शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

पाणी पळवणाऱ्यांना मिळाले मोकळे रान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2016 02:34 IST

णीकपात धुडकावून लावत उल्हास नदीतून जादा पाणी उचलून कल्याण-डोंबिवलीच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या मीरा-भार्इंदर पालिकेवर कारवाई करण्याबाबत लघुपाटबंधारे

कल्याण : पाणीकपात धुडकावून लावत उल्हास नदीतून जादा पाणी उचलून कल्याण-डोंबिवलीच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या मीरा-भार्इंदर पालिकेवर कारवाई करण्याबाबत लघुपाटबंधारे खात्याने कानांवर हात ठेवले आहेत. कारवाई करणे आमच्या हातात नाही. आम्ही फक्त कपातीचे आणि पाणी कसे-किती वापरावे, याचे प्रमाण-आरक्षण ठरवून दिले आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. उल्हास नदीच्या पात्रातून कल्याण-डोंबिवली महापालिका पाणी उचलते. त्यावर, शुद्धीकरणाची प्रक्रिया करून ते पुरविते. या पालिकेप्रमाणेच बदलापूरजवळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नदीतून पाणी उचलते. जांभूळ येथे औद्योगिक विकास महामंडळ पाणी उचलते. स्टेम पाणीपुरवठा योजनाही या पात्रातून पाणी उचलते. या विविध पाणीग्राहक संस्थांना नदीच्या पात्रातील आरक्षणाचा कोटा ठरवून दिला आहे. नदीपात्रात बारवी आणि आंध्र धरणातून पाणी सोडले जाते. ही दोन्ही धरणे पूर्ण न भरल्याने नोव्हेंबरपासून ३० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली. मात्र, मीरा-भार्इंदर पालिकेने ही पाणीकपात धुडकावून लावत काही दिवसांपासून जास्तीचे पाणी उचलण्यास सुरुवात केली. परिणामी, कल्याण-डोंबिवलीत ठणठणाट झाला. पाण्याच्या पळवापळवीबाबत कारवाई कोण करणार, ते स्पष्ट नाही. कोणी किती पाणी उचलावे, हे ठरवून देणाऱ्या लघुपाटबंधारे खात्याने जादा पाणी उचलण्याच्या कारवाईशी आपला संबंध नसल्याचे सांगत जबाबदारी झटकली आहे. आम्ही विनंती करू शकतो!मीरा-भार्इंदर ३० टक्के पाणीकपात पाळत नसेल. जास्तीचे पाणी घेत असेल तर त्याविरोधात कारवाई काय करणार, अशी विचारणा लघुपाटबंधारे खात्याचे उपअभियंता हेमंत कुलकर्णी यांच्याकडे केली असता त्यांनी सांगितले, पाण्याचे नियोजन करण्यासाठी आम्ही ३० टक्के पाणीकपात लागू केली आहे. त्याची अंमलबजावणी एखादी संस्था करीत नसेल, तर त्यांच्याविरोधात कारवाईचा अधिकार आम्हाला नाही. आम्ही केवळ त्यांना कपात लागू करा, अशी विनंती करू शकतो. तशी चर्चा आम्ही मीरा-भार्इंदरशी केली आहे. थोडी स्थिती सुधारली : जुनेजानदीपात्रातील ज्या विहिरीतून पाणी घेतले जाते, त्या विहिरीची पातळी दोन दिवसांपूर्वी ०.८० मीटर इतकी खालावली होती. ही सोमवारची स्थिती. त्यात बुधवारी थोडी सुधारणा झाली. बुधवारी पाण्याची पातळी ७० सेंटिमीटरने वाढल्याचे केडीएमसी अभियंता तरुण जुनेजा यांनी सांगितले. स्टेम आणि कल्याण-डोंबिवलीच्या मोहने येथील पाणीउपशाच्या ठिकाणी असलेल्या पंपांमधील अंतर ५० मीटर असल्याने स्टेमच्या दिवसरात्र सुरू असलेल्या उपशाचा फटका केडीएमसीच्या पाणीपुरवठ्याला बसतो. त्यामुळे तेथे पाणीटंचाई जाणवते आहे. त्यामुळे स्टेममार्फत होणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी, योग्य नियोजनासाठी किमान एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवणे अपरिहार्य आहे. - सुनील सोनावणे, जिल्हा लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मीरा-भार्इंदर पालिकेने कोणाच्याही तोंडचे पाणी पळविलेले नाही. उलट, आमच्या हक्काचे पाणी मागितले असून ते शासकीय धोरणानुसार स्टेममार्फत वितरीत केले जात आहे. - अच्युत हांगे, पालिका आयुक्त सरकारच्या धोरणानुसारच मीरा-भार्इंदर पालिकेची पाणीकपात शिथिल करण्यात आली आहे. त्याबाबत स्टेमने लघुपाटबंधारे विभागाकडे पत्रव्यवहार केला. पण, त्यानंतरही त्यांनी अद्याप नियोजनासाठी निर्देश दिलेले नाहीत.- शशिकांत साळुंखे, स्टेमचे महाव्यस्थापक