शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पाच जिल्ह्यांतून तडीपार केलेल्या गुंडाला ठाणे पोलिसांनी केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 23:27 IST

ठाणे जिल्हा, मुंबई, मुंबई उपनगरे, रायगड आणि पालघर या पाच जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेल्या संदीप राजनाथ उपाध्याय ऊर्फ छोटू (२१) या गुंडाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने नुकतीच अटक केली आहे.

ठळक मुद्देउल्हासनगर येथून घेतले ताब्यात खंडणीविरोधी पथकाची कारवाईपोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले होते आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : उल्हासनगर येथून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेल्या संदीप राजनाथ उपाध्याय ऊर्फ छोटू (२१, रा. कमला नेहरूनगर, उल्हासनगर) या गुंडाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने नुकतीच अटक केली आहे. त्याच्यावर उल्हासनगर क्रमांक एक पोलीस ठाण्यात महाराष्टÑ पोलीस कायदा कलम १४२ नुसार कारवाई केली आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातून फरारी तसेच तडीपार झालेल्या गुंडांवर कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर खंडणीविरोधी पथक उल्हासनगर भागात गुन्हेगार वॉच पेट्रोलिंग करीत असताना ठाणे जिल्ह्यातून हद्दपार केलेला संदीप उपाध्याय हा गुंड उल्हासनगर क्रमांक एक येथील कमला नेहरूनगरातील शिवसेना कार्यालयाजवळ फिरत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांना मिळाली होती. त्याआधारे या पथकाने ३० सप्टेंबर रोजी त्याला या भागातून ताब्यात घेतले. त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्यामुळे त्याला १९ नोव्हेंबर २०१८ रोजी उल्हासनगरचे तत्कालीन पोलीस उपायुक्त यांनी ठाणे जिल्हा, मुंबई, मुंबई उपनगरे, रायगड आणि पालघर या पाच जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. त्याला तडीपार केलेले असतानाही तो याच भागात बिनधास्तपणे बेकायदेशीरपणे वास्तव्य करीत होता. तो ठाणे जिल्ह्यात विनापरवानगी आल्याची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाने त्याला अटक केली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक