शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

खड्ड्यांचे ‘विघ्न’ होणार दूर; ठामपा आयुक्तांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 01:01 IST

गणरायाच्या मार्गातील खड्डे १० सप्टेंबरपर्यंत भरण्याचे आदेश

ठाणे : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणरायाचे आगमन यंदा खड्ड्यातून होईल, अशी भावना ठाणेकरांची झाली असतानाच यंदा विघ्नहर्त्याचे आगमन हे खड्डेमुक्त रस्त्यातून होईल, असा दावा महापालिकेने केला. यासाठी गणरायाचे आगमन व विसर्जनाच्या मार्गावरील खड्डे कोणत्याही परिस्थितीत १० सप्टेंबरपर्यंत भरण्याचे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंगळवारी संबंधित विभागाला दिले. दरम्यान, सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपाची परवानगी देण्याची प्रक्रिया सोपी करतानाच २४ तासांत मंडप परवानगी देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शहरातील विविध रस्त्यांना पुन्हा खड्डे पडले आहेत. त्यात येत्या काही दिवसांवर महापौर मॅरेथॉन स्पर्धा येऊन ठेपली आहे. त्यानंतर लागलीच गणरायाचे आगमन होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्याने शहरातील खड्ड्यांचे प्रमाण वाढले असल्याचे स्पष्ट करून आयुक्तांनी ते भरण्याची मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात यावी, असे स्पष्ट आदेश दिले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेल्या मार्गिका नकाशाची महापालिका आयुक्तांनी पाहणी करून त्यानुसार खड्डे भरण्याची मोहीम हाती घेण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपाची परवानगी देण्याची प्रक्रि या सुलभ करतानाच अर्ज प्राप्त झाल्यानंतर २४ तासांत परवानगी देण्याची कार्यवाही करण्यात यावी. मात्र, हे करताना उच्च न्यायालयाच्या निर्देशांची पायमल्ली होणार नाही, याची दक्षता घ्यावी अशा सूचनाही त्यांनी सर्व सहायक आयुक्तांना दिल्या.सण साजरा करण्याच्या पद्धतीवर आक्षेप बेडेकरांची भूमिका : भक्तांचा विरोधठाणे : मराठी सणांवर निर्बंध आणणे चुकीचे आहे. नागरिकांना त्रास होणार नाही अशाच पद्धतीने आम्ही उत्सव साजरा करतो. वाहतूककोंडी होणार नाही याची स्वयंसेवक काळजी घेतात. कारवाई केल्यासएकेक कार्यकर्ता रस्त्यावर झोपेल, असा इशारा ठाणे शहरातील गणेशोत्सव मंडळांनी दिला. डॉ. महेश बेडेकर यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत घेतलेल्या भूमिकेला गणेशभक्तांनी विरोध दर्शविला असून, माझा सणाला नव्हे तर तो साजरा करण्याच्या पद्धतीवर आक्षेप असल्याचे डॉ. बेडेकर यांनी स्पष्ट केले.अद्याप कोणत्याही गणेश मंडळाने मंडप उभारणीसाठी परवानगी मागितेली नाही. मुळात, परवानगी देणे हे पोलिसांकडे नाही. पोलीस केवळ मंडपांसाठी एनओसी देतात. सर्व अटी आणि नियमांच्या अधीन राहूनच ही एनओसी दिली जाणार आहे.- सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त, ठाणे शहरसण, उत्सवांसाठी नियम साधे आहेत. जे रस्ते अपुरे आहेत, ते अडवू नका, कारण ते आपल्या धर्मात नाही. ध्वनिप्रदूषण करू नका. रस्ते अडविणे, खड्डे खणणे, जोरजोरात डीजे वाजविणे हे धर्मात बसत असेल तर बिनधास्त करा. वर्षानुवर्षे सुरू असलेले सण बंद होणार नाही. पण ते साजरे करण्याच्या पद्धतीवर माझा आक्षेप आहे. मंडळं ही आपलीच आहेत, कारवाई कोणालाही आवडत नाही. कोर्टाने सण बंद करा असे सांगितलेले नाही. लोकांना त्रास होईल, अशाप्रकारे सण साजरा करू नका असे सांगितले आहे. - डॉ. महेश बेडेकरमंडप हे कोर्टाच्या नियमानुसारच बांधले जात आहेत. त्रास मंडपांचा नाही तर आजूबाजूला त्या काळात असलेल्या फेरीवाल्यांचा होत असतो. परंतु, पालिका त्याकडे दुर्लक्ष करते. हा मुद्दा मांडल्यावर पालिकेचे अधिकारी निरुत्तर होते. पालिका अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत हा मुद्दा मांडला तेव्हा त्या काळात फेरीवाल्यांवर कारवाईचे आश्वासन पालिकेने दिले आहे. डॉ. महेश बेडेकरांनी सर्व धर्मांबद्दल मुद्दा मांडला तर कोर्ट फक्त गणेशोत्सवासाठी कसे आदेश काढते. कोर्टाच्या आदेशानुसार कधी इतर धर्मियांचे सण साजरे होत नाही. डॉ. बेडेकरांना गणेशोत्सवावर आक्षेप असेल तर त्यांना सांगू इच्छितो, हा उत्सव आम्ही टाइमपास म्हणून साजरा करीत नाही. सण, उत्सवाच्या काळात ठाण्यात डीजे वाजतच नाहीत. नियम सर्व धर्मांना सारखे असतील तर इतर धर्म हे नियम का पाळत नाहीत. प्रशासन नियमांच्याबाबत भेदभाव करीत आहे.- समीर सावंत, अध्यक्ष, ठाणे गणेशोत्सव समितीगेले ३५ वर्षे आम्ही गणेशोत्सव साजरा करीत आहोत. १२ वर्षांपूर्वी काँक्रीटीकरण झाले तेव्हाच आम्ही खड्डे पाडून घेतले होते. इतरवेळी ते आम्ही प्लॅस्टिक पाइप आणि लोखंडी प्लेटने झाकून ठेवतो. मंडप आहे तिथेच राहणार आहे. कारवाई केल्यास उपायुक्तांना काळे फासायची तयारी आम्ही ठेवली आहे.- हेमंत वाणी, आशीर्वाद मित्र मंडळ, खोपटगेली ४० वर्षे हा उत्सव साजरा केला जातो. अद्याप मंडप घातलेला नाही. परवानगीसाठी पत्र दिले आहे. परंतु, मंडप घातल्यावर आमच्यावर कारवाई झाल्यास आम्ही त्याला घाबरणार नाही. मंडपाच्या इथे वर्षभर पार्किंग असते. ती संबंधित अधिकाºयांना दिसत नाही का?- जिवाजी कदम,चंदनवाडी गणेशसेवा मंडळ, चंदनवाडीगेल्या ३० वर्षांपासून आम्ही उत्सव साजरा करीत आहोत. आम्ही न्यायालयालाचा अवमान करीत नाही. कळव्याच्या मुख्य बाजारपेठेत आम्ही उत्सव साजरा करतो पण आजवर कोणीही तक्रार केलेली नाही.- महेश साळवी, नमस्कार मित्र मंडळ, कळवाकोर्टाच्या आदेशानुसार मंडप उभारला जाईल. मंडपासाठी पालिकेकडून परवानगी घेतली आहे.- अरविंद सिंग, शिवसेना शाखा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, खेवरासर्कलमंडप आहे तसेच राहणार, कारवाईला घाबरणार नाही. खड्डे पाडल्याशिवाय मंडप उभा राहील का? - सुशांत सूर्यराव,न्यू सूर्यानगर मित्र मंडळ, विटावा

टॅग्स :Potholeखड्डेthaneठाणे