शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

उल्हासनगरातील वालधुनी नदीची पेट्रोलिंग, नदीच्या पाण्याच्या तीव्र वासाने नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 17:12 IST

उल्हासनगरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीत टॅंकर माफिया केमिकल सोडत असल्याने, नदी किनाऱ्यावरील हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : शहराच्या मधोमध वाहणाऱ्या वालधुनी नदीत केमिकल टाकणाऱ्याचा छेडा लावण्यासाठी पालिका अधिकाऱ्यास ह, प्रदूषण मंडळाचे अधिकारी, पोलिस व स्थानिक नगरसेवकांनी गेल्या दोन दिवसापासून रात्रीला नदी किनारी गुप्तपणे पेट्रोलिंग केली. मात्र हाती काहीच लागले नाही. अखेर प्रदुषण मंडळाचे छडा लावण्याची विनंती नगरसेवक टोनी सिरवानी यांनी केली. 

उल्हासनगरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीत टॅंकर माफिया केमिकल सोडत असल्याने, नदी किनाऱ्यावरील हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. नदी पात्रात केमिकल टाकले जात असल्याने, नदीतील पाण्याला उग्र दर्पाचा वास येवून नागरिकांना चक्कर येणे, डोळे दुखी, उलट्या, त्वचाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. यापूर्वी असे प्रकार अनेकदा घडल्याने नदी किनाऱ्यावरील नागरिक भीतीच्या छायाखाली आहेत. गेल्या दोन दिवसापासून वालधुनी नदीच्या पात्रातून तीव्र वासात वाढ झाल्याने नागरिकांनी स्थानिक नगरसेवक टोनी सिरवाणी, कविता पंजाबी यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांच्याकडे धाव घेवून झालेला प्रकार कथन केला. तसेच पाण्याच्या तीव्र वासाने नागरिक त्रस्त झाले आहेत.

 महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी सहायक आयुक्त गणेश शिंपी, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केनी, एकनाथ पवार यांना बोलावून रात्रीला वालधुनी नदी किनारी पोलिस, स्थानिक नगरसेवक व प्रदुषन‌ मंडळाच्या अधिकारी यांच्या सोबत गस्त घालण्याचे सुचविले. सोमवारी व मंगळवारी रात्री गस्त घातली असुन हाती काहीच लागले नसल्याची प्रतिक्रिया नगरसेवक टोनी सीरवानी यांनी दिली. तसेच नदीचे प्रदुर्षण करणाऱ्यावर कारवाई होण्यासाठी प्रदुषन मंडळाने अधिक सक्रिय होण्याची गरज असल्याची माहिती सिरवानी यांनी दिली. तसेच रात्रीची महापालिकेने गस्त सुरू केल्याची माहिती टँकर केमिकल माफिया यांना खबरी पर्यंत मिळाल्याने गस्त दरम्यान पथकाला काही एक मिळाले नसल्याची माहिती दिली. 

वालधुनी नदी वरदान नव्हे शाप?

 शहरातून जाणारी वालधुनी नदी वरदान ठरण्या ऐवजी शापित निघाल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. यापूर्वी नदीतील तीव्र वासाने शेकडो नागरिकांना फटका बसला असुन त्यांना रूग्णालयात उपचार घ्यावे लागले. नदीत केमिकल टाकणाऱ्या टँकर माफियांवर यापूर्वी गुन्हे दाखल झाले. मात्र मोठी कारवाई अध्यापर्यंत झाली नसल्याचा आरोप सिरवानी यांनी केला.

टॅग्स :riverनदी