शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

एमआयडीसीला पैसे देऊनही भूखंडांचा ताबा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 01:14 IST

नव्या कारखानदारांना या भागात उद्योग करण्याची इच्छा असतानाही आता एमआयडीसीला या भागात नवीन कारखान्यांसाठी जागा उपलब्ध करून देता येत नाही

पंकज पाटील

अंबरनाथ शहरात एक हजार २०० च्या वर लहानमोठे कारखाने आहेत. तसेच अजून १०० ते १२५ नवीन कारखानदार या भागात कारखाने उभारण्याच्या मार्गावर आहेत. नव्या कारखानदारांना या भागात उद्योग करण्याची इच्छा असतानाही आता एमआयडीसीला या भागात नवीन कारखान्यांसाठी जागा उपलब्ध करून देता येत नाही. त्यातच, या आधीच ज्या कारखानदारांना जागा दिली आहे, त्यांनाच एमआयडीसीने जागेचा ताबा दिलेला नाही. उद्योगाला उभारी मिळत असतानाही एमआयडीसी मात्र त्या उद्योगांना हवी तशी साथ देत नसल्याचे चित्र दिसत आहे.

‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेक इन महाराष्ट्र’चा नारा देणाऱ्या एमआयडीसीच्या गलथान कारभाराची प्रचीती अंबरनाथमध्ये आली आहे. अंबरनाथमधील एमआयडीसीचा विस्तार करण्यासाठी फेज-३ अंतर्गत पाले गावाजवळील १२० एकर जागा ताब्यात घेण्यात आली. २०११ मध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या जागेचे प्लॉट पाडून ते उद्योजकांना ऑनलाइन अर्जाद्वारे देण्यात आले. तब्बल ८० लहानमोठ्या उद्योजकांनी हे प्लॉट घेतले. ऑफर लेटरच्या वेळी या उद्योजकांकडून एमआयडीसीने २५ टक्के रक्कम घेतली. त्यात ऑनलाइन अर्ज करून प्लॉट घेणाऱ्या ५५ उद्योजकांनी, तर ऑफलाइन अर्ज केलेल्यांपैकी २५ उद्योजकांनी नियमाप्रमाणे एमआयडीसीकडे २५ टक्के पैसे भरले. ऑनलाइनमधील उद्योजकांनी १५ कोटी, तर ऑफलाइनवरील उद्योजकांनी २३ कोटी रुपये एमआयडीसीकडे भरून प्लॉटचे अलॉटमेंट लेटर घेतले. उद्योजकांना प्लॉटचे वितरण करताना ताब्यात घेतलेल्या जागेवर सर्व सुविधा पुरवणे बंधनकारक होते. मात्र, पैसे घेऊन बसलेल्या एमआयडीसीने गेल्या चार वर्षांत येथे कोणत्याच सुविधा पुरवलेल्या नाहीत. या ठिकाणी पाण्याची अद्याप कोणतीच सोय झालेली नाही. साध्या जलवाहिन्या अद्याप टाकण्यात आलेल्या नाहीत. वीजपुरवठ्याची कोणतीच सोय करण्यात आलेली नाही. एवढेच नव्हे तर रस्ते आणि दिवाबत्तीची सोय केलेली नाही. ऑफलाइनच्या १६ उद्योजकांना तर ऑनलाइनच्या ३२ उद्योजकांकडून पूर्ण पैसे घेऊन त्यांना अद्यापही प्लॉट ताब्यात देण्यात आलेले नाहीत. तब्बल १०६ कोटी रुपये घेऊन एमआयडीसी उद्योजकांना प्लॉटचा ताबा देण्यास चालढकल करत आहे. प्लॉट देण्यायोग्य नसतानाही संबंधित उद्योजकांकडून पूर्ण पैसे का स्वीकारण्यात आले, हे अद्यापही एमआयडीसीने स्पष्ट केलेले नाही.

नव्याने स्थापन होणाऱ्या एमआयडीसीसोबतच आता एक हजार २०० एकर जागेत स्थापन झालेल्या आनंदनगर एमआयडीसीमध्येदेखील एकूण ८५० कारखानदार आहेत, तर ३५० लहान उद्योगांचे गाळे आहे. सरासरी १२०० उद्योग या ठिकाणी कार्यरत असतानाही या भागात एमआयडीसी सुविधा पुरवताना दिसत नाही. मुळात या संपूर्ण एमआयडीसीमध्ये सरासरी ३० हजारांच्या वर कामगार काम करत आहेत. असे असतानाही या कामगारांच्या सोयीसाठी एमआयडीसी काहीच करताना दिसत नाही. उद्योगांप्रमाणे कामगारांनाही वाºयावर सोडण्याचे काम एमआयडीसीने केले आहे.

टॅग्स :thaneठाणेMIDCएमआयडीसीbadlapurबदलापूर