200 हेक्टर जमिन लागणार·       ठाण्यातील म्हातार्डी, बेटावडे, आगासन टारफे-पाचनाड, उसळघर, काटई, नारिवली, निघू, बमाली, निळजे, घेसर, वडवली (ख) या गावांचा समावेश.

टॅग्स :railwayरेल्वेthaneठाणे