शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
4
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
6
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
8
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
9
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
10
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
11
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
12
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
13
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
14
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
15
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
16
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
17
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
18
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
19
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

‘मोदीजीने एक बार कमिटमेंट कर दी तो वो किसीकी भी नही सुनते’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 08:10 IST

वाढवण बंदरप्रश्नी भाजप प्रवक्त्या श्वेता शालिनी यांचे वक्तव्य

पालघर : ‘मोदीजीने जो बात एक बार बोल दी तो बोल दी, एक बार कमिटमेंट कर दी तो वो किसीकी भी नही सुनते,’ असे वक्तव्य भाजपच्या प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी वाढवण बंदराबाबत केले असून स्थानिकांमध्ये संतप्त भाव उमटले आहेत. दरम्यान, अर्थमंत्र्यांनी नुकताच सादर केलेला अर्थसंकल्प हा नव्या भारताचे चित्र डोळ्यांसमोर ठेवून बनविण्यात आलेला असून या अर्थसंकल्पात गरीब, शेतकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि व्यावसायिक या सर्वांचा विचार करण्यात आलेला आहे, असे मत भाजपच्या प्रदेश प्रवक्ता श्वेता शालिनी यांनी पालघर येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केले.पंतप्रधान मोदी सरकारच्या २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांचा विकास, रस्ते, परिवहनपासून ते सुरक्षेपर्यंत भारताला अर्थशक्ती बनविण्याचा संकल्प असून हा सर्वांचा आणि सर्वांसाठीचा अर्थसंकल्प आहे. कोरोना महामारीमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला असला तरी आर्थिक स्रोतामध्ये वाढ करण्यासाठी नवे कर लावणे स्वाभाविक होते. मात्र या अर्थसंकल्पात करांमध्ये काही वाढ करण्यात आलेली नाही आणि महागाई दरदेखील पाच टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्यात आलेला आहे. रस्ते, वीज, पाणी, रेल्वे, मेट्रो, मालवाहतूक, मार्गिका, बंदरे, विमानतळ या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी मात्र ७ लाख ५४ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे त्या म्हणाल्या.हा अर्थसंकल्प गरिबांचे कल्याण आणि महिला सक्षमीकरणासाठी समर्पित असून उज्ज्वल योजनेचा लाभ आतापर्यंत ८ कोटी महिलांना देण्यात आला आहे. स्थलांतरित मजुरांना ‘एक देश एक शिधापत्रिका’ योजना पोर्टलने जोडण्यात आले आहे. महिलांना दिवस-रात्र अशा सर्व पाळ्यांत काम करण्यासाठी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. आरोग्यविषयक तरतुदीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत १३७ टक्क्यांनी वाढ करीत ९४ हजार कोटींवरून २.३८ लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्यात आल्याचे प्रवक्त्या शालिनी यांनी सांगितले. दरम्यान, भाजप प्रवक्त्या श्वेता शालिनी यांच्या या वक्तव्यानंतर पालघरमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा