शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

‘पितांबरी’ची आग शॉर्टसर्किटमुळे

By admin | Updated: February 21, 2017 03:51 IST

भिवंडी तालुक्यातील सुपे-अनगाव येथील पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.च्या अगरबत्तीनिर्मिती कारखान्याला रविवारी लागलेली

ठाणे : भिवंडी तालुक्यातील सुपे-अनगाव येथील पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.च्या अगरबत्तीनिर्मिती कारखान्याला रविवारी लागलेली आग विद्युतपुरवठ्यातील शॉर्टसर्किट व हवेतील तापमानवाढ या दोन्ही कारणांमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज कंपनीने वर्तवला आहे. आगीसाठी कुणावरही संशय नसल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. कंपनीने आगप्रतिबंधक यंत्रणा उपलब्ध केली असून साप्ताहिक सुटी असल्याने व अग्निशामक दलाचे बंब वेळेवर पोहोचू न शकल्याने आग वेळेत आटोक्यात आणणे शक्य झाले नाही, असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांनी स्पष्ट केले आहे.प्रभुदेसाई म्हणतात की, आगीच्या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. परंतु, अगरबत्तीच्या पॅकिंगसाठी लागणारे साहित्य, कार्यालयीन कागदपत्रे व संगणक यंत्रणा पूर्णपणे भस्मसात झाली आहे. आगीमुळे झालेले नुकसान साधारणत: एक ते दीड कोटीच्या घरात जाईल, असा प्राथमिक अंदाज आहे. याच ठिकाणी पितांबरीच्या फूडकेअर डिव्हिजनचा कारखाना, पितांबरी टिश्यू कल्चरसाठी उभारण्यात आलेले ग्रीनहाउस, गोशाळा आदी उपक्रम चालतात. परंतु, यापैकी कशाचेही आगीमुळे नुकसान झालेले नाही. आगीचे वृत्त समजताच पितांबरीचे संचालक व अ‍ॅग्रीकेअर आणि अगरबत्ती डिव्हिजनचे व्हाइस प्रेसिडेंट परीक्षित प्रभुदेसाई व चीफ मार्केटिंग आॅफिसर माधव पुजारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्यात सहभाग घेतला. येत्या एक ते दोन महिन्यांत कारखाना पूर्ववत सुरू करण्यात येईल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)