शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

शेती वीज थकबाकी सांगून महावितरण शेतकऱ्यांचं नाव बदनाम करतंय, प्रताप होगाडे यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 19:23 IST

कृषी पंप विज बिल सवलत योजना ही बोगस योजना असून सरकार कोट्यवधीची थकबाकी दाखवून शेतकऱ्याचे नाव बदनाम करत असल्याचा आरोप जनता दलाचे नेते तसेच वीजतज्ञ प्रताप होगाडे यांनी पालघर येथे केला. 

हितेंन नाईक 

लोकमत न्युज नेटवर्क 

पालघर दि.9 जानेवारी:- कृषी पंप विज बिल सवलत योजना ही बोगस योजना असून सरकार कोट्यवधीची थकबाकी दाखवून शेतकऱ्याचे नाव बदनाम करत असल्याचा आरोप जनता दलाचे नेते तसेच वीजतज्ञ प्रताप होगाडे यांनी पालघर येथे केला. 

वीज ग्राहकांच्या विविध समस्या बाबत त्यांनी प्रकाश टाकत या समस्यांवर विविध ठिकाणी मार्गदर्शन केले. कृषी पंप विज बिल सवलत योजना ही बोगस योजना असून सरकार कोट्यवधीची थकबाकी दाखवून शेतकऱ्याचे नाव बदनाम करत असल्याचे कटकारस्थान सुरू असल्याचे त्यांनी पुराव्यानिशी पालघर येथे दाखवून दिले. 

राज्य सरकार दरवर्षी 12 हजार कोटी रुपयांची चोरी व भ्रष्टाचार लपवण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांचा वीजवापर दुप्पट दाखवत आहे व शेतकऱ्यांना नाहक बदनाम करून त्यांची लूट करत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शेती पंप वीज ग्राहकांनी वीज बिले व थकबाकी दुरुस्तीसाठी तक्रार अर्ज आपापल्या भागात दाखल करावे व दुरुस्ती झाल्यानंतरच सवलत योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन होगाडे यांनी शेतीपंप वीज ग्राहकांना यावेळी केले. शेती पंप विज विक्री ही गळती, चोरी व भ्रष्टाचार लपवण्यासाठी अत्यंत सोयीस्कर बाब आहे. 

शेती पंपाच्या वीज वापर 31 टक्के तर महावितरणची गळती 15 टक्के असा दावा कंपनीचा असला तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती ही उलट आहे. शेती पंपाचा वापर फक्त 15 टक्के तर गळती तीस टक्के किंवा त्याहून अधिक आहे असे होगाडे यांनी म्हटले आहे. राज्यासह पालघर जिल्ह्यातील फक्त एक चतुर्थांश शेती पंप वीज ग्राहकांची वीज बिले ही रीडिंग प्रमाणे येत आहेत. बाकी बीले सरासरी किंवा त्यापेक्षा जास्त आकारले जात आहेत, असे आरोपही होगाडे यांनी महावितरण कंपनीवर केले आहेत. 

दुप्पट बिलामुळे राज्य सरकार महावितरण कंपनीला दुप्पट अनुदान देत आहे.शेती वीज पंपासाठी आयोगाचा दर 3 रुपये 29 पैसे प्रति युनिट आहे. यावर सरकार एक रुपया 56 पैसे प्रतियुनिट अनुदान देते. दुप्पट बिलिंगमुळे सरकारचे अनुदान तीन रुपये चाळीस पैसे प्रतियुनिट म्हणजे वास्तव बीला पेक्षा जास्त दिले जात आहे. त्यानंतरही शेतकऱ्यांवर 3 रुपये 12 पैसे प्रतियुनिट बोजा लादला जात आहे. खरे अनुदान 3500 कोटी रुपये आवश्यक असताना प्रत्यक्षात सरकार महावितरणला 7 कोटी रुपये अनुदान देत आहे. त्यामुळे महावितरण खोटी आकडेवारी सांगून राज्य सरकारचीही फसवणूक करीत आहे. ही फसवणूक थांबण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतीपंपाची रिडींग घेऊन बिले दुरुस्ती केल्यानंतरच खरी वस्तुस्थिती समोर येणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी उपविभागीय, विभागीय अधिकाऱ्यांकडे आपल्या शेती पंपाची वीज बिले दुरुस्तीची मागणी करावी व या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन होगाडे यांनी केले. 

पालघर येथे रविवारी झालेल्या कार्यक्रमामध्ये जनत दलाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लवेकर यांनी भविष्यामध्ये शेतकरी, सामान्य ग्राहक यांना सोबतीला घेऊन महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराविरोधात आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे होगाडे यांना आश्वस्त केले. वीज ग्राहक संघटनेचे जिल्ह्याचे कार्यवाह निखिल मेस्त्री यांनी जिल्ह्यातील विविध भागात संघटनेच्या माध्यमातून वीज ग्राहक यांच्या समस्या सोडवल्याची माहिती दिली. याचबरोबरीने काही जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये महावितरण आजही औद्योगिक (कमर्शियल) वीजदर लावन्याबाबत संघटना आक्रमक असून जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये सार्वजनिक सेवा वीजदर लागू करावे अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करणार असल्याची माहिती दिली.ह्यावेळी मच्छीमार नेत्या पौर्णिमा मेहर, जगन्नाथ ठाकूर, सुभाष मोरे, चंद्रकांत साखरे, ऑर्जा समितीचे उपाध्यक्ष मुकुंद माळी व जनता दल- वीजग्राहक संघटनेचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते,वीज ग्राहक आदी उपस्थित होते. चौकट: वीज बिलांची मुदत संपल्यानंतर 15 दिवसाची पूर्व नोटीस दिल्यानंतरच वीज वितरण कंपनी वीज परवठा खंडित करू शकते. कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांनी वीज खंडित केल्यास ही बाब बेकायदेशीर आहे व अशा कर्मचाऱ्यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचे आवाहन त्यांनी केले. 

टॅग्स :palgharपालघर