शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

पोलीस अधिकाऱ्याच्या खुनाची २७ वर्षांनी उकल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 00:07 IST

ठाणे पोलिसांनी लावला छडा : आरोपीचा मात्र सात वर्षांपूर्वीच मृत्यू झाल्याचे उघड

ठाणे : पोलीस उपनिरीक्षक महेंद्रसिंग पाटील यांच्या खून प्रकरणाचा तब्बल २७ वर्षांनी उलगडा झाला. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने पाच महिने तपास करून आरोपी इबरार नन्हे खान याच्या पत्नीचे दिल्ली येथील घर गाठले. पण, २०१२ मध्येच त्याचा मृत्यू झाल्याची बाब समोर आल्यानंतर पोलीस हताश झाले.

पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांनी शोध घेऊनही तो मिळाला नव्हता. पाटील यांचे वडील पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना भेटले. त्यांनी मुलाचा मारेकरी खानच्या अटकेची मागणी जून २०१९ मध्ये केली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी हा तपास सुरू केला. अथक प्रयत्नांनी तिचे घरही शोधले. सखोल चौकशीत २०१२ मध्येच एका आजाराने इबरारचा मृत्यू झाल्याची माहिती ठाकरे यांच्यासह पोलीस हवालदार आनंदा भिलारे, विक्रांत कांबळे, राहुल पवार, रवींद्र पाटील आणि तौशिफ पठाण आदींच्या तपासात समोर आली. कठोर परिश्रम घेत आरोपीचा पाठपुरावा केला. मात्र, पोलीस पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याने ही फाइल आता कायमचीच बंद करावी लागणार असल्याचे शल्य तपास पथकातील अधिकाऱ्यांनी बोलून दाखवले. इबरारला १९९३ मध्ये मुंबईतील गोरेगाव पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी त्याने खरे नाव लपवून सलीम खान अशी ओळख सांगितली होती. त्यावेळी तो जामिनावर सुटला होता, अशीही माहिती सूत्रांनी दिली.आरोपीला पकडताना झाली होती हत्या : उपनिरीक्षक महेंद्रसिंग यांची कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात नेमणूक होती. इबरार हा फरारी आरोपी शहाड पुलाखाली येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर २३ जुलै १९९२ रोजी रात्री आपल्या पथकासह पाटील त्याला पकडण्यासाठी गेले होते. रिक्षाने जातानाच त्यांना तो दिसला. तेव्हा मोठ्या धाडसाने त्यांनी त्याचा पाठलागही केला. मात्र, पुलाच्या खांबाआड लपलेल्या खानने पाटील यांच्यावर चॉपरने नऊ वार केले. यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी इबरार खान याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. अंबरनाथमध्ये खानची त्यावेळी दहशत होती.