शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पूर्ववैमनस्याचे सूडचक्र उठले जीवावर, राष्ट्रवादीमुळे गुन्हा : दोघांवरही गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 02:43 IST

आडिवली-ढोकळी प्रभागातील अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी दिल्याने भाजपाचे अंबिकानगरचे नगरसेवक महेश पाटील यांच्यासह अन्य सात ते आठ जणांविरोधात गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने या दोन कुटुंबातील पूर्ववैमनस्याचे सूडचक्र कोणत्या पातळीवर येऊन ठेपले ते भाजपाच्या नेत्यांना समजले.

कल्याण : आडिवली-ढोकळी प्रभागातील अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी दिल्याने भाजपाचे अंबिकानगरचे नगरसेवक महेश पाटील यांच्यासह अन्य सात ते आठ जणांविरोधात गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने या दोन कुटुंबातील पूर्ववैमनस्याचे सूडचक्र कोणत्या पातळीवर येऊन ठेपले ते भाजपाच्या नेत्यांना समजले.कुणाल पाटील हे राष्ट्रवादीचे स्थानिक नेते वंडार पाटील यांचे पुतणे आहेत. कुणाल हे अपक्ष नगरसेवक आहेत. परंतु त्यांनी महापालिकेच्या निवडणुकीनंतर भाजपाला पाठिंबा दिल्याने त्यांची भाजपाचे सहयोगी अपक्ष नगरसेवक म्हणून ओळख आहे. कुणाल आणि महेश पाटील यांच्यात पूर्वीपासून वैर आहे. कुणाल यांचा चुलत भाऊ, वंडार पाटील यांचा मुलगी विजय याची २००७ मध्ये हत्या झाली होती. यात महेश पाटील यांचा आरोपी म्हणुन सहभाग होता. याप्रकरणी महेश यांच्यासह अन्य त्यांच्या साथीदारांविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला होता.या घटनेला काही वर्षे उलटत नाही तोच महापालिकेच्या नोव्हेंबर २०१५ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीआधी जुलै महिन्यात ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने आठ जणांना अटक केली होती. उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेले शार्पशूटर्स सागर्ली गावात राहणारे आणि भाजपाचे तत्कालीन ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील यांची हत्या करण्यासाठी आले होते, अशी माहिती तपासात उघड झाली. पोलिसांनी या आरोपींकडून चार रिव्हॉल्वर हस्तगत केली होती. या हत्येची सुपारी कुणाल पाटील यांनी दिली होती, अशी कबुली अटक आरोपींकडून पोलिसांना देण्यात आली होती. या प्रकरणात कुणाल यांना अटकही झाली होती. आता पुन्हा एकदा महेश पाटील यांनी कुणालच्या हत्येची सुपारी दिल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली.भाजपातून दबाव?महेश पाटील भाजपा नगरसेवक आहेत. एका मंत्र्याच्या जवळचे असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याबाबत साशंकता होती. त्याच पक्षाकडे असलेल्या गृहखात्यातून पोलिसांवर दबाव असल्याचे सांगितले जात होते. मात्र राष्ट्रवादीचे स्थानिक नेते वंडार पाटील आणि भाऊ सुधीर पाटील यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना यांना सांगताच गुन्हा दाखल करणे ग्रामीण पोलिसांना भाग पडल्याची चर्चा आहे.पाटील कुटुंबांनापोलीस संरक्षणमाझ्या हत्येची सुपारी दिल्याचे तपासात समोर आले असले तरी आमच्या कुटुंबालाच संपवायची हल्लेखोरांची योजना होती असे कुणाल पाटील यांचे म्हणणे आहे. पोलीस आयुक्त, उपायुक्त आणि स्थानिक मानपाडा पोलिसांनी आम्हाला पुरेसा बंदोबस्त पुरविला आहे. अटकेतील हल्लेखोर आणि कट रचणाºयांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :Crimeगुन्हा