शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

लोकांचा वर्तमानपत्रांवरचा विश्वास आजही कायम; विश्वासार्हता टिकवण्याची जबाबदारी मुद्रित माध्यमांवरच- देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 06:40 IST

‘लोकमत’च्या ठाण्यातील अद्ययावत कार्यालयाचे उद्घाटन

ठाणे : ‘माहिती घेण्याकरिता आज वेगवेगळी सोशल माध्यमे उपलब्ध असतानाही वर्तमानपत्रांवरचा लोकांचा विश्वास कायम आहे. त्यामुळे तो विश्वास कायम ठेवण्याची मोठी जबाबदारी मुद्रित माध्यमांवर आहे. आजही पेपरमध्ये छापून आलेलेच खरे असते, यावर लोकांचा विश्वास आहे,’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केले.

लोकमत’च्याठाणे येथील नूतन कार्यालयाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ‘लोकमत’चे प्रबंध संचालक देवेंद्र दर्डा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, माध्यमांचे स्वरूप बदलत आहे. डिजिटल माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मजकूर येत आहे. ताे मजकूर खरा की खोटा, याचा अर्थ लागत नाही. त्यावेळी ‘लोकमत’सारख्या प्रिंट माध्यमांची जबाबदारी वाढते. कारण त्यांना तत्त्व आणि ध्येय टिकवतानाच समाजाला विचारांची दिशा देण्याचे कामही करावे लागणार आहे, असेही ते म्हणाले.

आजूबाजूला कितीही बदल झाले तरी ‘लोकमत’चा बाज बदलत नाही. हाच बाज मराठी माणसाच्या मनात पक्का बसला आहे. त्यामुळेच ‘लोकमत’ आणि महाराष्ट्रातील जनतेचे अतूट नाते आहे. यंदा दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. त्यांनी ‘लोकमत’ जनतेमध्ये रुजवला. त्यामुळेच लोकांचे मत, भावभावना यांचे दर्शन आपल्याला ‘लोकमत’मधून कायम दिसते. म्हणून लोकांना ‘लोकमत’ आपला वाटतो. दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्यानंतर विजय दर्डा, राजेंद्र दर्डा आणि आता तिसरी पिढी देवेंद्र, ऋषी व करण दर्डा यांनीदेखील तोच भाव केवळ जपलाच नाही तर वाढवण्याचे कामही केले, असेही फडणवीस म्हणाले.

प्रारंभी देवेंद्र दर्डा यांच्या हस्ते तसेच समूह संपादक विजय बाविस्कर यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. ‘लोकमत’ मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी यावेळी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास आमदार निरंजन डावखरे, आ. संजय केळकर, ठाणे महापालिका आयुक्त विपिन शर्मा, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, सह पोलीस आयुक्त दत्ता कराळे, पंजाबराव उगले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ सहायक संपादक संदीप प्रधान यांनी केले तर ‘लोकमत’ मीडियाचे उपाध्यक्ष विजय शुक्ला यांनी आभार मानले.

 वाचन संस्कृती जपण्याचे आव्हान - जितेंद्र आव्हाड

माजी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, वाचन संस्कृती जपण्याचे आव्हान सोशल मीडियाच्या सध्याच्या युगात मुद्रित माध्यमांपुढे आहे. मात्र, मुद्रित माध्यमांचे महत्त्व जराही कमी झालेले नाही. ‘लोकमत’ हे तर न थांबणारे व्यासपीठ आहे. सतत त्यांचे काही ना काही कार्यक्रम होत असतात. विजय दर्डा, राजेंद्र दर्डा यांच्या गोड स्वभावामुळे तुमचे सर्वांशी घट्ट नाते आहे. म्हणून ‘लोकमत’ राज्यात नंबर एकवर आहे. प्रिंट मीडियामध्ये ‘लोकमत’चा हा नंबर कोणीच घेऊ शकत नाही, असेही आव्हाड म्हणाले. 

हा तर एक चांगला याेगायाेग - देवेंद्र दर्डा

‘लोकमत’चे प्रबंध संचालक देवेंद्र दर्डा म्हणाले, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर ‘लोकमत’च्या ठाण्यातील विस्तारासाठी देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित असणे एक चांगला योगायोग आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा ज्या कामाला हात लागतो त्यात यश नक्की असते, असे म्हणत दर्डा यांनी दोन्ही नेत्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. महाराष्ट्रासह भारतातही ‘लोकमत’ अग्रेसर आहे व समाजहिताची कामेही करत आहे, असे त्यांनी सांगितले. येत्या काळात टॉप १० डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये ‘लोकमत’चा सहभाग राहणार आहे. ‘लोकमत’च्या विश्वासार्हतेला कधीही तडा जाणार नाही, याची काळजी घेणे ही आमची सर्वांत मोठी जबाबदारी मी मानतो, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :LokmatलोकमतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसthaneठाणेJitendra Awhadजितेंद्र आव्हाड