शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

खड्डेच खड्डे... ठाणे ते नाशिक आठ तासांचा जीवघेणा प्रवास; कसाऱ्यापर्यंत वाहन चालकांची परीक्षा

By नितीन पंडित | Updated: July 28, 2023 10:25 IST

वाहतूक कोंडीमुळे प्रवासी अक्षरश: मेटाकुटीला

नितीन पंडित,लोकमत न्यूज नेटवर्क

भिवंडी : ठाण्याहून नाशिकला जाण्यासाठी फार तर साडेतीन तास लागतात. मात्र, सध्या मुंबई - नाशिक महामार्गावर ठाण्यापासून पुढे प्रचंड खड्डे पडल्यामुळे याच प्रवासासाठी सात ते आठ तास लागतात. 

ठाणे ते भिवंडी किंवा कल्याण प्रवासासाठी एरव्ही पाऊणतास लागतो. मात्र, सध्या या प्रवासाकरिता तीन ते साडेतीन तास लागतात. या मार्गावर प्रवास करायचा म्हणजे एक कठोर शिक्षा झाल्याची भावना तासनतास बस, गाडीत अडकून पडलेले प्रवासी व्यक्त करत आहेत. या मार्गावरून वरचेवर प्रवास करणाऱ्यांना पाठदुखीचे आजार जडले आहेत.

भिवंडीत सध्या प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत. वाहनात बसून अक्षरश: विटलेले काही प्रवासी रस्त्यावर उतरून खड्डे व चिखल तुडवत दोन ते तीन किलोमीटर पायी प्रवास करत आहेत. या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका कामगारांबरोबरच शालेय विद्यार्थ्यांना बसला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

मुंबई - नाशिक महामार्गावर हायवे दिवे ते पडघापर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.

केंद्रीय मंत्र्यांच्या घरापाशी कोंडी

केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांचे घर मुंबई - नाशिक महामार्गावर दिवे गावात रस्त्यालगत असल्याने मंत्री पाटील यांच्या घरी ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी येथे वाहने अडविली जातात. त्यामुळे येथे वाहनांचा वेग संथ होतो व येथूनच पुढे पडघ्यापर्यंत वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. भिवंडीतील गोदामात मुंबईवरून भिवंडीत येणारी व भिवंडीतून मुंबईला जाणारी वाहने मानकोली नाक्यावरून वळण घेत असल्याने येथे प्रचंड वाहतूक कोंडी होते. 

मंत्री, आमदार अडकूनही परिस्थिती ‘जैसे थे’

आमदार सत्यजित तांबे हे या वाहतूक कोंडीत अडकले होते. ट्विट करत त्यांनी या भागातील नागरिकांच्या सहनशीलतेचे कौतुक केले होते. भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी अधिवेशनात वाहतूक कोंडीचा मुद्दा उपस्थित केला. भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी तर वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे अधिवेशनात राज्य सरकारला धारेवर धरले. यापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी स्वतः खारेगाव ते वडपा रस्त्याची पाहणी केली. 

टॅग्स :Nashikनाशिक