शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

CoronaVirus News: मीरा- भाईंदरमध्ये लॉकडाऊन वाढ अजून झाली नसतानाच राजकारण तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 15:57 IST

लॉकडाऊन वाढवल्यास आंदोलनाचे राजकारण्यांचे इशारे 

मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वाढवण्यात आलेल्या लॉक डाऊनची मुदत 18 जुलैला संपणार असून लॉक डाऊन वाढवण्याचा कोणताच निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला नसताना शहरातील राजकारण्यांनी मात्र आता पासूनच लॉक डाऊन वरून बोंबाबोंब करत विविध इशारे देत शहरातील वातावरण तापवण्यास सुरवात केली आहे . 

जगभरात कोरोना विषाणूने थैमान घालत सर्वांनाच हतबल करून टाकले असून मार्च पासून चालवण्यात आलेल्या लॉक डाऊन नंतर देखील कोरोना पूर्णपणे रोखणे शक्य झालेले नाही . लॉक डाऊन मुळे कोरोना पसरण्यावर काही प्रमाणात नियंत्रण आले असले तरी लॉक डाऊन आता पर्याय राहिलेला नाही . 

मुळात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क घालणे , गर्दी न करता सोशल डिस्टंसिंग ठेवणे , हात स्वच्छ धुतल्याशिवाय नाक - तोंडाला स्पर्श न करणे व कोरोना बाधित आणि संशियतांनी वेळीच  वेगळे करून उपचार घेणे हे प्रभावी उपाय आवश्यक असताना त्याचे पालन मात्र केले जात नाही . त्यामुळेच कोरोनाचे रुग्ण आणि बळी वाढत चालले आहेत असे जाणकारांचे  आहे . 

परंतु बहुतांश लोकप्रतिनिधी , राजकारणी मात्र संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्यासह निर्देशांचे होणारे उल्लंघन रोखण्यासाठी प्रभावी पावले उचलत नाहीत . त्या ऐवजी आरोप प्रत्यारोप व राजकारण करण्यासह एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्यातच धन्यता मानत आहेत. 

आमदार गीता जैन यांनी तर लॉक डाऊन पुन्हा वाढवल्यास जेलभरो आंदोलन करू असे इशारा दिला आहे . मनसे ने देखील निवेदन देऊन विरोध केला आहे . संदीप राणे यांच्या रिक्षा संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिलाय .  खाजगी संस्थेच्या माध्यमातून पुन्हा सक्रिय होऊ पाहणारे भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहतांनी देखील इशारा दिला आहे . या शिवाय काहींनी लॉक डाऊन वाढवू नये यासाठी निवेदने दिली आहेत . 

  वास्तविक 10 जुलै रोजी पर्यंत लॉक डाऊन असताना महापौर ज्योत्स्ना हसनाळे सह पालिका पदाधिकारी व आयुक्त डॉ . विजय राठोड यांची बैठक झाली होती . त्यावेळी महापौरांसह भाजपा , शिवसेना , कोंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी लॉक डाऊन वाढवू नका अशी भूमिका घेतली होती . आयुक्तांनी देखील तयारी दर्शवली असताना ठाणे आदी अन्य महापालिकांनी लॉक डाऊन वाढवल्याने मीरा भाईंदर मध्ये देखील 18 जुलै पर्यंत लॉक डाऊन वाढवण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला.   

कोरोनाच्या संसर्गकाळात राजकारण्यांचे इशारे पाहता शहरातील कायदा सुव्यवस्था व वातावरण बिघडण्याची शक्यता आहे . मुळात लॉक डाऊन वाढवण्याचा निर्णय अजून नसताना राजकीय चमकोगिरीसाठी असे बेजबाबदारपणाचे इशारे देणे निंदनीय असल्याचे आगरी समाज ऐकताचे पदाधिकारी ऍड. सुशांत पाटील म्हणाले . 

राजकारण्यांनी इशारे देण्या ऐवजी तळागाळात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीचे दिशा निर्देश कसे काटेकोर पाळले जातील या साठी रस्त्यांवर व गल्लीबोळात उतरून काम करावे. हेच राजकारणी आमच्या इशाऱ्या मुळे लॉकडाऊन वाढवला नाही असे राजकीय श्रेय घेण्याचे डावपेच आखून आहेत असा टोला कृष्णा गुप्ता , रोहित सुवर्णा, प्रदीप जंगम, प्रदीप सामंत आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी लगावला आहे.

टॅग्स :thaneठाणेMira Bhayanderमीरा-भाईंदर