शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

राजकीय पक्ष काढल्याशिवाय ओबीसीना पर्याय नाही: प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 22:05 IST

ओबीसीना आरक्षण देण्यास या सरकारची मानसिकता नसून आरक्षण मिळवण्यासाठी सत्ता काबीज करणे महत्वाचे आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : ओबीसीना आरक्षण देण्यास या सरकारची मानसिकता नसून आरक्षण मिळवण्यासाठी सत्ता काबीज करणे महत्वाचे आहे. त्यामुळे आरक्षणाचा लढा सुप्रीम कोर्टात योग्यरीत्या मांडण्यासाठी तसेच आपल्या न्याय हक्कासाठी राजकीय पक्ष स्थापन केल्याशिवाय पर्याय नाही असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. आम्ही ओबीसीच्या पाठीशी आहोत म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेणार नाही अशी घोषणा केली जाते. मात्र दुसरीकडे जिथे आरक्षणच नाही अशा विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूका घेतल्या जाणार,सत्तेपासून ओबीसीना वंचित ठेवण्याचा हा डाव असून ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेत संधी आहे त्याच निवडणूका घेतल्या जात नसल्याबाबत त्यांनी ओबीसी समाजाचे लक्ष वेधले. 

ठाणे ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने प्रमुख निमंत्रक प्रफुल वाघुले यांच्यावतीने गडकरी रंगायतनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर बोलत होते. ओबीसीना सामाजिक ओळख मिळावी हा आमचा देखील प्रयत्न होता. तोच प्रयत्न या एकीकरण समितीच्या माध्यमातून होत असल्याबाबद्दल त्यांनी एकीकरण समितीचेही कौतुक यावेळी केले. आंबेडकर पुढे म्हणाले, आज जात जातनिहाय जनगणना झाली तर कितीतरी जाती अस्तत्वात नसल्याचे समोर येईल. अशा प्रकारची जनगणना झाली तरी स्वातंत्र्यनंतरही जो समाज सुरक्षित नाही,तो उठाव करून उठेल म्हणूनच ही जनगणना केली जात नाही,त्यामुळे जोपर्यंत जनगणना होणार नाही तोपर्यंत आरक्षण मिळणार नाही असा आरोप त्यांनी यावेळी केला. 

सत्ता कोणाचीही असो मात्र प्रामाणिकता पूर्णपणे संपली आहे. १२ पर्यंत आरक्षणाची गरज भासत नाही मात्र खरी आरक्षणाची गरज नंतर पडते. गेल्या ७० वर्षांच्या कालावधीत एज्युकेशन ऑफ चॉईस अशी परिस्थिती निर्माण करता आलेली नाही अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. एखाद्या समाजाला दुर्लक्षित करणे ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे ओबीसीना स्वतःचे राजकीय अस्तित्व निर्माण करावे लागेल. आरक्षण मागून मिळणार नाही तर ते खेचून आणावे लागेल असे सांगत यासाठी ओबीसी समाजाला राजकीय पक्ष काढावाच लागेल असे प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला हरिभाऊ राठोड, विद्या चव्हाण तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. विविध समाजातील घटकांना एकत्र आणण्यासाठी सर्वच स्तरातून पाठबळ मिळाले असल्याचे कार्यक्रमाचे निमंत्रक प्रफुल वाघुले यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरthaneठाणे