शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

दिल्लीतील परिवर्तनाची सूत्रे पवारांच्याच हातात असतील, संजय राऊत यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 05:20 IST

'उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले नसते, तर हे सरकार आले नसते.'

ठाणे : ज्यावेळी शरद पवार यांना ईडीची नोटीस आली, तेव्हाच महाराष्ट्रात बदलाची भावना निर्माण झाली. पवार यांच्यासारख्या नेत्याला ईडीची नोटीस येऊ शकते, तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे काय होईल, राज्यात परिवर्तन करून पवारांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना यामधून बाहेर काढले. महाराष्ट्रात झालेले हे परिवर्तन दिल्लीपर्यंत जाईल आणि याची सूत्रे त्यांच्याच हातात राहतील, असे रोखठोक मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले नसते, तर हे सरकार आले नसते. मात्र, पवार यांनी ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर, ठाकरे घराण्यातील पहिले ठाकरे हे मुख्यमंत्री झाले, हे सांगायलादेखील राऊत विसरले नाहीत.खारेगाव येथील ९० फूट रोडवर आयोजित केलेल्या ठाणे फेस्टिव्हलमध्ये कळवा, विटावा, पारसिकनगर, खारीगाव येथील नागरिकांनी डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या नागरी सत्काराचे आयोजन केले होते. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आवर्जून उपस्थित राहून जितेंद्र आव्हाड आणि त्यांची पत्नी ऋता यांचा सत्कार केला. खासदार संजय राऊत,नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते.राऊत पुढे म्हणाले, शरद पवार हेच महाविकास आघाडीचे उद्गाते आहेत. ते सर्वांना भावनिक होऊन जाऊ नका, असे सांगतात. मात्र, आयुष्य हे भावनेवरच चालले आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या खाली भावनांचा उद्रेक झाला नसता, तर महाविकास आघाडीचे सरकारच स्थापन झाले नसते. त्यामुळे हे सरकार भावनेच्या उद्रेकातून निर्माण झाल्याचे राऊत म्हणाले. आज महाविकास आघाडीतील जे तीन पक्ष आहेत, त्यांची तोंडे तीन वेगवेगळ्या दिशांना होती. पण, आम्ही गेल्या पाच वर्षांत खूप भोगले होते. आता पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही बाहेर पडलो आहोत. महाराष्ट्रातील या परिवर्तनाची नांदी देशभर होणार असून दिल्लीतील परिवर्तनाची सूत्रेही पवार यांच्याच हाती असणार आहेत. त्यांचे आदेश ऐकून ठाकरे हे मुख्यमंत्री झाले आहेत. महाविकास आघाडीमुळे ठाण्याला दोन मंत्री मिळाले आहेत. महाविकास आघाडीचे सरकार हे जनतेच्या कामांसाठी स्थापन झाले आहे. लोकांचे फोन टॅप करायला नाही, असा टोलाही त्यांनी आधीच्या सरकारला लगावला....तर आव्हाड शिवसेनेतून मंत्री झाले असतेजर जितेंद्र आव्हाड शरद पवार यांच्या प्रेमात पडले नसते, तर ते शिवसेनेकडून मंत्री झाले असते, असे वक्तव्य करून संजय राऊत यांनी उपस्थितांमध्ये खळबळ उडवून दिली. मात्र, त्यांची पवारांवर संपूर्णपणे निष्ठा असून निष्ठा काय असते, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे, असे राऊत यांनी सांगितले. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घडवले आहे. ठाण्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड हे दोन मंत्री मिळाले असून त्यांनी आपल्या मतदारसंघांच्या विकासासोबत आता संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतSharad Pawarशरद पवार