शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

पोलिसाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

By admin | Updated: April 10, 2017 05:53 IST

ठाणे पालिसांनी प्रतिष्ठेच्या बनवलेल्या सोनसाखळी चोरी प्रकरणात आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसाला

कल्याण : ठाणे पालिसांनी प्रतिष्ठेच्या बनवलेल्या सोनसाखळी चोरी प्रकरणात आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसाला आंबिवलीत जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. इराणी वस्तीत ही घटना घडली. तेथे यापूर्वीही पोलिसांवर हल्ले झाले आहेत. तरीही पोलीस पुरेशा फौजफाट्यासह आणि महिला हल्ले करत असूनही पुरेसे महिला कर्मचारी न घेता गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. इराणी वस्तीतील महिलांनी मात्र पोलिसांचा दावा पेटाळून लावला असून पोलिसावर नव्हे, तर स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून घेतल्याचे म्हटले आहे. तसेच जी व्यक्ती गेले पाच महिने आजारपणामुळे अंथरूणात आहे, ती सोनसाखळ््या कशी चोरू शकते, असा प्रश्न त्याची आई ममिया हिने केला.पोलिसावर रॉकेल टाकल्याचा आरोप असलेली महिला आरोपीची भाची आहे, तर या घटनेतून बचावलेल्या पोलिसाचे नाव दाजी गायकवाड असे आहे. या घटनेमुळे पोलिसांवर कारवाई न करताच परतण्याची वेळ आली. या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यात आरोपी समीर इराणीची अल्पवयीन भाची मुख्य आरोपी असून अन्य महिलांची नावेही त्यात आहेत. पोलिसावर प्राणघातक हल्ला करणे आणि सरकारी कामात अडथळा आणणे या कलमाखाली गुन्हे दाखल आहे. उल्हासनगर पोलीस उपायुक्तांच्या आदेशानुसार सोनसाखळी चोरीप्रकरणी आरोपी समीर इराणीला शोधण्यासाठी २० पोलिसांचा ताफा शुक्रवारी इराणी वस्तीत शिरला. तो या वस्तीत लपून बसल्याची माहिती पोलिसांकडे होती. त्यांनी वस्तीवर छापा टाकताच महिलांनी प्रचंड विरोध केला. आरोपीच्या अल्पवयीन भाचीने कारवाईला विरोध करत इराणी महिला गोळा केल्या. त्यांनी पोलिसांशी झटापट सुरु केली. काही महिलांनी पोलिसांना मारहाण केली. त्यांना ओरबाडण्यास सुरुवात केली. त्याला पोलिस प्रतिकार करीत होते. पण हल्ला चढविणाऱ्या महिला असल्याने पुरुष पोलिसांना हवा तसा प्रतिकार करता येत नव्हता. या झटापटीत आरोपीच्या भाचीने २० लीटर रॉकेलचा कॅन आणला आणि तो गायकवाड या पोलिसाच्या अंगावर ओतून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तेव्हा पोलिसांनी जोरदार प्रतिकार केल्याने गायकवाड यांचा जीव वाचल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मात्र आरोपीला न पकडता पोलिसांना हात हलवत परतावे लागले. समीरच्या अल्पवयीन भाचीने रॉकेल ओतल्याचा आरोप फेटाळला. पोलिसांच्या कारवाईच्या निषेधार्थ भाचीने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून घेतले होते. पोलिसांच्या अंगावर रॉकेल टाकलेच नाही. पोलिसांनी तसा कांगावा केल्याचे ममिया यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)वस्तीबद्दल आधीही तक्रारीइराणी वस्तीत यापूर्वीही पोलिसांवर दगडफेक झाली आहे. कारवाईदरम्यान दोन पोलिसांच्या हाताला महिलांनी चावा घेतल्याने त्यांना याआधीही कारवाई सोडून पळ काढावा लागला होता. या वस्तीमुळे आंबिवली परिसरातील जनजीवन असुरक्षित असल्याचे सांगत ही वस्ती हलविण्याची मागणी २०१२ मध्ये सेनेच्या स्थानिक नगरसेवकांनी केली होती. गृह खात्याकडेही अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी दास नावाच्या रेल्वे प्रवाशावर याच वस्तीजवळ चालत्या गाडीत हल्ला झाला होता. त्यात तो चालत्या गाडीतून पडून जखमी झाला होता.