शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

कल्याणमध्ये खड्ड्याचा बळी; पत्रीपुलावरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 02:23 IST

ट्रकची रिक्षा आणि दोन दुचाकींना धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू , तर अन्य एक जखमी

कल्याण : पत्रीपुलावर होणारी प्रचंड कोंडी आणि खड्डे आता चालकांच्या जीवावर बेतू लागला आहे. शुक्रवारी सकाळी पूर्वेकडून पत्रीपूलमार्गे पश्चिमेला जाणाऱ्या एका ट्रकने रिक्षा आणि दोन दुचाकींना दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार अरुण महाजन यांचा मृत्यू झाला, तर विलास रेडकर हे अन्य दुचाकीचालक जखमी झाल्याची घटना घडली आहे. खड्ड्यांमुळे हा अपघात झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.ब्रिटिशकालीन पत्रीपूल धोकादायक बनल्याने तो नोव्हेंबरमध्ये पाडण्यात आला. तेव्हापासून शेजारी केडीएमसीने बांधलेल्या पुलावरून दोन्ही बाजूंकडील वाहतूक सुरू आहे. त्यामुळे पत्रीपुलावर सातत्याने प्रचंड वाहतूककोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे. तसेच, खड्डे चुकवताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून हेच खड्डे शुक्रवारी महाजन यांच्या जीवावर बेतल्याचे बोलले जात आहे.पत्रीपुलावरून पश्चिमेकडे जाणाºया ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने ट्रकने रहेजा कॉम्प्लेक्ससमोर रोडवर एका रिक्षासह दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातात महाजन यांचा जागीच मृत्यू झाला, तर रेडक र हे जखमी झाले. यात रिक्षाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पत्रीपुलावरून पश्चिमेकडे येताना रस्त्याला उतार असून खड्डे असल्याने दुचाकीस्वारांनी ते वाचवण्यासाठी वेग कमी केला आणि त्याचवेळी पाठीमागून आलेल्या वेगातील ट्रकची धडक बसल्याचा आरोप होत आहे. जखमी रेडकर यांनीही खड्डे चुकवताना अपघात झाल्याचा आरोप आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले महाजन हे पश्चिमेतील बेतुरकरपाडा येथे वास्तव्याला होते. ते डोंबिवली एमआयडीसीतील खाजगी कंपनीत कामाला होते. रात्रपाळी करून सकाळी दुचाकीवरून ते घरी परतत होते. त्यावेळी गाडीला अपघात होऊन त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर रेडकर यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. त्यांच्या हाताला चार टाके पडले आहेत. रेडकर हे डोंबिवलीतील एमआयडीसी विभागात राहतात. अपघातास कारणीभूत असलेला ट्रकचालक नदीम शेख याला महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली आहे.पुलाचे काम कधी मार्गी लागणार?ब्रिटिशकालीन पत्रीपूल पाडल्यानंतर नवीन पुलाच्या कामाचे डिसेंबर २०१८ मध्ये भूमिपूजन करण्यात आले. नवीन पुलाचे काम आठ महिन्यांत पूर्ण होईल, असा दावा सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. परंतु, आजघडीला सात महिने उलटूनही काम संथगतीनेच सुरू आहे. मागील वर्षी कल्याणमधील खड्ड्यांनी पाच जणांचा बळी घेतला होता. शुक्रवारी घडलेल्या घटनेनंतर तरी संबंधित विभागाला जाग येते का, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Potholeखड्डेAccidentअपघात