शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणासाठी प्रकाश आंबेडकरांनी भटक्या विमुक्तांंची दिशाभूल करु नये -  नरेंद्र पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 17:18 IST

सीएएला विरोध करून द्वेष पसरवल्याचा केला आरोप

डोंबिवली: केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा आणल्याचा नंतर देशभरात काही नेते राजकीय स्वार्थ मनात ठेवून समाजात तेढ निर्माण करत आहेत. राज्यातही तसा प्रयत्न होताना दिसत आहे. त्यात वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसनेही विरोधात मोर्चा काढला होता. मात्र सत्तेच्या स्वाथार्साठी बहुजन समाजाचा वापर करत आहेत. त्यामुळे यापुढे भटके विमुक्त बांधवांना पुढे करत समाजाची दिशाभूल करणं थांबवावं असे आवाहन भाजपचे प्रदेश सचिव, माजी आमदार नरेद्र पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना केले आहे.

 नरेंद्र पवार म्हणाले की, त्यांनी बुधवारी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ट्विट करुन आंबेडकर यांना आवाहन केले. हा कायदा समजून घेतला पाहीजे, समाजातील एक देशभक्त नागरिक म्हणून त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याऐवजी त्या कायद्याच्या संदर्भात द्वेष पसरवण्याचा प्रकार सुरू आहे. सशक्त, समृद्ध बलशाली राष्ट्रासाठी समाजातील सर्व घटकांनी पाठिंबा देणे गरजेचे आहे. पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान या शेजारील देशातील हिंदू, शीख, जैन, बौद्ध, ख्रिश्चन आणि पारशी यासह अल्पसंख्याक समुदायाच्या व्यक्तींना सहा वर्षाच्या वास्तव्यानंतर भारताचे नागरिकत्व देण्याची तरतूद या कायद्याच्या मार्फत केली आहे. राष्ट्रहिताच्या दृष्टीने हे बिल अत्यंत महत्त्वाचे व अत्यावश्यक असताना या कायद्याच्या विरोधात जनतेत अपप्रचार व खोटी माहिती देऊन दिशाभूल करण योग्य नाही असे ते म्हणाले.

बहुजन समाज, भटके विमुक्त बांधवांना या कायद्याच्या कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरे जावे लागणार नाही. भटके विमुक्त समाजाच्या मुख्य प्रश्नांना बगल देत त्यांना केवळ राजकारणासाठी ढाल करून वापरणं आता वंचित बहुजन आघाडीसह काँग्रेसने तातडीने थांबवावे. विरोधकांकडे राजकारणासाठी मुद्दे नसल्याने चांगल्या गोष्टींना पाठिंबा देण्याऐवजी कुठेही राजकारण करण्याची संधी शोधत आहेत. मात्र यामध्ये समाजाचे नुकसान होत असण्याचेही पवार म्हणाले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरdombivaliडोंबिवलीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार