शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पळवणाऱ्यांना मिळाले मोकळे रान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2016 02:34 IST

णीकपात धुडकावून लावत उल्हास नदीतून जादा पाणी उचलून कल्याण-डोंबिवलीच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या मीरा-भार्इंदर पालिकेवर कारवाई करण्याबाबत लघुपाटबंधारे

कल्याण : पाणीकपात धुडकावून लावत उल्हास नदीतून जादा पाणी उचलून कल्याण-डोंबिवलीच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या मीरा-भार्इंदर पालिकेवर कारवाई करण्याबाबत लघुपाटबंधारे खात्याने कानांवर हात ठेवले आहेत. कारवाई करणे आमच्या हातात नाही. आम्ही फक्त कपातीचे आणि पाणी कसे-किती वापरावे, याचे प्रमाण-आरक्षण ठरवून दिले आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. उल्हास नदीच्या पात्रातून कल्याण-डोंबिवली महापालिका पाणी उचलते. त्यावर, शुद्धीकरणाची प्रक्रिया करून ते पुरविते. या पालिकेप्रमाणेच बदलापूरजवळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नदीतून पाणी उचलते. जांभूळ येथे औद्योगिक विकास महामंडळ पाणी उचलते. स्टेम पाणीपुरवठा योजनाही या पात्रातून पाणी उचलते. या विविध पाणीग्राहक संस्थांना नदीच्या पात्रातील आरक्षणाचा कोटा ठरवून दिला आहे. नदीपात्रात बारवी आणि आंध्र धरणातून पाणी सोडले जाते. ही दोन्ही धरणे पूर्ण न भरल्याने नोव्हेंबरपासून ३० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली. मात्र, मीरा-भार्इंदर पालिकेने ही पाणीकपात धुडकावून लावत काही दिवसांपासून जास्तीचे पाणी उचलण्यास सुरुवात केली. परिणामी, कल्याण-डोंबिवलीत ठणठणाट झाला. पाण्याच्या पळवापळवीबाबत कारवाई कोण करणार, ते स्पष्ट नाही. कोणी किती पाणी उचलावे, हे ठरवून देणाऱ्या लघुपाटबंधारे खात्याने जादा पाणी उचलण्याच्या कारवाईशी आपला संबंध नसल्याचे सांगत जबाबदारी झटकली आहे. आम्ही विनंती करू शकतो!मीरा-भार्इंदर ३० टक्के पाणीकपात पाळत नसेल. जास्तीचे पाणी घेत असेल तर त्याविरोधात कारवाई काय करणार, अशी विचारणा लघुपाटबंधारे खात्याचे उपअभियंता हेमंत कुलकर्णी यांच्याकडे केली असता त्यांनी सांगितले, पाण्याचे नियोजन करण्यासाठी आम्ही ३० टक्के पाणीकपात लागू केली आहे. त्याची अंमलबजावणी एखादी संस्था करीत नसेल, तर त्यांच्याविरोधात कारवाईचा अधिकार आम्हाला नाही. आम्ही केवळ त्यांना कपात लागू करा, अशी विनंती करू शकतो. तशी चर्चा आम्ही मीरा-भार्इंदरशी केली आहे. थोडी स्थिती सुधारली : जुनेजानदीपात्रातील ज्या विहिरीतून पाणी घेतले जाते, त्या विहिरीची पातळी दोन दिवसांपूर्वी ०.८० मीटर इतकी खालावली होती. ही सोमवारची स्थिती. त्यात बुधवारी थोडी सुधारणा झाली. बुधवारी पाण्याची पातळी ७० सेंटिमीटरने वाढल्याचे केडीएमसी अभियंता तरुण जुनेजा यांनी सांगितले. स्टेम आणि कल्याण-डोंबिवलीच्या मोहने येथील पाणीउपशाच्या ठिकाणी असलेल्या पंपांमधील अंतर ५० मीटर असल्याने स्टेमच्या दिवसरात्र सुरू असलेल्या उपशाचा फटका केडीएमसीच्या पाणीपुरवठ्याला बसतो. त्यामुळे तेथे पाणीटंचाई जाणवते आहे. त्यामुळे स्टेममार्फत होणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी, योग्य नियोजनासाठी किमान एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवणे अपरिहार्य आहे. - सुनील सोनावणे, जिल्हा लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मीरा-भार्इंदर पालिकेने कोणाच्याही तोंडचे पाणी पळविलेले नाही. उलट, आमच्या हक्काचे पाणी मागितले असून ते शासकीय धोरणानुसार स्टेममार्फत वितरीत केले जात आहे. - अच्युत हांगे, पालिका आयुक्त सरकारच्या धोरणानुसारच मीरा-भार्इंदर पालिकेची पाणीकपात शिथिल करण्यात आली आहे. त्याबाबत स्टेमने लघुपाटबंधारे विभागाकडे पत्रव्यवहार केला. पण, त्यानंतरही त्यांनी अद्याप नियोजनासाठी निर्देश दिलेले नाहीत.- शशिकांत साळुंखे, स्टेमचे महाव्यस्थापक