शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

CoronaVirus News: मीरा- भाईंदरमध्ये लॉकडाऊन वाढ अजून झाली नसतानाच राजकारण तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 15:57 IST

लॉकडाऊन वाढवल्यास आंदोलनाचे राजकारण्यांचे इशारे 

मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वाढवण्यात आलेल्या लॉक डाऊनची मुदत 18 जुलैला संपणार असून लॉक डाऊन वाढवण्याचा कोणताच निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला नसताना शहरातील राजकारण्यांनी मात्र आता पासूनच लॉक डाऊन वरून बोंबाबोंब करत विविध इशारे देत शहरातील वातावरण तापवण्यास सुरवात केली आहे . 

जगभरात कोरोना विषाणूने थैमान घालत सर्वांनाच हतबल करून टाकले असून मार्च पासून चालवण्यात आलेल्या लॉक डाऊन नंतर देखील कोरोना पूर्णपणे रोखणे शक्य झालेले नाही . लॉक डाऊन मुळे कोरोना पसरण्यावर काही प्रमाणात नियंत्रण आले असले तरी लॉक डाऊन आता पर्याय राहिलेला नाही . 

मुळात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क घालणे , गर्दी न करता सोशल डिस्टंसिंग ठेवणे , हात स्वच्छ धुतल्याशिवाय नाक - तोंडाला स्पर्श न करणे व कोरोना बाधित आणि संशियतांनी वेळीच  वेगळे करून उपचार घेणे हे प्रभावी उपाय आवश्यक असताना त्याचे पालन मात्र केले जात नाही . त्यामुळेच कोरोनाचे रुग्ण आणि बळी वाढत चालले आहेत असे जाणकारांचे  आहे . 

परंतु बहुतांश लोकप्रतिनिधी , राजकारणी मात्र संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्यासह निर्देशांचे होणारे उल्लंघन रोखण्यासाठी प्रभावी पावले उचलत नाहीत . त्या ऐवजी आरोप प्रत्यारोप व राजकारण करण्यासह एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्यातच धन्यता मानत आहेत. 

आमदार गीता जैन यांनी तर लॉक डाऊन पुन्हा वाढवल्यास जेलभरो आंदोलन करू असे इशारा दिला आहे . मनसे ने देखील निवेदन देऊन विरोध केला आहे . संदीप राणे यांच्या रिक्षा संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिलाय .  खाजगी संस्थेच्या माध्यमातून पुन्हा सक्रिय होऊ पाहणारे भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहतांनी देखील इशारा दिला आहे . या शिवाय काहींनी लॉक डाऊन वाढवू नये यासाठी निवेदने दिली आहेत . 

  वास्तविक 10 जुलै रोजी पर्यंत लॉक डाऊन असताना महापौर ज्योत्स्ना हसनाळे सह पालिका पदाधिकारी व आयुक्त डॉ . विजय राठोड यांची बैठक झाली होती . त्यावेळी महापौरांसह भाजपा , शिवसेना , कोंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी लॉक डाऊन वाढवू नका अशी भूमिका घेतली होती . आयुक्तांनी देखील तयारी दर्शवली असताना ठाणे आदी अन्य महापालिकांनी लॉक डाऊन वाढवल्याने मीरा भाईंदर मध्ये देखील 18 जुलै पर्यंत लॉक डाऊन वाढवण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला.   

कोरोनाच्या संसर्गकाळात राजकारण्यांचे इशारे पाहता शहरातील कायदा सुव्यवस्था व वातावरण बिघडण्याची शक्यता आहे . मुळात लॉक डाऊन वाढवण्याचा निर्णय अजून नसताना राजकीय चमकोगिरीसाठी असे बेजबाबदारपणाचे इशारे देणे निंदनीय असल्याचे आगरी समाज ऐकताचे पदाधिकारी ऍड. सुशांत पाटील म्हणाले . 

राजकारण्यांनी इशारे देण्या ऐवजी तळागाळात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीचे दिशा निर्देश कसे काटेकोर पाळले जातील या साठी रस्त्यांवर व गल्लीबोळात उतरून काम करावे. हेच राजकारणी आमच्या इशाऱ्या मुळे लॉकडाऊन वाढवला नाही असे राजकीय श्रेय घेण्याचे डावपेच आखून आहेत असा टोला कृष्णा गुप्ता , रोहित सुवर्णा, प्रदीप जंगम, प्रदीप सामंत आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी लगावला आहे.

टॅग्स :thaneठाणेMira Bhayanderमीरा-भाईंदर