शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

शिवसेनेच्या कंटेनर शाखेविरोधात जितेंद्र आव्हाड उच्च न्यायालयात दाखल करणार याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 14:12 IST

न्यायालयाच्या आदेशानुसार  रस्ता रुंदीकरणासाठी 13  मे 2016  रोजी ठाणे शहरातील राजकीय पक्षांची सुमारे 180 कार्यालये पाडण्यात आली होती.

ठाणे, दि. 13 -  न्यायालयाच्या आदेशानुसार  रस्ता रुंदीकरणासाठी 13  मे 2016  रोजी ठाणे शहरातील राजकीय पक्षांची सुमारे 180 कार्यालये पाडण्यात आली होती. या कारवाईमध्ये कळवा नाका येथील शिवसेनेची शाखाही जमीनदोस्त करण्यात आली होती.  त्यानंतर फेरबांधकाम करुन उभारण्यात येणारी शाखा कळव्यातील सुजाण नागरिकाने याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर जमीनदोस्त करण्यात आली होती. 

आता पुन्हा ही शाखा कंटेनरच्या माध्यमातून रस्ता अडवून उभी करण्यात आली आहे. हा न्यायालयाच्या आदेशाचा अवमान असल्याने त्या विरोधात आमदार जितेंद्र आव्हाड हे उच्च न्यायालयात अवमानना याचिका दाखल करणार आहेत.  त्या अनुषंगाने त्यांनी ठामपा आयुक्तांसह पालिकेच्या संबधित अधिका-यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.  

13 मे 2016 रोजी ठाणे महानगर पालिकेने  शहरातील राजकीय पक्षांच्या कार्यालयांवर कारवाई केली होती. याच कारवाईचा भाग म्हणून कळवा नाका येथे रहदारीला अडथळा ठरणारी शिवसेनेची शाखा जमीनदोस्त केली होती. मात्र, शिवसेनेने न्यायालयाच्या आदेशाला धुडकावून सदर ठिकाणीच शाखा उभारण्याचा प्रयत्न सुरु केला होता. या ठिकाणी शिवसेनेने बांधकाम सुरु केले असतानाच  सुजाण नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या होत्या. 

मात्र, ठामपाने कारवाई न केल्यामुळे या भागातील सुजाण नागरिक सौरव पालये यांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुन:र्बांधणी करीत असलेल्या शिवसेनेच्या शाखेचे बांधकाम पाडण्यात आले. तसेच, या ठिकाणी रस्ता कायम ठेवण्यात यावा, असे आदेश न्यायालयाने जनहित याचिका क्रमांक 7420/ 2016 dच्या आपल्या निकालपत्रात दिला. असे असतानाही, न्यायालयाच्या आदेशाचा भंग करुन कळवा नाका येथे चक्क दोन भगव्या रंगाचे कंटेनर ठेवून शाखा थाटण्यात आली आहे.

या कंटेनरमुळे रस्ता अबाधित ठेवण्याचा तसेच या ठिकाणी कोणतेही बांधकाम होऊ देऊ नये, या  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाला असल्याची बाब आमदार जितेंद्र आव्हाड यांनी    ठामपाचे अतिक्रमण उपायुक्त बुरुपुल्ले, कळवा- मुंब्रा उपायुक्त मनिष जोशी, कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सोंडे यांच्या निदर्शनास आणुन दिली. 

मात्र, ठाणे महानगर पालिकेने कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. हा प्रकार म्हणजेच  न्यायालयाची बेअदबी अवमान आहे. त्यामुळेच  आ. जितेंद्र आव्हाड यांनी  जनहित याचिका क्रमांक 7420/ 2016  च्या न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होत असल्याने अवमानना याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने पालिका आयुक्त संजीव जैस्वाल यांना कायदेशीर नोटीसही त्यांनी बजावली आहे.