शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
2
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
5
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
6
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
8
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
9
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
10
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
11
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
12
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
13
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
14
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
15
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
16
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
17
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
18
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
19
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
20
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका

शिवसेनेच्या कंटेनर शाखेविरोधात जितेंद्र आव्हाड उच्च न्यायालयात दाखल करणार याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 14:12 IST

न्यायालयाच्या आदेशानुसार  रस्ता रुंदीकरणासाठी 13  मे 2016  रोजी ठाणे शहरातील राजकीय पक्षांची सुमारे 180 कार्यालये पाडण्यात आली होती.

ठाणे, दि. 13 -  न्यायालयाच्या आदेशानुसार  रस्ता रुंदीकरणासाठी 13  मे 2016  रोजी ठाणे शहरातील राजकीय पक्षांची सुमारे 180 कार्यालये पाडण्यात आली होती. या कारवाईमध्ये कळवा नाका येथील शिवसेनेची शाखाही जमीनदोस्त करण्यात आली होती.  त्यानंतर फेरबांधकाम करुन उभारण्यात येणारी शाखा कळव्यातील सुजाण नागरिकाने याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर जमीनदोस्त करण्यात आली होती. 

आता पुन्हा ही शाखा कंटेनरच्या माध्यमातून रस्ता अडवून उभी करण्यात आली आहे. हा न्यायालयाच्या आदेशाचा अवमान असल्याने त्या विरोधात आमदार जितेंद्र आव्हाड हे उच्च न्यायालयात अवमानना याचिका दाखल करणार आहेत.  त्या अनुषंगाने त्यांनी ठामपा आयुक्तांसह पालिकेच्या संबधित अधिका-यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.  

13 मे 2016 रोजी ठाणे महानगर पालिकेने  शहरातील राजकीय पक्षांच्या कार्यालयांवर कारवाई केली होती. याच कारवाईचा भाग म्हणून कळवा नाका येथे रहदारीला अडथळा ठरणारी शिवसेनेची शाखा जमीनदोस्त केली होती. मात्र, शिवसेनेने न्यायालयाच्या आदेशाला धुडकावून सदर ठिकाणीच शाखा उभारण्याचा प्रयत्न सुरु केला होता. या ठिकाणी शिवसेनेने बांधकाम सुरु केले असतानाच  सुजाण नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या होत्या. 

मात्र, ठामपाने कारवाई न केल्यामुळे या भागातील सुजाण नागरिक सौरव पालये यांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुन:र्बांधणी करीत असलेल्या शिवसेनेच्या शाखेचे बांधकाम पाडण्यात आले. तसेच, या ठिकाणी रस्ता कायम ठेवण्यात यावा, असे आदेश न्यायालयाने जनहित याचिका क्रमांक 7420/ 2016 dच्या आपल्या निकालपत्रात दिला. असे असतानाही, न्यायालयाच्या आदेशाचा भंग करुन कळवा नाका येथे चक्क दोन भगव्या रंगाचे कंटेनर ठेवून शाखा थाटण्यात आली आहे.

या कंटेनरमुळे रस्ता अबाधित ठेवण्याचा तसेच या ठिकाणी कोणतेही बांधकाम होऊ देऊ नये, या  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाला असल्याची बाब आमदार जितेंद्र आव्हाड यांनी    ठामपाचे अतिक्रमण उपायुक्त बुरुपुल्ले, कळवा- मुंब्रा उपायुक्त मनिष जोशी, कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सोंडे यांच्या निदर्शनास आणुन दिली. 

मात्र, ठाणे महानगर पालिकेने कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. हा प्रकार म्हणजेच  न्यायालयाची बेअदबी अवमान आहे. त्यामुळेच  आ. जितेंद्र आव्हाड यांनी  जनहित याचिका क्रमांक 7420/ 2016  च्या न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होत असल्याने अवमानना याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने पालिका आयुक्त संजीव जैस्वाल यांना कायदेशीर नोटीसही त्यांनी बजावली आहे.