शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

पत्नीची हत्या करणाऱ्यास यूपीतून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 01:14 IST

बहिणीच्या मुलीशी (भाची) असलेल्या प्रेमसंबंधाची कुणकुण पत्नीला लागल्याने झालेल्या भांडणात तिची हत्या करून भिवंडीच्या नारपोलीतून भाचीसह फरार झालेल्या निरंकार भरत सिंह याला ठाणे पोलिसांच्या ठाणे गुन्हे शाखा-१ ने उत्तर प्रदेशातून गुरुवार, २९ मार्च रोजी रात्री तब्बल १० वर्षांनंतर अटक केली.

ठाणे : बहिणीच्या मुलीशी (भाची) असलेल्या प्रेमसंबंधाची कुणकुण पत्नीला लागल्याने झालेल्या भांडणात तिची हत्या करून भिवंडीच्या नारपोलीतून भाचीसह फरार झालेल्या निरंकार भरत सिंह याला ठाणे पोलिसांच्या ठाणे गुन्हे शाखा-१ ने उत्तर प्रदेशातून गुरुवार, २९ मार्च रोजी रात्री तब्बल १० वर्षांनंतर अटक केली. मयत आन्ती निरंकार सिंह ऊर्फ शांतीदेवी ऊर्फ कोहली ऊर्फ नीलम (२५) ही आरोपीची दुसरी पत्नी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.निरंकार हा मूळचा उत्तर प्रदेशामधील आंबेडकरनगर जिल्ह्याचा रहिवासी आहे. त्याचे मयत आन्ती हिच्याशी लग्न होण्यापूर्वीही लग्न झाले होते. तिला सोडून त्याने आन्ती हिला भिवंडीत पळवून आणून दुसरे लग्न केले होते. ते दोघे नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असताना त्याचे त्याच्याच बहिणीच्या मुलीशी प्रेमप्रकरण सुरू झाले. याचीच कुणकुण आन्ती हिला लागल्याने त्यांच्यात जोराचे भांडण झाले. दरम्यान, त्याने तिचा गळा आवळून डोके भिंतीवर आपटून हत्या केली. तसेच भाचीला घेऊन नारपोलीतून पळून गेला. त्यानंतर, त्याने भाचीशी तिसरे लग्न करून वेगवेगळ्या ठिकाणी तो राहू लागला. मागील एक ते दीड वर्षापासून तो आपल्या मूळ गावी घर बांधून राहत असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस नाईक संजय दळवी यांना मिळाली होती. याबाबत शहानिशा झाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी व त्यांच्या पथकाने उत्तर प्रदेश एसटीएफ यांच्या मदतीने त्याला अटक केली आहे. हा गुन्हा २००८ साली घडला होता.गळा आवळून हत्यासुरुवातीला याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद के ली होती. मात्र, शवविच्छेदनात मयत आन्ती हिची गळा आवळून हत्या झाल्याचे पुढे आले. तसेच निरंकार यानेच आन्ती हिची हत्या केल्याचे तपासात निष्पन झाले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा