शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या वाहनांनीच चक्क अडवला रस्ता, कायद्याच्या रक्षकांकडूनच नियमांचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 01:13 IST

अंबरनाथमधील कल्याण-बदलापूर रस्त्यावरील वाहतूककोंडी हा सर्वांसाठी त्रासदायक प्रकार ठरत आहे.

- पंकज पाटीलअंबरनाथ : अंबरनाथमधील कल्याण-बदलापूर रस्त्यावरील वाहतूककोंडी हा सर्वांसाठी त्रासदायक प्रकार ठरत आहे. सर्वाधिक कोंडी ही पोलीस स्टेशन चौकातच होते. ज्या चौकात ही कोंडी होते, त्या ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूला पोलिसांचीच वाहने बेकायदा उभी केली जातात. या वाहनांमुळेच या ठिकाणी रस्ता अरुंद झाला आहे. या अरुंद रस्त्यामुळेच मोठी कोंडी या भागात होते. मात्र, ही कोंडी सोडवण्यासाठी स्थानिक पोलीस मात्र आपली वाहने हलवत नाही, हीच मोठी अडचण झाली आहे.अंबरनाथ पोलीस ठाणे हे कल्याण-बदलापूर रस्त्यावरच आहे. या पोलीस ठाण्याच्या बाहेर रस्त्याच्या चौथ्या लेनवर पोलिसांची वाहने चुकीच्या पद्धतीने उभी केली जातात. पोलीस स्टेशन चौकात सर्वाधिक वाहतूककोंडी होत असतानाही ही कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांना कसरत करावी लागते. या पोलीस स्टेशनसमोरच असलेल्या रस्त्यावर खड्डेही असल्याने त्या ठिकाणी वाहतूक धीम्या गतीने जाते. गेल्या काही दिवसांत या भागातील रस्ते दुरुस्त करण्यात आलेले असले, तरी अजूनही बेकायदा पार्किंग आणि रस्त्याच्या आड करण्यात आलेले पार्किंग यावर नियंत्रण मिळवता आलेले नाही. वाहतूककोंडीला अडथळा होत असतानाही वाहतूक पोलीस या रस्त्यावरील वाहनांवर कारवाई करत नाही.कायद्यावर बोट ठेवून नागरिकांकडून दंड वसूल करणाऱ्या पोलिसांची शिस्त त्यांच्याच कार्यालयाबाहेर दिसते. पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची वाहनेही पोलीस स्टेशनच्या बाहेरील रस्त्यावर उभी करतात. पोलीस स्टेशनच्या मागच्या बाजूला जागा असतानाही सर्व वाहने ही थेट रस्त्याच्या आड उभी करण्यात येतात. दिवसरात्र या गाड्या तेथेच उभ्या राहत असल्याने या ठिकाणी वाहतुकीचा रस्ता हा अरुंद झाला आहे. कल्याण-बदलापूर रस्त्याचे तीनपदरी काम झाले असून चौथ्या मार्गाचे काम अर्धवट अवस्थेत आहे. मात्र, या मार्गावरून कोंडीच्यावेळी वाहने सोडणे सोयीचे होते. असे असतानाही याच मार्गावर पोलिसांची वाहने उभी केली जातात. कायमस्वरूपी ही वाहने त्या ठिकाणी राहत असल्याने वाहतूककोंडीचा त्रास वाढत आहे. अपघातग्रस्त वाहने आणि जप्त केलेली वाहनेही येथे ठेवतात.गॅरेज व्यावसायिकांमुळेही अडथळा येत आहेवाहतूककोंडीला जबाबदार असणारे दुसरे कारण म्हणजे रस्त्यावर असलेले गॅरेज व्यावसायिक. अंबरनाथ पोलीस ठाण्यासमोरच असलेल्या गॅरेज व्यावसायिकांची सर्व वाहने ही रस्त्यावर उभी राहत असतात. त्यामुळे वाहतुकीला मार्ग अपुरा पडतो. हीच अवस्था दुकानदारांनीही केली आहे. कल्याण-बदलापूर रस्त्यावरील काही दुकानदारांनी आपले शोरूम दुकानाबाहेरच थाटले आहे. त्यानंतर, त्याच दुकानांच्या समोर खाजगी पार्किंग केले आहे. त्यामुळे त्याचाही त्रास वाहतूकव्यवस्था सुरळीत करण्यात येतो.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीPoliceपोलिस