शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भाईंदरमध्ये आठ किलो सोन्याची चोरी करणा-याला पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 20:44 IST

अंबरनाथ येथील सागर ज्वेलर्सच्या दुकानातील मागचे दार तोडून चोरट्याने भर दिवसा 8.5 किलो सोने चोरले होते. या चोरट्याचा चेहरा सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाले होता.

अंबरनाथ : अंबरनाथ येथील सागर ज्वेलर्सच्या दुकानातील मागचे दार तोडून चोरट्याने भर दिवसा 8.5 किलो सोने चोरले होते. या चोरट्याचा चेहरा सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाले होता. या प्रकरणात चोरटय़ाचा तपास करीत उल्हासनगर पोलीस उपायुक्तांच्या पथकाने या चोरट्याला मुद्देमालासह भाईंदरमध्ये अटक केली आहे. चोरीला गेलेल्या सोन्यापैकी 85 टक्के सोने देखील पोलिसांनी हस्तगत केल्याचे समोर येत आहे.अंबरनाथच्या सागर ज्वेलर्स या दुकानात 8 ऑक्टोंबर रोजी दुपारी चोरी झाली होती. या दुकानातुन 8.5 किलो सोने चोरण्यात आले होते. या प्रकारानंतर पोलिसांनी चोरट्याला अटक करण्यासाठी पथक तयार केले होते. या पथकापैकी पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांच्या पथकाने सीसीटीव्हीच्या आधारावर चोरट्याचा इतिहास तपासला असता विनोद सिंग या सराईत गुन्हेगाराचा चेहरा या आरोपीबरोबर जुळत होता. अखेर या आरोपीचा शोध घेतला असता तो भाईंदरमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपायुक्त यांच्या पथकाने भाईंदरमधुन विनोद सिंग याला अटक केली आहे. या आधी विनोद सिंग याला 2006 मध्ये अटक करण्यात आलेली होती. हा चोरटा मध्यप्रदेशातील आझमगडचा रहिवासी असून हाय प्रोफाईल गुन्हेगारांमध्ये त्याचा समावेश आहे. एवढेच नव्हे तर तो एका राज्यातून दुस-या राज्यात सतत विमानाने प्रवास करतो. आरोपीला अटक केल्यावर त्याच्याकडून चोरलेल्या सोन्यापैकी 85 टक्के सोने हस्तगत करण्यात आले आहे. विनोद याच्या सोबत त्याचे इतर तीन ते चार साथीदार देखील या प्रकणात असून पोलीस त्यांना देखील अटक करण्याचा प्रयत्न करित आहेत. अवघ्या 5 दिवसात येवढय़ा मोठय़ा चोरीच्या घटनेचा तपास पोलीसांनी पूर्ण केल्याचे अंबरनाथ व्यापारी संघाने पोलिसांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा