शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

दिल्लीतील परिवर्तनाची सूत्रे पवारांच्याच हातात असतील, संजय राऊत यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 05:20 IST

'उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले नसते, तर हे सरकार आले नसते.'

ठाणे : ज्यावेळी शरद पवार यांना ईडीची नोटीस आली, तेव्हाच महाराष्ट्रात बदलाची भावना निर्माण झाली. पवार यांच्यासारख्या नेत्याला ईडीची नोटीस येऊ शकते, तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे काय होईल, राज्यात परिवर्तन करून पवारांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना यामधून बाहेर काढले. महाराष्ट्रात झालेले हे परिवर्तन दिल्लीपर्यंत जाईल आणि याची सूत्रे त्यांच्याच हातात राहतील, असे रोखठोक मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले नसते, तर हे सरकार आले नसते. मात्र, पवार यांनी ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर, ठाकरे घराण्यातील पहिले ठाकरे हे मुख्यमंत्री झाले, हे सांगायलादेखील राऊत विसरले नाहीत.खारेगाव येथील ९० फूट रोडवर आयोजित केलेल्या ठाणे फेस्टिव्हलमध्ये कळवा, विटावा, पारसिकनगर, खारीगाव येथील नागरिकांनी डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या नागरी सत्काराचे आयोजन केले होते. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आवर्जून उपस्थित राहून जितेंद्र आव्हाड आणि त्यांची पत्नी ऋता यांचा सत्कार केला. खासदार संजय राऊत,नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते.राऊत पुढे म्हणाले, शरद पवार हेच महाविकास आघाडीचे उद्गाते आहेत. ते सर्वांना भावनिक होऊन जाऊ नका, असे सांगतात. मात्र, आयुष्य हे भावनेवरच चालले आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या खाली भावनांचा उद्रेक झाला नसता, तर महाविकास आघाडीचे सरकारच स्थापन झाले नसते. त्यामुळे हे सरकार भावनेच्या उद्रेकातून निर्माण झाल्याचे राऊत म्हणाले. आज महाविकास आघाडीतील जे तीन पक्ष आहेत, त्यांची तोंडे तीन वेगवेगळ्या दिशांना होती. पण, आम्ही गेल्या पाच वर्षांत खूप भोगले होते. आता पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही बाहेर पडलो आहोत. महाराष्ट्रातील या परिवर्तनाची नांदी देशभर होणार असून दिल्लीतील परिवर्तनाची सूत्रेही पवार यांच्याच हाती असणार आहेत. त्यांचे आदेश ऐकून ठाकरे हे मुख्यमंत्री झाले आहेत. महाविकास आघाडीमुळे ठाण्याला दोन मंत्री मिळाले आहेत. महाविकास आघाडीचे सरकार हे जनतेच्या कामांसाठी स्थापन झाले आहे. लोकांचे फोन टॅप करायला नाही, असा टोलाही त्यांनी आधीच्या सरकारला लगावला....तर आव्हाड शिवसेनेतून मंत्री झाले असतेजर जितेंद्र आव्हाड शरद पवार यांच्या प्रेमात पडले नसते, तर ते शिवसेनेकडून मंत्री झाले असते, असे वक्तव्य करून संजय राऊत यांनी उपस्थितांमध्ये खळबळ उडवून दिली. मात्र, त्यांची पवारांवर संपूर्णपणे निष्ठा असून निष्ठा काय असते, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे, असे राऊत यांनी सांगितले. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घडवले आहे. ठाण्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड हे दोन मंत्री मिळाले असून त्यांनी आपल्या मतदारसंघांच्या विकासासोबत आता संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतSharad Pawarशरद पवार