शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

राजकीय अनास्था गावठाणांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 03:28 IST

निवेदने देऊनही कार्यवाही नाही : उच्च न्यायालयात दाद मागण्याचा ग्रामस्थाचा पवित्रा

कल्याण : ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांचे झपाट्याने नागरीकरण झाले, परंतु राजकीय अनास्थेमुळे येथील गावठाणांच्या विस्ताराकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. याबाबत एमएमआरडीए हद्दीतील ग्रामीण भागातील भूमिपुत्रांनी वेळोवेळी लक्ष वेधले आहे. अंबरनाथ तालुक्यातील ब्राम्हण करवले येथील रहिवासी रामदास म्हात्रे हे चार वर्षांपासून यांसदर्भात पाठपुरावा करत आहेत. याप्रकरणी त्यांनी ३२ आमदारांना निवेदने दिली आहेत. गावठाणांच्या विस्ताराबाबत येत्या हिवाळी अधिवेशनापर्यंत निर्णय न झाल्यास नाईलाजास्तव उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करावी लागेल, असा पवित्रा म्हात्रे यांनी घेतला आहे.

ब्रिटिशकाळापासून गावठाणे अस्तित्वात आहेत. मुंबईतील सरकारी जमिनी राज्य सरकारने विविध योजनांसाठी आरक्षित ठेवल्या आहेत. मात्र त्या जागेवर परप्रांतियांनी अतिक्रमण करून झोपडपट्ट्या उभारल्या आहेत. ही अतिक्रमणे हटविण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन आणि बीएसयूपी योजना राबवण्यात आल्या. परंतु, मूळ गावठाणे आणि तेथील मूळ निवासी जैसे थे राहिल्याने त्या वस्त्यांना बकालतेचे स्वरूप आले आणि त्या योजनांचा लाभ इतरांना मिळाला. गावठाणांचे अस्तित्व अंदाजे पावणे दोनशे वर्षांपासून आहे. दर १५ वर्षांनी त्याचा विस्तार करणे हे क्रमप्राप्त आहे. भूमिपुत्रांच्या मागणीनुसार हा विस्तार केला जातो. मात्र, याबाबतची ग्रामस्थांना विस्तृत माहिती नसल्याने तसेच राजकीय मतभेदांमध्ये गावठाणांच्या विस्ताराला मुहूर्त मिळालेला नाही.

ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रात अतिक्रमणांमुळे विस्तार होणे सध्या शक्य नाही, परंतु एमएमआरडीएच्या हद्दीत असलेल्या सर्व ग्रामपंचायत क्षेत्रातील उपलब्ध असलेल्या सरकारी जमिनींवर लोकसंख्येच्या निकषानुसार या जमिनी गावठाणांचे नियोजन करून दरडोई सरकारी नियमानुसार २०० ते ६०० चौरस मीटर जमीन द्यावी, त्याचबरोबर शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, खेळाची मैदाने, समाज मंदिर, यासाठी भूखंड राखीव ठेवावेत, अशीही मागणी सातत्याने होत आहे. झोपडपट्टी विरहित शहरांसाठी सरकारच्या अनेक योजना आल्या, पण खरोखरच शहरातून झोपड्या हटल्या का?, असा सवाल म्हात्रे यांचा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गावठाण विषयासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे, परंतु राजकीय अनास्था असल्याने ठोस कार्यवाही होऊ शकलेली नाही. परिणामी मूळ निवासी वंचितच राहिला असल्याचे म्हात्रे यांचे म्हणणे आहे.एमएमआरडीएनेच घ्यावा पुढाकारच्एमएमआरडीएच्या हद्दीत गायरान आणि पडीक जमिनी येत असल्याने व त्यांच्याकडे यंत्रणा उपलब्ध असल्याकारणाने त्यांनीच विस्तारासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे, त्यासाठी राजकीय पुढाऱ्यांनी याची दखल घेणे गरजेचे आहे.च्मात्र, तसे होत नसल्याकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे. दरम्यान, यासंदर्भात उल्हासनगर प्रांत अधिकारी जगतसिंग जिराशे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाMuncipal Corporationनगर पालिका