शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

‘खेलो इंडिया’च्या विजेत्यांचा पडला विसर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 00:57 IST

विद्यार्थी, पालकांची नाराजी; जिल्हा प्रशासनाकडून प्रजासत्ताक दिनी सन्मान नाही

ठाणे : प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय ‘खेलो इंडिया’ स्पर्धेतील जिल्ह्याच्या विजेत्यांचा सत्कार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते शनिवारी करण्यात आला. पहिल्या राष्ट्रीय स्पर्धेत विजयी ठरलेल्या चार स्पर्धकांचा यंदाच्या प्रजासत्ताक दिनी सत्कार होणे अपेक्षित होते; परंतू जिल्हा प्रशासनाला त्याचा विसर पडल्याची गंभीर बाब विद्यार्थ्यांच्या पालकांनी निदर्शनास आणून देत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.राष्ट्रीय पातळीवर ‘खेलो इंडिया’ ही पहिली स्पर्धा मागील वर्षी दिल्ली येथे घेण्यात आली. यामध्ये चारवी पुजारी, पूर्वा किरवे, अनन्या सोमण, पुष्कर पाटील आणि आर्यन लांडगे या ठाणे जिल्ह्यातील पाच विद्यार्थ्यांनी विजय प्राप्त केला. त्यांचा यंदाच्या प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याहस्ते सन्मान होणे अपेक्षित होते, पण तो झाला नसल्याची खंत पालकांकडून व्यक्त करण्यात आली. यंदा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार पालकमंत्र्यांकडून झाला आहे. त्यांच्या आधी उत्तीर्ण झालेल्या पाच विजेत्यांचा जिल्हा प्रशासनाला विसर पडल्याची खंत पालकांकडून व्यक्त होत आहे.देशात ‘खेलो इंडिया’ या राष्ट्रीय स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. यावेळी या स्पर्धा पुण्याच्या बालेवाडी येथे पार पडल्या. जिल्ह्यातील आठ विद्यार्थी यंदाच्या स्पर्धेत उत्तीर्ण झाले. त्यांचा सत्कार जिल्हा प्रशासनाकडून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते साकेत मैदानावर झाला. बालेवाडी येथे शालेय मंत्री विनोद तावडे यांच्याहस्ते त्यांचा सन्मानचिन्हे देऊन सत्कार करण्यात आला होता.‘खेलो इंडिया’ या राष्ट्रीय स्पर्धेत यावर्षी सुवर्ण पदक प्राप्त केलेल्या दहा खेळाडूंचा सत्कार पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते झाला. याप्रमाणेच मागील वर्षी विजयी ठरलेल्या सर्व खेळाडूंनादेखील लवकरच जिल्हाधिकाºयांच्याहस्ते सत्कार करून त्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. नुकत्याच झालेल्या स्पर्धेतील विजेत्यांचा प्रजासत्ताक दिनी सत्कार झाला. एक वर्ष झाल्यामुळे मागील वर्षीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार लवकरच जिल्हाधिकाºयांच्याहस्ते करण्याचे नियोजन आहे.- शरद कलावंत, जिल्हा क्रीडा अधिकारी, ठाणे

टॅग्स :Khelo Indiaखेलो इंडियाthaneठाणे