शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

पोलीस अधिकाऱ्याच्या खुनाची २७ वर्षांनी उकल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 00:07 IST

ठाणे पोलिसांनी लावला छडा : आरोपीचा मात्र सात वर्षांपूर्वीच मृत्यू झाल्याचे उघड

ठाणे : पोलीस उपनिरीक्षक महेंद्रसिंग पाटील यांच्या खून प्रकरणाचा तब्बल २७ वर्षांनी उलगडा झाला. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने पाच महिने तपास करून आरोपी इबरार नन्हे खान याच्या पत्नीचे दिल्ली येथील घर गाठले. पण, २०१२ मध्येच त्याचा मृत्यू झाल्याची बाब समोर आल्यानंतर पोलीस हताश झाले.

पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांनी शोध घेऊनही तो मिळाला नव्हता. पाटील यांचे वडील पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना भेटले. त्यांनी मुलाचा मारेकरी खानच्या अटकेची मागणी जून २०१९ मध्ये केली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी हा तपास सुरू केला. अथक प्रयत्नांनी तिचे घरही शोधले. सखोल चौकशीत २०१२ मध्येच एका आजाराने इबरारचा मृत्यू झाल्याची माहिती ठाकरे यांच्यासह पोलीस हवालदार आनंदा भिलारे, विक्रांत कांबळे, राहुल पवार, रवींद्र पाटील आणि तौशिफ पठाण आदींच्या तपासात समोर आली. कठोर परिश्रम घेत आरोपीचा पाठपुरावा केला. मात्र, पोलीस पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याने ही फाइल आता कायमचीच बंद करावी लागणार असल्याचे शल्य तपास पथकातील अधिकाऱ्यांनी बोलून दाखवले. इबरारला १९९३ मध्ये मुंबईतील गोरेगाव पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी त्याने खरे नाव लपवून सलीम खान अशी ओळख सांगितली होती. त्यावेळी तो जामिनावर सुटला होता, अशीही माहिती सूत्रांनी दिली.आरोपीला पकडताना झाली होती हत्या : उपनिरीक्षक महेंद्रसिंग यांची कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात नेमणूक होती. इबरार हा फरारी आरोपी शहाड पुलाखाली येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर २३ जुलै १९९२ रोजी रात्री आपल्या पथकासह पाटील त्याला पकडण्यासाठी गेले होते. रिक्षाने जातानाच त्यांना तो दिसला. तेव्हा मोठ्या धाडसाने त्यांनी त्याचा पाठलागही केला. मात्र, पुलाच्या खांबाआड लपलेल्या खानने पाटील यांच्यावर चॉपरने नऊ वार केले. यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी इबरार खान याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. अंबरनाथमध्ये खानची त्यावेळी दहशत होती.