शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

By admin | Updated: April 10, 2017 05:53 IST

ठाणे पालिसांनी प्रतिष्ठेच्या बनवलेल्या सोनसाखळी चोरी प्रकरणात आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसाला

कल्याण : ठाणे पालिसांनी प्रतिष्ठेच्या बनवलेल्या सोनसाखळी चोरी प्रकरणात आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसाला आंबिवलीत जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. इराणी वस्तीत ही घटना घडली. तेथे यापूर्वीही पोलिसांवर हल्ले झाले आहेत. तरीही पोलीस पुरेशा फौजफाट्यासह आणि महिला हल्ले करत असूनही पुरेसे महिला कर्मचारी न घेता गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. इराणी वस्तीतील महिलांनी मात्र पोलिसांचा दावा पेटाळून लावला असून पोलिसावर नव्हे, तर स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून घेतल्याचे म्हटले आहे. तसेच जी व्यक्ती गेले पाच महिने आजारपणामुळे अंथरूणात आहे, ती सोनसाखळ््या कशी चोरू शकते, असा प्रश्न त्याची आई ममिया हिने केला.पोलिसावर रॉकेल टाकल्याचा आरोप असलेली महिला आरोपीची भाची आहे, तर या घटनेतून बचावलेल्या पोलिसाचे नाव दाजी गायकवाड असे आहे. या घटनेमुळे पोलिसांवर कारवाई न करताच परतण्याची वेळ आली. या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यात आरोपी समीर इराणीची अल्पवयीन भाची मुख्य आरोपी असून अन्य महिलांची नावेही त्यात आहेत. पोलिसावर प्राणघातक हल्ला करणे आणि सरकारी कामात अडथळा आणणे या कलमाखाली गुन्हे दाखल आहे. उल्हासनगर पोलीस उपायुक्तांच्या आदेशानुसार सोनसाखळी चोरीप्रकरणी आरोपी समीर इराणीला शोधण्यासाठी २० पोलिसांचा ताफा शुक्रवारी इराणी वस्तीत शिरला. तो या वस्तीत लपून बसल्याची माहिती पोलिसांकडे होती. त्यांनी वस्तीवर छापा टाकताच महिलांनी प्रचंड विरोध केला. आरोपीच्या अल्पवयीन भाचीने कारवाईला विरोध करत इराणी महिला गोळा केल्या. त्यांनी पोलिसांशी झटापट सुरु केली. काही महिलांनी पोलिसांना मारहाण केली. त्यांना ओरबाडण्यास सुरुवात केली. त्याला पोलिस प्रतिकार करीत होते. पण हल्ला चढविणाऱ्या महिला असल्याने पुरुष पोलिसांना हवा तसा प्रतिकार करता येत नव्हता. या झटापटीत आरोपीच्या भाचीने २० लीटर रॉकेलचा कॅन आणला आणि तो गायकवाड या पोलिसाच्या अंगावर ओतून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तेव्हा पोलिसांनी जोरदार प्रतिकार केल्याने गायकवाड यांचा जीव वाचल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मात्र आरोपीला न पकडता पोलिसांना हात हलवत परतावे लागले. समीरच्या अल्पवयीन भाचीने रॉकेल ओतल्याचा आरोप फेटाळला. पोलिसांच्या कारवाईच्या निषेधार्थ भाचीने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून घेतले होते. पोलिसांच्या अंगावर रॉकेल टाकलेच नाही. पोलिसांनी तसा कांगावा केल्याचे ममिया यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)वस्तीबद्दल आधीही तक्रारीइराणी वस्तीत यापूर्वीही पोलिसांवर दगडफेक झाली आहे. कारवाईदरम्यान दोन पोलिसांच्या हाताला महिलांनी चावा घेतल्याने त्यांना याआधीही कारवाई सोडून पळ काढावा लागला होता. या वस्तीमुळे आंबिवली परिसरातील जनजीवन असुरक्षित असल्याचे सांगत ही वस्ती हलविण्याची मागणी २०१२ मध्ये सेनेच्या स्थानिक नगरसेवकांनी केली होती. गृह खात्याकडेही अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी दास नावाच्या रेल्वे प्रवाशावर याच वस्तीजवळ चालत्या गाडीत हल्ला झाला होता. त्यात तो चालत्या गाडीतून पडून जखमी झाला होता.