शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

आठ पोलिसांच्या हत्याकांडातील विकास दुबेच्या साथीदारांना पोलिसांनी नेले अखेर हवाई प्रवासाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 01:51 IST

कुख्यात गँगस्टर विकास दुबे याच्या दोन्ही साथीदारांना उत्तरप्रदेश पोलिसांनी अखेर हवाई प्रवासाने लखनौ आणि तिथून वाहनाने कानपूरला मंगळवारी नेले. मुंबई दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अरविंद उर्फ गुड्डन त्रिवेदी आणि त्याचा चालक सोनू त्रिवेदी या दोघांनाही ठाण्यातून अटक केली होती. दोघांच्याही जीवाला धोका असल्यामुळे पोलिसांनी त्यांना हवाईमार्गे नेण्याची मागणी आरोपीच्या वकिलांनी ठाणे न्यायालयात केली होती.

ठळक मुद्देभाजीच्या ट्रकने झाले होते पळूनएन्काऊंटरची व्यक्त केली होती भीती

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे: एन्काऊंटर आणि अपघाताची भीती व्यक्त केल्याने हवाई प्रवासाची मागणी केलेल्या कुख्यात गँगस्टर विकास दुबे याच्या दोन्ही साथीदारांना उत्तरप्रदेश पोलिसांनी अखेर हवाई प्रवासाने लखनौ आणि तिथून वाहनाने कानपूरला मंगळवारी नेले.मुंबई दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अरविंद उर्फ गुड्डन त्रिवेदी आणि त्याचा चालक सोनू त्रिवेदी या दोघांनाही ठाण्यातून अटक केली होती. त्यानंतर त्यांची ट्रान्झिस्ट रिमांड मिळवून दोघांनाही कानपूरला नेल्याची माहिती मुंबई एटीएसने ‘लोकमत’ला दिली.दोघांच्याही जीवाला धोका असल्यामुळे पोलिसांनी त्यांना हवाईमार्गे नेण्याची मागणी आरोपीच्या वकिलांनी ठाणे न्यायालयात केली होती.विकास दुबे उत्तरप्रदेश पोलिसांबरोबर चकमकीत ठार झाल्यानंतर त्याचे अरविंद आणि सोनू हे दोन साथीदार एन्काऊंटर होण्याच्या भीतीने ठाण्यात पळून आले होते. अरविंद हा विकासचा खास हस्तक मानला जातो. त्याचा चौबेपूर पोलीस ठाण्याच्या आठ पोलिसांच्या हत्याकांडात थेट संबंध असल्याची माहिती सोमवारीच उत्तरप्रदेशच्या (यूपी) पोलिसांनी ठाणे न्यायालयाला दिली. यापूर्वीही त्याच्यावर यूपीमध्ये खूनासारख्या अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. पोलिसांच्या हत्याकांडानंतर फरार झाल्यानंतर अरविंदची माहिती देणाऱ्यावर तसेच त्याला पकडण्यासाठी युपी पोलिसांनी ५० हजारांचे बक्षिसही जाहीर केले होते, अशी माहिती एटीएसचे पोलीस निरिक्षक दया नायक यांनी दिली. अरविंद हा आपला वाहन चालक सोनू त्रिवेदीसह ठाण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला नायक यांच्या पथकाने शनिवारी अटक केली. या दोघांनाही २१ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे त्यांची रवानगी नवी मुंबईतील तळोजा कारागृहात करण्यात आली होती. दरम्यान, या दोघांनाही घेण्यासाठी आलेल्या कानपूर (यूपी) पोलिसांकडे सक्षम व्यवस्था नसल्याचे तसेच अपघातासह एन्काऊंटरची भीतीही त्यांनी ठाणे न्यायालयात व्यक्त केली होती. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही धोका न पत्करता त्यांना हवाईमार्गे घेऊन जाण्याची मागणी आरोपीचे वकील अनिल जाधव यांनी ठाणे न्यायालयाकडे केली होती. आरोपींची ही मागणी मान्य झाल्यामुळे तसेच त्यांना विमानाने नेण्याची तयारी यूपी पोलिसांनी दर्शविल्यामुळे तशी अनुमती सोमवारीच न्यायालयाने दिली. दरम्यान, या दोघांचाही कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे तळोजा कारागृहातून त्यांना मंगळवारी सकाळी बाहेर काढल्यानंतर १४ जुलै रोजी दुपारी १.५५ वा. च्या एका खासगी एअरलाईन्सने त्यांना मुंबईतून लखनौ येथे नेल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.असा झाला प्रवास...कानपूरच्या बकारु गावात ३ जुलै रोजी चौबेपूर पोलीस ठाण्याच्या आठ पोलिसांच्या हत्याकांडानंतर विकास दुबेसह त्याचे साथीदारही पसार झाले होते. अटकेच्या भीतीने अरविंद आणि सोनू हे दोघांनी पलायन केले होते. ते ४ जुलै रोजी पहाटे महाराष्ट्राच्या सीमेवरील दतिया या गावात मित्राच्या घरी थांबले. तिथेच त्यांना विकास दुबेच्या अटकेची माहिती मिळाल्यानंतर तिथून एका टूरिस्ट टॅक्सीने दोघेही दातिया गावातून ५० ते ६० किमीपर्यंत ५ जुलै रोजी आले. नंतर नाशिकमार्गे ते पुण्यात आले. पुण्यातच मुक्काम करुन त्यांनी दुस-या दिवशी एका भाजीच्या टेम्पोने ६ जुलै रोजी ठाणे गाठल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक