शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

कल्याण जिल्हा परिषदेच्या सहा जागा व पंचायत समितीच्या 12 जागांसाठी शांततेत मतदान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 18:28 IST

कल्याण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा जागा व पंचायत समितीच्या 12 जागांसाठी आज मतदान घेण्यात आले. मतदानासाठी विविध मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदारांनी रांगा लावल्या होत्या.

कल्याण- कल्याण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा जागा व पंचायत समितीच्या 12 जागांसाठी आज मतदान घेण्यात आले. मतदानासाठी विविध मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदारांनी रांगा लावल्या होत्या. कल्याण तालुक्यात दुपारपर्यंत 55 टक्के मतदान झाले होते. मतदानाची टक्केवारी पाहता सगळ्याच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळाले.वरप गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका मतदान केंद्रावर 1 हजार 27 मतदारांचे मतदान होते. दुपारी 1 वाजता या मतदान केंद्रावर 40 मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला होता. कांबा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील तीन मतदान केंद्रावर दुपारी दीड वाजेर्पयत 61 ते 70 टक्के मतदान झाले होते. मतदानाची टक्केवारी संपूर्ण तालुक्यात दुपारी एक वाजता 48 टक्के असताना कांबा गावातील मतदानाची टक्केवारी पाहता कांबा गावातील मतदारांनी मतदानात आघाडी घेतली असल्याचे दिसून आले.कल्याण तालुक्यातील चार गण सोडता अन्य ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादीची युती असली तरी कांबा गटातून निवडणूक लढविणारे शिवसेनेचे उमेदवार संदीप पावशे यांनी सांगितले की, केवळ कांबा गटातच शिवसेना-भाजपाची युती आहे. जास्तीचे मतदान हे आम्हाला फायदेशीर ठरू शकते, असा दावा पावशे यांनी केला. म्हारळ गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मतदान केंद्रात मतदारांनी मतदानासाठी एकच गर्दी केली होती. म्हारळ गावातील मतदान प्रक्रिया कशा प्रकारे सुरू आहे, याची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह युवा सेनेचे जिल्हाधिकारी दीपेश म्हात्रे, उल्हासनगरचे शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी भेट दिली.प्रत्यक्ष पाहणी पश्चात खासदार शिंदे यांनी सांगितले की, मतदानाची आकडेवारी पाहता शिवसेना राष्ट्रवादीला चांगल्या जागा मिळतील. जिल्हा परिषदेवर शिवसेनाचा भगवा झेंडा फडकेल, असा दावा खासदार शिंदे यांनी यावेळी केला.नेवाळी आंदोलनामुळे खोणीत तणावपूर्ण शांततेत मतदाननेवाळी विमानतळासाठी ब्रिटिश काळात शेतक-यांच्या जमिनी घेतल्या होत्या. त्या परत मिळाव्यात यासाठी नेवाळी परिसरातील शेतक-यांनी जून 2017 मध्ये आंदोलन केले होते. या आंदोलनापश्चात खोणी व पिंपरी परिसरात निवडणूक होत असल्याने खोणी परिसरात तणावपूर्ण शांतते मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. 2002 साली नवी मुंबई महापालिकेतून वगळण्यात आलेली 14 गावे ही कल्याण तालुक्यातील तहसील व कल्याण पंचायत समितीला जोडल्याने या गावांनी खोणी गट व पिंपरी गणासाठी मतदान केले.

मांजर्लीत बदलापूर मांजर्ली गावातील मांजर्ली गटाच्या मतदार यादीत बदलापूर मांजर्ली गावातील 80 मतदारांची नावे मिळून आली. मतदान प्रतिनिधींनी या नावांना आक्षेप घेतला. मात्र हा आक्षेप मतदान अधिका-यांनी धुडकावून लावला. 

टॅग्स :kalyanकल्याण