शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

वाडा तालुक्यात आता भाताशी स्पर्धा करतो आहे बटाटा

By admin | Updated: January 6, 2016 00:58 IST

सध्याच्या तरूणांचा ओढा हा नोकऱ्यांकडे अधिक असतो. शेतीपेक्षा ते नोकरीला जास्त प्राधान्य देतात. मात्र वाडा तालुक्यातील काही तरूणांनी एकत्र येऊन आपआपल्या शेतात प्रायोगिक

वसंत भोईर, वाडासध्याच्या तरूणांचा ओढा हा नोकऱ्यांकडे अधिक असतो. शेतीपेक्षा ते नोकरीला जास्त प्राधान्य देतात. मात्र वाडा तालुक्यातील काही तरूणांनी एकत्र येऊन आपआपल्या शेतात प्रायोगिक तत्त्वावर २५ एकर क्षेत्रात बटाट्याची लागवड केली आहे. या लागवडी बरोबरच ऊस, केळी, आले, पपई अशी पिके घेण्याचा त्यांचा मानस या तरूण शेतकऱ्यांनी व्यक्त केला असून ते कृषी क्रांती करू पाहत आहेत. वाडा तालुक्याला'भाताचे कोठार' म्हणून संबोधले जाते. येथील' वाडा कोलम ' हा भाताचा वाण राज्यभर प्रसिद्ध आहे. मुंबईच्या बाजारा पेठेतही त्याला मोठी मागणी आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे भात शेती दर वर्षी तोट्यात जात असल्याने हळूहळू येथील शेतकरी आता भाजीपाला, फुलशेती याकडे वळवला आहे. त्याच बरोबर आता तर बटाटा, केळी, ऊस, पपईची लागवड येथील शेतकरी करीत आहे. तालुक्यातील तरूण शेतकऱ्यांनी 'शांतीदूत ग्रुप फामिॅग' या संस्थेची स्थापना केली असून तिचे दोनशे पन्नास तरूण शेतकरी सदस्य झाले आहेत. यापुढे पुढील वर्षांत ३ हजार ५०० शेतकरी सदस्य करण््याचा त्यांचा विचार असून येथे 'कृषी क्रांती' करण्याचा मानस आहे. आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या शेतकऱ्यांना भातपीका ऐवजी इतर पिकांचा पर्याय सर्व मार्गदर्शनासह देऊन स्वावलंबी बनविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. तालुक्यातील देवघर, गांध्रे, ढाढरे, कांबारा, घोडमाळ, आंबिस्ते , पालसई, विलकोस, निचोळे, वावेघर, शेलटा, बोरांडा या गावात सुमारे २५ एकर जागेत या वर्षी बटाट्याची लागवड केली आहे. बटाट्याची लागवड थंडीच्या काळात केली जाते. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही लागवड केली असून हे पीक आता हिरवेगार बहरले आहे. त्यासाठी सर्व प्रथम जमिनीची नांगरणी केली जाते. नंतर वाफे तयार करतात. त्यानंतर पाणी देऊन ते भिजवले जातात. ते पुन्हा सुकवून दोन ते तीन दिवसात आठ इंच अंतरावर व चार इंच खोलीवर बटाट्याची लागवड केली जाते. येथील वातावरण, हवामान व जमिन या पिकासाठी योग्य असल्याचे येथील शेतकरी सांगतात. या पिकाला कमी पाणी लागते. तसेच औषधे, खते, मजुरीचा खर्च अंत्यत कमी असतो. तसेच शेणखताचा जास्त मारा दिल्यास अधिक चांगले असते. या पिकावर रोगाचा प्रार्दुभाव होण्याचे प्रमाण कमी असते. चार ते पाच मजूर सर्व पिकाची लागवड तसेच देखभाल करू शकतात. त्यामुळे या पिकाला मजूरीचा खर्च फारसा होत नाही. निबोंली मेन्टस व १८:१८ :१८ या खताचा वापर यासाठी केला जातो. एक एकर जागेत ७०० ते ८०० किलो बियाणे लागते. एकरी २३ हजार झाडे बसतात. त्याचे उत्पन्न १० ते १४ टनापर्यंत येते. एका एकराला १ लाख ४० हजारापर्यत मिळू शकते. या पिकावर करपा व बुरशी जन्य रोग पडू शकतात. मात्र औषध वेळेवर मारल्यास ते टाळता येतात. हे पिक वेफर्ससाठी ९० दिवसात तयार होते तर भाजीसाठी ७५ दिवसात तयार होते. येथील तरूण शेतकरी व कुणबी सेनेचे नेते प्रफुल्ल पाटील यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली शांतीदूत ग्रुप फामिॅगची स्थापना करण्यात आली आहे. बटाटे शेतीसाठी बि - बियाणे तज्ञ गणेश पवार व तज्ञ शेतकरी अरूण मोरे, परदेशातील तज्ञही या शेतीसाठी मार्गदर्शन करीत आहे. वेळोवेळी ते प्रत्यक्ष पाहणीही करीत आहेत. तसेच समूह मार्गदर्शनाचाही लाभ देत आहेत. कोणत्या शेतकऱ्यांच्या शेतात काय झाले याची माहिती शेतकरी देतात त्यानंतर लगेच त्यावर उपाययोजना होत आहे. प्रफुल्ल पाटील यांनी देवघर येथे स्वत: २ एकर जागेत बटाट्याची लागवड केली असून हे पीक आत्ता पर्यंत समाधानकारक आले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी ही शेती असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या तरूणांचा शेतीकडे बघणाच्या दृष्टिकोन वेगळा आहे. बटाटेशेती, ऊस, आले, पपई शेती आपण केली तर नोकरीपेक्षा जास्त पैसे आपण कमावू शकतो. असा आत्मविश्वास त्यांना आहे.