शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

राजकीय प्रचारात ‘तोंडचे पाणी’ पळवणार, इच्छाशक्तीचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:54 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पाण्याचा प्रश्न हाच निवडणुकीच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा राहणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी पाण्याच्या प्रश्नावर आश्वासने देत मते मागण्याची तयारी सुरू केली आहे.

अंबरनाथ : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पाण्याचा प्रश्न हाच निवडणुकीच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा राहणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी पाण्याच्या प्रश्नावर आश्वासने देत मते मागण्याची तयारी सुरू केली आहे. दीर्घकाळ हा प्रश्न भेडसावत असूनही तो सोडवण्यासाठी आजवर राजकीय इच्छाशक्ती दाखवण्यात आलेली नाही. जिल्हा परिषदेच्या अंबरनाथमधील चारही गटात पाण्याचा प्रश्न तीव्र असून तो सोडविण्यासाठी कोणाचे आश्वासन मतदार स्वीकारणार याची उत्सुकता आहे.अंबरनाथ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या चार जागा आहेत. त्यात वांगणी, चरगांव, नेवाळी आणि वाडी हे चार गट आहेत. अंबरनाथ तालुक्याचा ग्रामीण भाग हा अंबरनाथ शहर आणि बदलापूर शहराच्या सीमेवर वसला आहे. ज्या गावातून नदी जाते त्याच गावावर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येते. उल्हास नदीच्या किनारी असलेल्या गावांवरही पाण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. वांगणी हे गाव झपाट्याने वाढत असले तरी त्याची पाणीयोजना अद्याप पूर्ण झालेली नाही. ती पूर्ण करुन घेण्याची राजकीय इच्छाशक्तीच दिसलेली नाही. या भागातील पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी जलवाहिनी टाकण्याचे काम रोखण्याचे काम काही ग्रामस्थ आणि राजकारणी करीत आहेत. आपल्या शेतातून जलवाहिनी नको म्हणून राजकीय पुढारी शेजारील शेतकºयांच्या जागेतून जलवाहिनी टाकण्याचा हट्ट करीत आहेत. या राजकीय बाळहट्टामुळे वांगणीची मंजूर पाणीपुरवठा योजना अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाही. वांगणीची ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक दरवेळी एकच मुद्दयावर लढविण्यात येते ती म्हणजे पाणी समस्या. असे असतांनाही या गावातील पाण्याचा प्रश्न जैसे थे आहे.वांगणीसोबत चरगांव या गटातही पाण्याचा प्रश्न कायम आहे. अनेक गावांची पाणीयोजना बारवी नदीवर अवलंबून आहे. मात्र या सर्व योजना जुन्या असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी नदीवर जाण्याची वेळ येते. गावाशेजारुन नदी वाहत असली तरी ग्रामस्थांना पाणी मात्र सहज मिळत नाही. हाच सर्वात मोठा अडसर, त्रास आहे. अनेक गावांची नळपाणीपुरवठा योजना कालबाह्य झाली असून ती नव्याने उभारण्यासाठी निधीची कमतरता भासते आहे. एमआयडीसीचे बारवी धरण जवळ असले, तरी या धरणाचा उपयोग अजुनही ग्रामस्थांना होत नाही. पाण्याचे स्त्रोत असतांनाही केवळ योजना रखडल्याने या भागातील ग्रामस्थांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.मलंगगड पट्ट्यातील नेवाळी हा भाग जलदगतीने विकसित होत आहे. या पट्ट्यातूनच एमआयडीसीची जलवाहिनी शिळफाटा मार्गे नवी मुंबई आणि ठाणे शहरापर्यंत गेली आहे. नेवाळी पट्टयात शासनाचा कुशिवली धरणाचा प्रस्ताव आहे. मात्र गेल्या १५ वर्षांपासून या धरणाचे कामच रखडलेले आहे. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांवर पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. पाण्याचे स्त्रोत निर्माण करण्यासाठी नैसर्गिक परिस्थिती पूरक असतानाही या भागात त्यावर काहीही काम झालेले नाही. तशी राजकीय इच्छाशक्ती दाखवलेली नाही. एमआयडीसीच्या जलवाहिनीतुनच या ग्रामस्थांना पाण्याचा पुरवठा केला जातो. भाल, वसार, द्वारली, नेवाळी, चिंचवलीसह अनेक ग्रामीण भाग केवळ एमआयडीसीवर अवलंबून आहे. त्यातच पाण्याची जी जोडणी देण्यात आली आहे ती वाढत्या गावासाठी अपुरी पडत आहे. त्यामुळे जलवाहिनीपासून लांबच्या पल्ल्यावर असलेल्या गावांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्याची नितांत गरज आहे. ती सुधारणा करण्यासाठी जो राजकीय प्रभाव पडायला हवा, तसा पडत नसल्याने ग्रामस्थांना त्याचा लाभ मिळत नाही.मलंगगडाच्या पायथ्याशी असलेले मलंगगड आणि वाडी ही गावे बारमाही पाण्यासाठी संघर्ष करित आहेत. या गावापर्यंत पाणी पोहचविण्याचे प्रभावी यंत्रणाच उभारण्यात आलेली नाही.

टॅग्स :Electionनिवडणूक