शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

राजकारणासाठी प्रकाश आंबेडकरांनी भटक्या विमुक्तांंची दिशाभूल करु नये -  नरेंद्र पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 17:18 IST

सीएएला विरोध करून द्वेष पसरवल्याचा केला आरोप

डोंबिवली: केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा आणल्याचा नंतर देशभरात काही नेते राजकीय स्वार्थ मनात ठेवून समाजात तेढ निर्माण करत आहेत. राज्यातही तसा प्रयत्न होताना दिसत आहे. त्यात वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसनेही विरोधात मोर्चा काढला होता. मात्र सत्तेच्या स्वाथार्साठी बहुजन समाजाचा वापर करत आहेत. त्यामुळे यापुढे भटके विमुक्त बांधवांना पुढे करत समाजाची दिशाभूल करणं थांबवावं असे आवाहन भाजपचे प्रदेश सचिव, माजी आमदार नरेद्र पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना केले आहे.

 नरेंद्र पवार म्हणाले की, त्यांनी बुधवारी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ट्विट करुन आंबेडकर यांना आवाहन केले. हा कायदा समजून घेतला पाहीजे, समाजातील एक देशभक्त नागरिक म्हणून त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याऐवजी त्या कायद्याच्या संदर्भात द्वेष पसरवण्याचा प्रकार सुरू आहे. सशक्त, समृद्ध बलशाली राष्ट्रासाठी समाजातील सर्व घटकांनी पाठिंबा देणे गरजेचे आहे. पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान या शेजारील देशातील हिंदू, शीख, जैन, बौद्ध, ख्रिश्चन आणि पारशी यासह अल्पसंख्याक समुदायाच्या व्यक्तींना सहा वर्षाच्या वास्तव्यानंतर भारताचे नागरिकत्व देण्याची तरतूद या कायद्याच्या मार्फत केली आहे. राष्ट्रहिताच्या दृष्टीने हे बिल अत्यंत महत्त्वाचे व अत्यावश्यक असताना या कायद्याच्या विरोधात जनतेत अपप्रचार व खोटी माहिती देऊन दिशाभूल करण योग्य नाही असे ते म्हणाले.

बहुजन समाज, भटके विमुक्त बांधवांना या कायद्याच्या कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरे जावे लागणार नाही. भटके विमुक्त समाजाच्या मुख्य प्रश्नांना बगल देत त्यांना केवळ राजकारणासाठी ढाल करून वापरणं आता वंचित बहुजन आघाडीसह काँग्रेसने तातडीने थांबवावे. विरोधकांकडे राजकारणासाठी मुद्दे नसल्याने चांगल्या गोष्टींना पाठिंबा देण्याऐवजी कुठेही राजकारण करण्याची संधी शोधत आहेत. मात्र यामध्ये समाजाचे नुकसान होत असण्याचेही पवार म्हणाले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरdombivaliडोंबिवलीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार