शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

लेखकांसाठी लोकमत हक्काचे व्यासपीठ; राजेंद्र दर्डा यांनी ‘लिटफेस्ट’ची मांडली कल्पना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 06:45 IST

फक्त आणि फक्त साहित्यिकांसाठी एक सन्मान सोहळा असावा, ही भूमिका घेऊन ‘लोकमत साहित्य पुरस्कार’ची सुरुवात केल्याचे लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी सांगितले.

ठाणे : अनेक मोठ्या पुरस्कार सोहळ्यांत ज्या कथेवर, कादंबरीवर चित्रपट बनतात, मालिका बनतात, त्या लेखकांना अवघ्या काही क्षणात पुरस्कार देऊन रवाना केले जाते. मात्र, लेखकांसाठी, पुस्तकांसाठी आज देशात कोणत्याही माध्यम समूहाकडून स्वतंत्रपणे पुरस्कार दिला जात नाही. फक्त आणि फक्त साहित्यिकांसाठी एक सन्मान सोहळा असावा, ही भूमिका घेऊन ‘लोकमत साहित्य पुरस्कार’ची सुरुवात केल्याचे लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी सांगितले.

येत्या काही वर्षांत ‘लोकमत साहित्य पुरस्कार’ हा साहित्य महोत्सवामध्ये परिवर्तित व्हावा, लोकमत लिटफेस्ट आकाराला यावे, त्यात वेगवेगळ्या भाषांची पुस्तके यावीत, देशभरातले लेखक, कवी त्या ठिकाणी यावेत आणि त्या व्यासपीठावरून मराठी साहित्याचा गौरव व्हावा, ही ‘लोकमत’ची इच्छा असल्याचेही त्यांनी बोलून दाखविले.  ‘लोकमत’ने साहित्य पुरस्कारांची परंपरा सुरू केली. या आधीचे तीनही सोहळे पुण्यात झाले. त्यात श्याम मनोहर, द. मा. मिरासदार, रा. चिं. ढेरे यांचा गौरव ‘लोकमत’ने केला आहे, असे सांगून राजेंद्र दर्डा पुढे म्हणाले की, यंदा हा सोहळा ठाण्यात होतोय.

अनेकानेक अजरामर गीते लिहिणाऱ्या जनकवी पी. सावळाराम यांचे हे ठाणे. या ठाण्यात ‘लोकमत साहित्य पुरस्कार सोहळा’ आपल्या सर्वांच्या साक्षीनं व्हावा, यासारखा दुसरा कोणताही सुंदर योग नाही. ज्यांना ‘ज्ञानपीठ’ने गौरविले ते भालचंद्र नेमाडे यांना आपण ‘जीवनगौरव पुरस्कार’ने सन्मानित करत आहोत, यासारखा दुसरा आनंद नाही, असे सांगून दर्डा पुढे म्हणाले की, नेमाडेंची भूमिका नेहमीच सुस्पष्ट, परखड आणि तत्वनिष्ठ राहिलेली आहे. नेमाडे यांनी आपल्या साहित्यसाधनेतून स्वतःचं वेगळेपण आणि स्वतंत्र भूमिका सातत्याने मांडली आहे. साहित्यासारख्या क्षेत्रात अनेकदा बुद्धिभेद करून वैचारिक गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न होताना आपण पाहत असतो. अशा वातावरणात स्वतःची ठाम भूमिका घेऊन ती सातत्याने मांडत राहणं यासाठी तपश्चर्या, साधना असावी लागते. उपस्थित साहित्यिकांचे आणि विजेत्यांचे त्यांनी अभिनंदन केले. 

टॅग्स :Lokmatलोकमत