शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील उड्डाणपुलांवर खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 23:36 IST

शहरातील वाहतूककोंडी : नागरिक त्रस्त, तातडीने दुरुस्तीची मागणी

भिवंडी : शहरातील वाहतूककोंडीवर मात करण्यासाठी जुन्या मुंबई-आग्रा मार्गावर धामणकरनाका उड्डाणपूल, कल्याणनाका ते बागेफिरदोस मशिदीपर्यंत स्व. राजीव गांधी उड्डाणपूल तसेच भिवंडी-वाडा रोडवर वंजारपट्टीनाका उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. मात्र, या पुलांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून शहरातील वाहतूककोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाळ्यात या पुलांवर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहने चालवणे मोठी कसरत ठरत असताना या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे भिवंडी महापालिका प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होत असल्याची नाराजी वाहनचालक व्यक्त करत आहेत.

भिवंडी-वाडा रोडवरील वंजारपट्टीनाका येथे दोन वर्षांपूर्वी एमएमआरडीएने उभारलेल्या उड्डाणपुलावरील रस्त्याची मुसळधार पावसात अक्षरश: चाळण झाली आहे.त्यामुळे पुलावरील वाहतूक मंदावत असल्याने वाहतूककोंडी गंभीर बनली आहे. रात्री खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अवजड वाहने त्यात आदळून बंद पडत आहेत. त्यामुळे उड्डाणपुलाच्या ढाच्यालाच धोका निर्माण झाला आहे. शहरातील वाहतूककोंडी टाळण्यासाठी भिवंडी-वाडा व नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या वंजारपट्टीनाका या मुख्य चौकात एमएमआरडीएच्या माध्यमातून चौरंगी मार्ग असलेला उड्डाणपूल दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आला आहे. या पुलाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते. या उड्डाणपुलाच्या देखभाल दुरुस्तीचे काम जेएमसी या कंपनीकडे आहे. दीड वर्षापासून ठेकेदाराने उड्डाणपुलाच्या दुरु स्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे पुलावरील रस्त्याचा पृष्ठभाग खराब होऊन वरच्या थराचा स्लॅब खुला झाला आहे. रस्त्यावरील काँक्रि ट खराब झाल्याने मोठे खड्डे पडले आहेत.पुलावरील भिवंडी-वाडा-नाशिककडे जाणारी लहानमोठी वाहने तसेच ट्रक व कंटेनर आदी अवजड वाहने खड्ड्यांमध्ये आदळत असल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहने बंद पडण्याचे प्रकार दररोज घडत आहेत. येथे दुचाकी अपघातही वढल्याने वाहतूककोंडी होत आहे. एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी तातडीने ठेकेदारामार्फत हा पूल दुरु स्त करून नागरिकांना दिलासा द्यावा, असे पत्र पालिकेतील भाजपचे गटनेते निलेश चौधरी यांनी पुलाच्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. वेळीच दुरुस्ती न झाल्यास स्व. राजीव गांधी उड्डाणपुलाप्रमाणेच वंजारपट्टी पुलाचीही दुरवस्था होण्याचा इशारा चौधरी यांनी दिला.धामणकरनाका येथील उड्डाणपुलाचीही वाताहत झाली असून जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या पुलांच्या दुरु स्तीकडे पालिका प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केल्याने या पुलावर भलेमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या खड्ड्यांमुळे याठिकाणी नेहमीच अपघात घडत आहेत. उड्डाणपुलांवर पडलेले खड्डे पावसाळ्यापूर्वी प्रशासनाकडून भरण्यात आले होते, मात्र तीन दिवसांपासून पडणाºया पावसामुळे शहरातील रस्त्यांबरोबरच या उड्डाणपुलांवरही खड्डे पडले असून पालिका प्रशासनाकडून लवकरात लवकर हे खड्डे भरण्यात येतील, असे भिवंडी महापालिकेचे आयुक्त अशोककुमार रणखांब यांनी सांगितले.हलकी वाहने चालवणेही धोकादायकस्व.राजीव गांधी उड्डाणपुलाच्या निकृष्ट बांधकामामुळे या पुलाचा एसटी स्थानकासमोरील स्लॅबचा भाग कोसळल्याची घटना मागील वर्षी घडली होती. त्यानंतर, थातूरमातूर दुरु स्तीनंतर पुन्हा पूल वाहतुकीस खुला करण्यात आला होता. बांधकाम खूपच निकृष्ट असल्याने अवजड वाहनांच्या वाहतुकीने पुलाला हादरे बसत आहेत. या पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. तर, पूल कधीही दुर्घटनाग्रस्त होण्याचा धोका निर्माण झाल्याने पालिका प्रशासनाने अवजड वाहनांच्या वाहतुकीला या पुलावर बंदी घातली आहे. मात्र, हलकी वाहने चालवणेही धोक्याचे आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीVasai Virarवसई विरार