शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

खड्डेच खड्डे... ठाणे ते नाशिक आठ तासांचा जीवघेणा प्रवास; कसाऱ्यापर्यंत वाहन चालकांची परीक्षा

By नितीन पंडित | Updated: July 28, 2023 10:25 IST

वाहतूक कोंडीमुळे प्रवासी अक्षरश: मेटाकुटीला

नितीन पंडित,लोकमत न्यूज नेटवर्क

भिवंडी : ठाण्याहून नाशिकला जाण्यासाठी फार तर साडेतीन तास लागतात. मात्र, सध्या मुंबई - नाशिक महामार्गावर ठाण्यापासून पुढे प्रचंड खड्डे पडल्यामुळे याच प्रवासासाठी सात ते आठ तास लागतात. 

ठाणे ते भिवंडी किंवा कल्याण प्रवासासाठी एरव्ही पाऊणतास लागतो. मात्र, सध्या या प्रवासाकरिता तीन ते साडेतीन तास लागतात. या मार्गावर प्रवास करायचा म्हणजे एक कठोर शिक्षा झाल्याची भावना तासनतास बस, गाडीत अडकून पडलेले प्रवासी व्यक्त करत आहेत. या मार्गावरून वरचेवर प्रवास करणाऱ्यांना पाठदुखीचे आजार जडले आहेत.

भिवंडीत सध्या प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत. वाहनात बसून अक्षरश: विटलेले काही प्रवासी रस्त्यावर उतरून खड्डे व चिखल तुडवत दोन ते तीन किलोमीटर पायी प्रवास करत आहेत. या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका कामगारांबरोबरच शालेय विद्यार्थ्यांना बसला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

मुंबई - नाशिक महामार्गावर हायवे दिवे ते पडघापर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.

केंद्रीय मंत्र्यांच्या घरापाशी कोंडी

केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांचे घर मुंबई - नाशिक महामार्गावर दिवे गावात रस्त्यालगत असल्याने मंत्री पाटील यांच्या घरी ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी येथे वाहने अडविली जातात. त्यामुळे येथे वाहनांचा वेग संथ होतो व येथूनच पुढे पडघ्यापर्यंत वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. भिवंडीतील गोदामात मुंबईवरून भिवंडीत येणारी व भिवंडीतून मुंबईला जाणारी वाहने मानकोली नाक्यावरून वळण घेत असल्याने येथे प्रचंड वाहतूक कोंडी होते. 

मंत्री, आमदार अडकूनही परिस्थिती ‘जैसे थे’

आमदार सत्यजित तांबे हे या वाहतूक कोंडीत अडकले होते. ट्विट करत त्यांनी या भागातील नागरिकांच्या सहनशीलतेचे कौतुक केले होते. भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी अधिवेशनात वाहतूक कोंडीचा मुद्दा उपस्थित केला. भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी तर वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे अधिवेशनात राज्य सरकारला धारेवर धरले. यापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी स्वतः खारेगाव ते वडपा रस्त्याची पाहणी केली. 

टॅग्स :Nashikनाशिक