शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
4
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
5
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
6
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
7
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
8
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
9
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
10
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
11
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
12
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
13
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
14
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
15
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
16
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
17
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
18
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
19
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
20
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश

पोलिसांच्या वाहनांनीच चक्क अडवला रस्ता, कायद्याच्या रक्षकांकडूनच नियमांचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 01:13 IST

अंबरनाथमधील कल्याण-बदलापूर रस्त्यावरील वाहतूककोंडी हा सर्वांसाठी त्रासदायक प्रकार ठरत आहे.

- पंकज पाटीलअंबरनाथ : अंबरनाथमधील कल्याण-बदलापूर रस्त्यावरील वाहतूककोंडी हा सर्वांसाठी त्रासदायक प्रकार ठरत आहे. सर्वाधिक कोंडी ही पोलीस स्टेशन चौकातच होते. ज्या चौकात ही कोंडी होते, त्या ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूला पोलिसांचीच वाहने बेकायदा उभी केली जातात. या वाहनांमुळेच या ठिकाणी रस्ता अरुंद झाला आहे. या अरुंद रस्त्यामुळेच मोठी कोंडी या भागात होते. मात्र, ही कोंडी सोडवण्यासाठी स्थानिक पोलीस मात्र आपली वाहने हलवत नाही, हीच मोठी अडचण झाली आहे.अंबरनाथ पोलीस ठाणे हे कल्याण-बदलापूर रस्त्यावरच आहे. या पोलीस ठाण्याच्या बाहेर रस्त्याच्या चौथ्या लेनवर पोलिसांची वाहने चुकीच्या पद्धतीने उभी केली जातात. पोलीस स्टेशन चौकात सर्वाधिक वाहतूककोंडी होत असतानाही ही कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांना कसरत करावी लागते. या पोलीस स्टेशनसमोरच असलेल्या रस्त्यावर खड्डेही असल्याने त्या ठिकाणी वाहतूक धीम्या गतीने जाते. गेल्या काही दिवसांत या भागातील रस्ते दुरुस्त करण्यात आलेले असले, तरी अजूनही बेकायदा पार्किंग आणि रस्त्याच्या आड करण्यात आलेले पार्किंग यावर नियंत्रण मिळवता आलेले नाही. वाहतूककोंडीला अडथळा होत असतानाही वाहतूक पोलीस या रस्त्यावरील वाहनांवर कारवाई करत नाही.कायद्यावर बोट ठेवून नागरिकांकडून दंड वसूल करणाऱ्या पोलिसांची शिस्त त्यांच्याच कार्यालयाबाहेर दिसते. पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची वाहनेही पोलीस स्टेशनच्या बाहेरील रस्त्यावर उभी करतात. पोलीस स्टेशनच्या मागच्या बाजूला जागा असतानाही सर्व वाहने ही थेट रस्त्याच्या आड उभी करण्यात येतात. दिवसरात्र या गाड्या तेथेच उभ्या राहत असल्याने या ठिकाणी वाहतुकीचा रस्ता हा अरुंद झाला आहे. कल्याण-बदलापूर रस्त्याचे तीनपदरी काम झाले असून चौथ्या मार्गाचे काम अर्धवट अवस्थेत आहे. मात्र, या मार्गावरून कोंडीच्यावेळी वाहने सोडणे सोयीचे होते. असे असतानाही याच मार्गावर पोलिसांची वाहने उभी केली जातात. कायमस्वरूपी ही वाहने त्या ठिकाणी राहत असल्याने वाहतूककोंडीचा त्रास वाढत आहे. अपघातग्रस्त वाहने आणि जप्त केलेली वाहनेही येथे ठेवतात.गॅरेज व्यावसायिकांमुळेही अडथळा येत आहेवाहतूककोंडीला जबाबदार असणारे दुसरे कारण म्हणजे रस्त्यावर असलेले गॅरेज व्यावसायिक. अंबरनाथ पोलीस ठाण्यासमोरच असलेल्या गॅरेज व्यावसायिकांची सर्व वाहने ही रस्त्यावर उभी राहत असतात. त्यामुळे वाहतुकीला मार्ग अपुरा पडतो. हीच अवस्था दुकानदारांनीही केली आहे. कल्याण-बदलापूर रस्त्यावरील काही दुकानदारांनी आपले शोरूम दुकानाबाहेरच थाटले आहे. त्यानंतर, त्याच दुकानांच्या समोर खाजगी पार्किंग केले आहे. त्यामुळे त्याचाही त्रास वाहतूकव्यवस्था सुरळीत करण्यात येतो.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीPoliceपोलिस