शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
7
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
8
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
9
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
10
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
11
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
12
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
13
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
14
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
15
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
16
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
17
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
18
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
19
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल

एमआयडीसीला पैसे देऊनही भूखंडांचा ताबा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 01:14 IST

नव्या कारखानदारांना या भागात उद्योग करण्याची इच्छा असतानाही आता एमआयडीसीला या भागात नवीन कारखान्यांसाठी जागा उपलब्ध करून देता येत नाही

पंकज पाटील

अंबरनाथ शहरात एक हजार २०० च्या वर लहानमोठे कारखाने आहेत. तसेच अजून १०० ते १२५ नवीन कारखानदार या भागात कारखाने उभारण्याच्या मार्गावर आहेत. नव्या कारखानदारांना या भागात उद्योग करण्याची इच्छा असतानाही आता एमआयडीसीला या भागात नवीन कारखान्यांसाठी जागा उपलब्ध करून देता येत नाही. त्यातच, या आधीच ज्या कारखानदारांना जागा दिली आहे, त्यांनाच एमआयडीसीने जागेचा ताबा दिलेला नाही. उद्योगाला उभारी मिळत असतानाही एमआयडीसी मात्र त्या उद्योगांना हवी तशी साथ देत नसल्याचे चित्र दिसत आहे.

‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेक इन महाराष्ट्र’चा नारा देणाऱ्या एमआयडीसीच्या गलथान कारभाराची प्रचीती अंबरनाथमध्ये आली आहे. अंबरनाथमधील एमआयडीसीचा विस्तार करण्यासाठी फेज-३ अंतर्गत पाले गावाजवळील १२० एकर जागा ताब्यात घेण्यात आली. २०११ मध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या जागेचे प्लॉट पाडून ते उद्योजकांना ऑनलाइन अर्जाद्वारे देण्यात आले. तब्बल ८० लहानमोठ्या उद्योजकांनी हे प्लॉट घेतले. ऑफर लेटरच्या वेळी या उद्योजकांकडून एमआयडीसीने २५ टक्के रक्कम घेतली. त्यात ऑनलाइन अर्ज करून प्लॉट घेणाऱ्या ५५ उद्योजकांनी, तर ऑफलाइन अर्ज केलेल्यांपैकी २५ उद्योजकांनी नियमाप्रमाणे एमआयडीसीकडे २५ टक्के पैसे भरले. ऑनलाइनमधील उद्योजकांनी १५ कोटी, तर ऑफलाइनवरील उद्योजकांनी २३ कोटी रुपये एमआयडीसीकडे भरून प्लॉटचे अलॉटमेंट लेटर घेतले. उद्योजकांना प्लॉटचे वितरण करताना ताब्यात घेतलेल्या जागेवर सर्व सुविधा पुरवणे बंधनकारक होते. मात्र, पैसे घेऊन बसलेल्या एमआयडीसीने गेल्या चार वर्षांत येथे कोणत्याच सुविधा पुरवलेल्या नाहीत. या ठिकाणी पाण्याची अद्याप कोणतीच सोय झालेली नाही. साध्या जलवाहिन्या अद्याप टाकण्यात आलेल्या नाहीत. वीजपुरवठ्याची कोणतीच सोय करण्यात आलेली नाही. एवढेच नव्हे तर रस्ते आणि दिवाबत्तीची सोय केलेली नाही. ऑफलाइनच्या १६ उद्योजकांना तर ऑनलाइनच्या ३२ उद्योजकांकडून पूर्ण पैसे घेऊन त्यांना अद्यापही प्लॉट ताब्यात देण्यात आलेले नाहीत. तब्बल १०६ कोटी रुपये घेऊन एमआयडीसी उद्योजकांना प्लॉटचा ताबा देण्यास चालढकल करत आहे. प्लॉट देण्यायोग्य नसतानाही संबंधित उद्योजकांकडून पूर्ण पैसे का स्वीकारण्यात आले, हे अद्यापही एमआयडीसीने स्पष्ट केलेले नाही.

नव्याने स्थापन होणाऱ्या एमआयडीसीसोबतच आता एक हजार २०० एकर जागेत स्थापन झालेल्या आनंदनगर एमआयडीसीमध्येदेखील एकूण ८५० कारखानदार आहेत, तर ३५० लहान उद्योगांचे गाळे आहे. सरासरी १२०० उद्योग या ठिकाणी कार्यरत असतानाही या भागात एमआयडीसी सुविधा पुरवताना दिसत नाही. मुळात या संपूर्ण एमआयडीसीमध्ये सरासरी ३० हजारांच्या वर कामगार काम करत आहेत. असे असतानाही या कामगारांच्या सोयीसाठी एमआयडीसी काहीच करताना दिसत नाही. उद्योगांप्रमाणे कामगारांनाही वाºयावर सोडण्याचे काम एमआयडीसीने केले आहे.

टॅग्स :thaneठाणेMIDCएमआयडीसीbadlapurबदलापूर