शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरातील वालधुनी नदीची पेट्रोलिंग, नदीच्या पाण्याच्या तीव्र वासाने नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 17:12 IST

उल्हासनगरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीत टॅंकर माफिया केमिकल सोडत असल्याने, नदी किनाऱ्यावरील हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : शहराच्या मधोमध वाहणाऱ्या वालधुनी नदीत केमिकल टाकणाऱ्याचा छेडा लावण्यासाठी पालिका अधिकाऱ्यास ह, प्रदूषण मंडळाचे अधिकारी, पोलिस व स्थानिक नगरसेवकांनी गेल्या दोन दिवसापासून रात्रीला नदी किनारी गुप्तपणे पेट्रोलिंग केली. मात्र हाती काहीच लागले नाही. अखेर प्रदुषण मंडळाचे छडा लावण्याची विनंती नगरसेवक टोनी सिरवानी यांनी केली. 

उल्हासनगरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीत टॅंकर माफिया केमिकल सोडत असल्याने, नदी किनाऱ्यावरील हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. नदी पात्रात केमिकल टाकले जात असल्याने, नदीतील पाण्याला उग्र दर्पाचा वास येवून नागरिकांना चक्कर येणे, डोळे दुखी, उलट्या, त्वचाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. यापूर्वी असे प्रकार अनेकदा घडल्याने नदी किनाऱ्यावरील नागरिक भीतीच्या छायाखाली आहेत. गेल्या दोन दिवसापासून वालधुनी नदीच्या पात्रातून तीव्र वासात वाढ झाल्याने नागरिकांनी स्थानिक नगरसेवक टोनी सिरवाणी, कविता पंजाबी यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांच्याकडे धाव घेवून झालेला प्रकार कथन केला. तसेच पाण्याच्या तीव्र वासाने नागरिक त्रस्त झाले आहेत.

 महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी सहायक आयुक्त गणेश शिंपी, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केनी, एकनाथ पवार यांना बोलावून रात्रीला वालधुनी नदी किनारी पोलिस, स्थानिक नगरसेवक व प्रदुषन‌ मंडळाच्या अधिकारी यांच्या सोबत गस्त घालण्याचे सुचविले. सोमवारी व मंगळवारी रात्री गस्त घातली असुन हाती काहीच लागले नसल्याची प्रतिक्रिया नगरसेवक टोनी सीरवानी यांनी दिली. तसेच नदीचे प्रदुर्षण करणाऱ्यावर कारवाई होण्यासाठी प्रदुषन मंडळाने अधिक सक्रिय होण्याची गरज असल्याची माहिती सिरवानी यांनी दिली. तसेच रात्रीची महापालिकेने गस्त सुरू केल्याची माहिती टँकर केमिकल माफिया यांना खबरी पर्यंत मिळाल्याने गस्त दरम्यान पथकाला काही एक मिळाले नसल्याची माहिती दिली. 

वालधुनी नदी वरदान नव्हे शाप?

 शहरातून जाणारी वालधुनी नदी वरदान ठरण्या ऐवजी शापित निघाल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. यापूर्वी नदीतील तीव्र वासाने शेकडो नागरिकांना फटका बसला असुन त्यांना रूग्णालयात उपचार घ्यावे लागले. नदीत केमिकल टाकणाऱ्या टँकर माफियांवर यापूर्वी गुन्हे दाखल झाले. मात्र मोठी कारवाई अध्यापर्यंत झाली नसल्याचा आरोप सिरवानी यांनी केला.

टॅग्स :riverनदी