शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

वाडा तालुक्यात आता भाताशी स्पर्धा करतो आहे बटाटा

By admin | Updated: January 6, 2016 00:58 IST

सध्याच्या तरूणांचा ओढा हा नोकऱ्यांकडे अधिक असतो. शेतीपेक्षा ते नोकरीला जास्त प्राधान्य देतात. मात्र वाडा तालुक्यातील काही तरूणांनी एकत्र येऊन आपआपल्या शेतात प्रायोगिक

वसंत भोईर, वाडासध्याच्या तरूणांचा ओढा हा नोकऱ्यांकडे अधिक असतो. शेतीपेक्षा ते नोकरीला जास्त प्राधान्य देतात. मात्र वाडा तालुक्यातील काही तरूणांनी एकत्र येऊन आपआपल्या शेतात प्रायोगिक तत्त्वावर २५ एकर क्षेत्रात बटाट्याची लागवड केली आहे. या लागवडी बरोबरच ऊस, केळी, आले, पपई अशी पिके घेण्याचा त्यांचा मानस या तरूण शेतकऱ्यांनी व्यक्त केला असून ते कृषी क्रांती करू पाहत आहेत. वाडा तालुक्याला'भाताचे कोठार' म्हणून संबोधले जाते. येथील' वाडा कोलम ' हा भाताचा वाण राज्यभर प्रसिद्ध आहे. मुंबईच्या बाजारा पेठेतही त्याला मोठी मागणी आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे भात शेती दर वर्षी तोट्यात जात असल्याने हळूहळू येथील शेतकरी आता भाजीपाला, फुलशेती याकडे वळवला आहे. त्याच बरोबर आता तर बटाटा, केळी, ऊस, पपईची लागवड येथील शेतकरी करीत आहे. तालुक्यातील तरूण शेतकऱ्यांनी 'शांतीदूत ग्रुप फामिॅग' या संस्थेची स्थापना केली असून तिचे दोनशे पन्नास तरूण शेतकरी सदस्य झाले आहेत. यापुढे पुढील वर्षांत ३ हजार ५०० शेतकरी सदस्य करण््याचा त्यांचा विचार असून येथे 'कृषी क्रांती' करण्याचा मानस आहे. आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या शेतकऱ्यांना भातपीका ऐवजी इतर पिकांचा पर्याय सर्व मार्गदर्शनासह देऊन स्वावलंबी बनविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. तालुक्यातील देवघर, गांध्रे, ढाढरे, कांबारा, घोडमाळ, आंबिस्ते , पालसई, विलकोस, निचोळे, वावेघर, शेलटा, बोरांडा या गावात सुमारे २५ एकर जागेत या वर्षी बटाट्याची लागवड केली आहे. बटाट्याची लागवड थंडीच्या काळात केली जाते. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही लागवड केली असून हे पीक आता हिरवेगार बहरले आहे. त्यासाठी सर्व प्रथम जमिनीची नांगरणी केली जाते. नंतर वाफे तयार करतात. त्यानंतर पाणी देऊन ते भिजवले जातात. ते पुन्हा सुकवून दोन ते तीन दिवसात आठ इंच अंतरावर व चार इंच खोलीवर बटाट्याची लागवड केली जाते. येथील वातावरण, हवामान व जमिन या पिकासाठी योग्य असल्याचे येथील शेतकरी सांगतात. या पिकाला कमी पाणी लागते. तसेच औषधे, खते, मजुरीचा खर्च अंत्यत कमी असतो. तसेच शेणखताचा जास्त मारा दिल्यास अधिक चांगले असते. या पिकावर रोगाचा प्रार्दुभाव होण्याचे प्रमाण कमी असते. चार ते पाच मजूर सर्व पिकाची लागवड तसेच देखभाल करू शकतात. त्यामुळे या पिकाला मजूरीचा खर्च फारसा होत नाही. निबोंली मेन्टस व १८:१८ :१८ या खताचा वापर यासाठी केला जातो. एक एकर जागेत ७०० ते ८०० किलो बियाणे लागते. एकरी २३ हजार झाडे बसतात. त्याचे उत्पन्न १० ते १४ टनापर्यंत येते. एका एकराला १ लाख ४० हजारापर्यत मिळू शकते. या पिकावर करपा व बुरशी जन्य रोग पडू शकतात. मात्र औषध वेळेवर मारल्यास ते टाळता येतात. हे पिक वेफर्ससाठी ९० दिवसात तयार होते तर भाजीसाठी ७५ दिवसात तयार होते. येथील तरूण शेतकरी व कुणबी सेनेचे नेते प्रफुल्ल पाटील यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली शांतीदूत ग्रुप फामिॅगची स्थापना करण्यात आली आहे. बटाटे शेतीसाठी बि - बियाणे तज्ञ गणेश पवार व तज्ञ शेतकरी अरूण मोरे, परदेशातील तज्ञही या शेतीसाठी मार्गदर्शन करीत आहे. वेळोवेळी ते प्रत्यक्ष पाहणीही करीत आहेत. तसेच समूह मार्गदर्शनाचाही लाभ देत आहेत. कोणत्या शेतकऱ्यांच्या शेतात काय झाले याची माहिती शेतकरी देतात त्यानंतर लगेच त्यावर उपाययोजना होत आहे. प्रफुल्ल पाटील यांनी देवघर येथे स्वत: २ एकर जागेत बटाट्याची लागवड केली असून हे पीक आत्ता पर्यंत समाधानकारक आले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी ही शेती असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या तरूणांचा शेतीकडे बघणाच्या दृष्टिकोन वेगळा आहे. बटाटेशेती, ऊस, आले, पपई शेती आपण केली तर नोकरीपेक्षा जास्त पैसे आपण कमावू शकतो. असा आत्मविश्वास त्यांना आहे.