शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

आठ पोलिसांच्या हत्याकांडातील विकास दुबेच्या साथीदारांना पोलिसांनी नेले अखेर हवाई प्रवासाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 01:51 IST

कुख्यात गँगस्टर विकास दुबे याच्या दोन्ही साथीदारांना उत्तरप्रदेश पोलिसांनी अखेर हवाई प्रवासाने लखनौ आणि तिथून वाहनाने कानपूरला मंगळवारी नेले. मुंबई दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अरविंद उर्फ गुड्डन त्रिवेदी आणि त्याचा चालक सोनू त्रिवेदी या दोघांनाही ठाण्यातून अटक केली होती. दोघांच्याही जीवाला धोका असल्यामुळे पोलिसांनी त्यांना हवाईमार्गे नेण्याची मागणी आरोपीच्या वकिलांनी ठाणे न्यायालयात केली होती.

ठळक मुद्देभाजीच्या ट्रकने झाले होते पळूनएन्काऊंटरची व्यक्त केली होती भीती

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे: एन्काऊंटर आणि अपघाताची भीती व्यक्त केल्याने हवाई प्रवासाची मागणी केलेल्या कुख्यात गँगस्टर विकास दुबे याच्या दोन्ही साथीदारांना उत्तरप्रदेश पोलिसांनी अखेर हवाई प्रवासाने लखनौ आणि तिथून वाहनाने कानपूरला मंगळवारी नेले.मुंबई दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अरविंद उर्फ गुड्डन त्रिवेदी आणि त्याचा चालक सोनू त्रिवेदी या दोघांनाही ठाण्यातून अटक केली होती. त्यानंतर त्यांची ट्रान्झिस्ट रिमांड मिळवून दोघांनाही कानपूरला नेल्याची माहिती मुंबई एटीएसने ‘लोकमत’ला दिली.दोघांच्याही जीवाला धोका असल्यामुळे पोलिसांनी त्यांना हवाईमार्गे नेण्याची मागणी आरोपीच्या वकिलांनी ठाणे न्यायालयात केली होती.विकास दुबे उत्तरप्रदेश पोलिसांबरोबर चकमकीत ठार झाल्यानंतर त्याचे अरविंद आणि सोनू हे दोन साथीदार एन्काऊंटर होण्याच्या भीतीने ठाण्यात पळून आले होते. अरविंद हा विकासचा खास हस्तक मानला जातो. त्याचा चौबेपूर पोलीस ठाण्याच्या आठ पोलिसांच्या हत्याकांडात थेट संबंध असल्याची माहिती सोमवारीच उत्तरप्रदेशच्या (यूपी) पोलिसांनी ठाणे न्यायालयाला दिली. यापूर्वीही त्याच्यावर यूपीमध्ये खूनासारख्या अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. पोलिसांच्या हत्याकांडानंतर फरार झाल्यानंतर अरविंदची माहिती देणाऱ्यावर तसेच त्याला पकडण्यासाठी युपी पोलिसांनी ५० हजारांचे बक्षिसही जाहीर केले होते, अशी माहिती एटीएसचे पोलीस निरिक्षक दया नायक यांनी दिली. अरविंद हा आपला वाहन चालक सोनू त्रिवेदीसह ठाण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला नायक यांच्या पथकाने शनिवारी अटक केली. या दोघांनाही २१ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे त्यांची रवानगी नवी मुंबईतील तळोजा कारागृहात करण्यात आली होती. दरम्यान, या दोघांनाही घेण्यासाठी आलेल्या कानपूर (यूपी) पोलिसांकडे सक्षम व्यवस्था नसल्याचे तसेच अपघातासह एन्काऊंटरची भीतीही त्यांनी ठाणे न्यायालयात व्यक्त केली होती. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही धोका न पत्करता त्यांना हवाईमार्गे घेऊन जाण्याची मागणी आरोपीचे वकील अनिल जाधव यांनी ठाणे न्यायालयाकडे केली होती. आरोपींची ही मागणी मान्य झाल्यामुळे तसेच त्यांना विमानाने नेण्याची तयारी यूपी पोलिसांनी दर्शविल्यामुळे तशी अनुमती सोमवारीच न्यायालयाने दिली. दरम्यान, या दोघांचाही कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे तळोजा कारागृहातून त्यांना मंगळवारी सकाळी बाहेर काढल्यानंतर १४ जुलै रोजी दुपारी १.५५ वा. च्या एका खासगी एअरलाईन्सने त्यांना मुंबईतून लखनौ येथे नेल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.असा झाला प्रवास...कानपूरच्या बकारु गावात ३ जुलै रोजी चौबेपूर पोलीस ठाण्याच्या आठ पोलिसांच्या हत्याकांडानंतर विकास दुबेसह त्याचे साथीदारही पसार झाले होते. अटकेच्या भीतीने अरविंद आणि सोनू हे दोघांनी पलायन केले होते. ते ४ जुलै रोजी पहाटे महाराष्ट्राच्या सीमेवरील दतिया या गावात मित्राच्या घरी थांबले. तिथेच त्यांना विकास दुबेच्या अटकेची माहिती मिळाल्यानंतर तिथून एका टूरिस्ट टॅक्सीने दोघेही दातिया गावातून ५० ते ६० किमीपर्यंत ५ जुलै रोजी आले. नंतर नाशिकमार्गे ते पुण्यात आले. पुण्यातच मुक्काम करुन त्यांनी दुस-या दिवशी एका भाजीच्या टेम्पोने ६ जुलै रोजी ठाणे गाठल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक