शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

राजकारणासाठी प्रकाश आंबेडकरांनी भटक्या विमुक्तांंची दिशाभूल करु नये -  नरेंद्र पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 17:18 IST

सीएएला विरोध करून द्वेष पसरवल्याचा केला आरोप

डोंबिवली: केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा आणल्याचा नंतर देशभरात काही नेते राजकीय स्वार्थ मनात ठेवून समाजात तेढ निर्माण करत आहेत. राज्यातही तसा प्रयत्न होताना दिसत आहे. त्यात वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसनेही विरोधात मोर्चा काढला होता. मात्र सत्तेच्या स्वाथार्साठी बहुजन समाजाचा वापर करत आहेत. त्यामुळे यापुढे भटके विमुक्त बांधवांना पुढे करत समाजाची दिशाभूल करणं थांबवावं असे आवाहन भाजपचे प्रदेश सचिव, माजी आमदार नरेद्र पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना केले आहे.

 नरेंद्र पवार म्हणाले की, त्यांनी बुधवारी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ट्विट करुन आंबेडकर यांना आवाहन केले. हा कायदा समजून घेतला पाहीजे, समाजातील एक देशभक्त नागरिक म्हणून त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याऐवजी त्या कायद्याच्या संदर्भात द्वेष पसरवण्याचा प्रकार सुरू आहे. सशक्त, समृद्ध बलशाली राष्ट्रासाठी समाजातील सर्व घटकांनी पाठिंबा देणे गरजेचे आहे. पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान या शेजारील देशातील हिंदू, शीख, जैन, बौद्ध, ख्रिश्चन आणि पारशी यासह अल्पसंख्याक समुदायाच्या व्यक्तींना सहा वर्षाच्या वास्तव्यानंतर भारताचे नागरिकत्व देण्याची तरतूद या कायद्याच्या मार्फत केली आहे. राष्ट्रहिताच्या दृष्टीने हे बिल अत्यंत महत्त्वाचे व अत्यावश्यक असताना या कायद्याच्या विरोधात जनतेत अपप्रचार व खोटी माहिती देऊन दिशाभूल करण योग्य नाही असे ते म्हणाले.

बहुजन समाज, भटके विमुक्त बांधवांना या कायद्याच्या कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरे जावे लागणार नाही. भटके विमुक्त समाजाच्या मुख्य प्रश्नांना बगल देत त्यांना केवळ राजकारणासाठी ढाल करून वापरणं आता वंचित बहुजन आघाडीसह काँग्रेसने तातडीने थांबवावे. विरोधकांकडे राजकारणासाठी मुद्दे नसल्याने चांगल्या गोष्टींना पाठिंबा देण्याऐवजी कुठेही राजकारण करण्याची संधी शोधत आहेत. मात्र यामध्ये समाजाचे नुकसान होत असण्याचेही पवार म्हणाले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरdombivaliडोंबिवलीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार